शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

महावितरणचा अजब कारभार

By admin | Updated: March 11, 2015 01:59 IST

महावितरणचा अजब कारभार नेहमीच चव्हाट्यावर येतो. देयकाच्या भाराने ग्राहक आधीच वैतागले आहे. त्यातच या महिन्यात तारीख उलटून गेल्यानंतर देयकांचे वाटप करण्यात ...

वणी : महावितरणचा अजब कारभार नेहमीच चव्हाट्यावर येतो. देयकाच्या भाराने ग्राहक आधीच वैतागले आहे. त्यातच या महिन्यात तारीख उलटून गेल्यानंतर देयकांचे वाटप करण्यात आल्याने बहुतांश वीज ग्राहकांवर नाहक आर्थिक भुर्दंड बसला आहे. दर महिन्याला महावितरणतर्फे ग्राहकांना वीज देयक पाठविण्यात येते. त्यात देयक भरण्याची अंतिम तारीख दिलेली असते. ही अंतिम तारीख उलटून गेल्यानंतर किमान चार दिवसानंतर दंड आकारून वाढीव देयक भरण्याची मुभा दिली जाते. त्या तारखेनंतरही ग्राहकांनी देयक न भरल्यास त्यांना पुन्हा जादा भुर्दंड देऊन देयक भरण्याची मुभा दिली जाते. प्रथम १0 ते ३0 रूपये आणि नंतर चक्क १00 ते १५0 रूपयांपर्यंत भुर्दंड सहन करून ग्राहकांना वीज देयक भरता येते. फेब्रुवारी महिन्याचे वीज देयक आज मंगळवारी बहुतांश ग्राहकांच्या हाती पडले. या देयकात ९ मार्चपर्यंत देयक भरण्याची तारीख देण्यात आली. मात्र हे देयक आज १0 मार्चला ग्राहकांना वाटप करण्यात आले आहे. ९ मार्चपर्यंत ठरावीक रक्कम होती. त्यानंतर आता ग्राहकांना वाढीव रकमेसह हे देयक भरावे लागणार आहे. यात ग्राहकांची कोणतीही चूक नाही. महावितरणनेच त्यांना एक दिवस उशिरा देयक वाटप केले आहे. मात्र त्याचा नाहक भुर्दंड आता ग्राहकांवर बसणार आहे. यातून महावितरणला लाखो रूपयांचा लाभ होणार आहे. मंगळवारी १0 मार्चला वाटप करण्यात आलेल्या देयकांवर अंतिम तारीख ९ मार्च दर्शविण्यात आली. त्यानंतर १३ मार्चपर्यंत ग्राहकांना वाढीव रकमेसह देयक भरता येणार आहे. सोबतच १३ मार्च उलटून गेल्यानंतरही पुन्हा वाढीव रकमेसह ग्राहकांना देयक भरता येणार आहे. ही बाब जरी खरी असली, तरी यात ग्राहकच भरडले जात आहे. त्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना नाहक जादा भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे देयक मिळताच महावितरणचे कर्मचारी ते भरण्यासाठी तगादा लावतात. विहित तारखेपर्यंत देयक न भरल्यास वीज जोडणी कापण्याची धमकी दिली जाते. बहुतांश महिन्यात असाच प्रकार सुरू आहे. त्याचा फटका सर्वच ग्राहकांना बसत आहे. त्यासाठी आता महावितरणतर्फे देयक आॅनलाईन झाल्याचे सांगून चक्क ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. आॅनलाईन सुविधा ग्रामीण भागातील ग्राहकांना कुचकामी ठरत आहे. त्यांच्याकडे इंटरनेटच नाही. त्यामुळे आनलाईन देयक भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्यांच्याकडे इंटनरनेट आहेत, असेही बहुतांश ग्राहक या पद्धतीचा वापर करीतच नाही. मात्र महातिवरणला यातून दरमहा लाखोंचा मलिदा सहज मिळत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)