शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

पूरग्रस्तांच्या डोळ्यात महापूर कायम

By admin | Updated: July 8, 2014 23:42 IST

बेसावध क्षणी नांदगव्हाण धरण फुटले आणि धावंडा नदीने क्षणात होत्याचे नव्हते केले. ९ वर्षांपूर्वी ९ जुलैच्या रात्री घडलेला थरार आजही दिग्रसकरांच्या जसाच्या तसा डोळ्यापुढे उभा राहतो.

९ जुलैचा काळा दिवस : धावंडा पूरग्रस्तांची अवस्था ‘जैसे थे’सुनील हिरास - दिग्रसबेसावध क्षणी नांदगव्हाण धरण फुटले आणि धावंडा नदीने क्षणात होत्याचे नव्हते केले. ९ वर्षांपूर्वी ९ जुलैच्या रात्री घडलेला थरार आजही दिग्रसकरांच्या जसाच्या तसा डोळ्यापुढे उभा राहतो. या काळरात्री १४ जिवांचा बळी गेला. शेकडो संसार उद्ध्वस्त झाले. त्यानंतर आश्वासनांची खैरात वाटली. मात्र एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. आजही पूरग्रस्त आहे त्या स्थितीतच जीवन जगत आहे. धावंडाचा महापूर ओसरून नऊ वर्षे झाली तरी डोळ्यात मात्र महापूर कायम आहे. दिग्रस तालुक्यातील नांदगव्हाण धरण ९ जुलै २००५ साली फुटले. धावंडा नदीला महापूर आला. क्षणभरात अर्धे दिग्रस शहर जलमय झाले. नदीतिरावरील परिसरासह देवनगर, जिजामातानगर, पोळा मैदान, संभाजीनगर, मोतीनगर, गंगानगर, बापूनगर, बजरंगनगर आदी परिसर जलमय झाला. रात्री आलेल्या महापुराने बेसावध नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली. डोळ्यासमोर घरे वाहून जाताना पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग आला. या महापुराने १४ निष्पापांचे बळी घेतले. महापूर ओसरल्यानंतर अनेकांनी दिग्रसला भेट दिली. मदतीचे आश्वासन दिले. प्रशासनाने निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था केली. मात्र नऊ वर्षे झाले तरी पूरग्रस्त त्याच वेदना घेऊन जगत आहे. ९ जुलैचा दिवस उजाडला की, नागरिकांच्या अंगावर शहारे येतात. आप्त स्वकीयांचे डोळे अश्रूंनी भरुन येतात. मात्र पूरग्रस्तांच्या डोळ्यातील महापूर कुणालाही आता दिसत नाही. घरे उद्ध्वस्त झाल्यानंतर अनेक कुटुंब झोपडीवजा घरात राहत आहे. कोणतीही सुविधा नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवून पूरग्रस्त थकले आहे. प्रत्येकवेळी घरकूल पूर्ण झाले की, हक्काचे घर मिळेल, असे आश्वासन दिले जाते. मात्र भवानी टेकडी परिसरातील घरकुलाची सध्यस्थिती पाहिली तर स्वप्न आगामी काही वर्षातही पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. पूरग्रस्तांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने ९५२ घरकुलांची महत्वाकांक्षी योजना आखली.परंतु राजकीय हेव्यादाव्यात घरकुलांचे कामच पूर्ण झाले नाही. प्रसिद्धीसाठी चारवेळा या कामाचे भूमिपूजन केले. मात्र प्रत्येकवेळी राजकारणच आडवे येत गेले.