शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा अजब कारभार

By admin | Updated: March 11, 2015 01:59 IST

महावितरणचा अजब कारभार नेहमीच चव्हाट्यावर येतो. देयकाच्या भाराने ग्राहक आधीच वैतागले आहे. त्यातच या महिन्यात तारीख उलटून गेल्यानंतर देयकांचे वाटप करण्यात ...

वणी : महावितरणचा अजब कारभार नेहमीच चव्हाट्यावर येतो. देयकाच्या भाराने ग्राहक आधीच वैतागले आहे. त्यातच या महिन्यात तारीख उलटून गेल्यानंतर देयकांचे वाटप करण्यात आल्याने बहुतांश वीज ग्राहकांवर नाहक आर्थिक भुर्दंड बसला आहे. दर महिन्याला महावितरणतर्फे ग्राहकांना वीज देयक पाठविण्यात येते. त्यात देयक भरण्याची अंतिम तारीख दिलेली असते. ही अंतिम तारीख उलटून गेल्यानंतर किमान चार दिवसानंतर दंड आकारून वाढीव देयक भरण्याची मुभा दिली जाते. त्या तारखेनंतरही ग्राहकांनी देयक न भरल्यास त्यांना पुन्हा जादा भुर्दंड देऊन देयक भरण्याची मुभा दिली जाते. प्रथम १0 ते ३0 रूपये आणि नंतर चक्क १00 ते १५0 रूपयांपर्यंत भुर्दंड सहन करून ग्राहकांना वीज देयक भरता येते. फेब्रुवारी महिन्याचे वीज देयक आज मंगळवारी बहुतांश ग्राहकांच्या हाती पडले. या देयकात ९ मार्चपर्यंत देयक भरण्याची तारीख देण्यात आली. मात्र हे देयक आज १0 मार्चला ग्राहकांना वाटप करण्यात आले आहे. ९ मार्चपर्यंत ठरावीक रक्कम होती. त्यानंतर आता ग्राहकांना वाढीव रकमेसह हे देयक भरावे लागणार आहे. यात ग्राहकांची कोणतीही चूक नाही. महावितरणनेच त्यांना एक दिवस उशिरा देयक वाटप केले आहे. मात्र त्याचा नाहक भुर्दंड आता ग्राहकांवर बसणार आहे. यातून महावितरणला लाखो रूपयांचा लाभ होणार आहे. मंगळवारी १0 मार्चला वाटप करण्यात आलेल्या देयकांवर अंतिम तारीख ९ मार्च दर्शविण्यात आली. त्यानंतर १३ मार्चपर्यंत ग्राहकांना वाढीव रकमेसह देयक भरता येणार आहे. सोबतच १३ मार्च उलटून गेल्यानंतरही पुन्हा वाढीव रकमेसह ग्राहकांना देयक भरता येणार आहे. ही बाब जरी खरी असली, तरी यात ग्राहकच भरडले जात आहे. त्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना नाहक जादा भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे देयक मिळताच महावितरणचे कर्मचारी ते भरण्यासाठी तगादा लावतात. विहित तारखेपर्यंत देयक न भरल्यास वीज जोडणी कापण्याची धमकी दिली जाते. बहुतांश महिन्यात असाच प्रकार सुरू आहे. त्याचा फटका सर्वच ग्राहकांना बसत आहे. त्यासाठी आता महावितरणतर्फे देयक आॅनलाईन झाल्याचे सांगून चक्क ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. आॅनलाईन सुविधा ग्रामीण भागातील ग्राहकांना कुचकामी ठरत आहे. त्यांच्याकडे इंटरनेटच नाही. त्यामुळे आनलाईन देयक भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्यांच्याकडे इंटनरनेट आहेत, असेही बहुतांश ग्राहक या पद्धतीचा वापर करीतच नाही. मात्र महातिवरणला यातून दरमहा लाखोंचा मलिदा सहज मिळत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)