शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
2
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
3
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
4
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
5
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
6
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
7
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
8
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
9
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
10
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
11
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
12
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
13
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
14
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
15
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
16
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
17
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
18
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
19
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
20
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!

पूरग्रस्तांच्या डोळ्यात महापूर कायम

By admin | Updated: July 8, 2014 23:42 IST

बेसावध क्षणी नांदगव्हाण धरण फुटले आणि धावंडा नदीने क्षणात होत्याचे नव्हते केले. ९ वर्षांपूर्वी ९ जुलैच्या रात्री घडलेला थरार आजही दिग्रसकरांच्या जसाच्या तसा डोळ्यापुढे उभा राहतो.

९ जुलैचा काळा दिवस : धावंडा पूरग्रस्तांची अवस्था ‘जैसे थे’सुनील हिरास - दिग्रसबेसावध क्षणी नांदगव्हाण धरण फुटले आणि धावंडा नदीने क्षणात होत्याचे नव्हते केले. ९ वर्षांपूर्वी ९ जुलैच्या रात्री घडलेला थरार आजही दिग्रसकरांच्या जसाच्या तसा डोळ्यापुढे उभा राहतो. या काळरात्री १४ जिवांचा बळी गेला. शेकडो संसार उद्ध्वस्त झाले. त्यानंतर आश्वासनांची खैरात वाटली. मात्र एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. आजही पूरग्रस्त आहे त्या स्थितीतच जीवन जगत आहे. धावंडाचा महापूर ओसरून नऊ वर्षे झाली तरी डोळ्यात मात्र महापूर कायम आहे. दिग्रस तालुक्यातील नांदगव्हाण धरण ९ जुलै २००५ साली फुटले. धावंडा नदीला महापूर आला. क्षणभरात अर्धे दिग्रस शहर जलमय झाले. नदीतिरावरील परिसरासह देवनगर, जिजामातानगर, पोळा मैदान, संभाजीनगर, मोतीनगर, गंगानगर, बापूनगर, बजरंगनगर आदी परिसर जलमय झाला. रात्री आलेल्या महापुराने बेसावध नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली. डोळ्यासमोर घरे वाहून जाताना पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग आला. या महापुराने १४ निष्पापांचे बळी घेतले. महापूर ओसरल्यानंतर अनेकांनी दिग्रसला भेट दिली. मदतीचे आश्वासन दिले. प्रशासनाने निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था केली. मात्र नऊ वर्षे झाले तरी पूरग्रस्त त्याच वेदना घेऊन जगत आहे. ९ जुलैचा दिवस उजाडला की, नागरिकांच्या अंगावर शहारे येतात. आप्त स्वकीयांचे डोळे अश्रूंनी भरुन येतात. मात्र पूरग्रस्तांच्या डोळ्यातील महापूर कुणालाही आता दिसत नाही. घरे उद्ध्वस्त झाल्यानंतर अनेक कुटुंब झोपडीवजा घरात राहत आहे. कोणतीही सुविधा नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवून पूरग्रस्त थकले आहे. प्रत्येकवेळी घरकूल पूर्ण झाले की, हक्काचे घर मिळेल, असे आश्वासन दिले जाते. मात्र भवानी टेकडी परिसरातील घरकुलाची सध्यस्थिती पाहिली तर स्वप्न आगामी काही वर्षातही पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. पूरग्रस्तांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने ९५२ घरकुलांची महत्वाकांक्षी योजना आखली.परंतु राजकीय हेव्यादाव्यात घरकुलांचे कामच पूर्ण झाले नाही. प्रसिद्धीसाठी चारवेळा या कामाचे भूमिपूजन केले. मात्र प्रत्येकवेळी राजकारणच आडवे येत गेले.