शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

चार दिवसांत तीन हजार हेक्टरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सुरू आहे. गत चार दिवसांत जिल्ह्यात सरासरी १३५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.  जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आणि शेतशिवार खरडून गेले. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  यवतमाळ, उमरखेड, महागाव, दारव्हा, कळंब, वणी, घाटंजी, दिग्रस आठ तालुक्यांत नुकसानीची नोंद करण्यात आली. नदी आणि  नाल्याच्या पात्रात आलेल्या पुराने दोन व्यक्ती वाहून गेल्याची नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गत चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने तीन हजार हेक्टरचे नुकसान केले आहे. पुरात दोनजण वाहून गेले, तर अनेक घरांत पाणी शिरल्याने अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.  जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  नुकसानीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, नुकसानीची नोंद करण्यासाठी ७२ तासांचा कालावधी विमा कंपनीने दिला आहे. त्यासाठी लोकेशनसह नुकसानीचे क्षेत्र दाखवावे लागते. याबाबतची माहिती कंपनीला देण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क केला. मात्र, हा फोन रिसिव्हच होत नव्हता. तक्रारी ऑनलाईन नोंद करताना सर्व्हरही डाऊन असल्याचे प्रकार पाहायला मिळाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सुरू आहे. गत चार दिवसांत जिल्ह्यात सरासरी १३५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.  जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आणि शेतशिवार खरडून गेले. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  यवतमाळ, उमरखेड, महागाव, दारव्हा, कळंब, वणी, घाटंजी, दिग्रस आठ तालुक्यांत नुकसानीची नोंद करण्यात आली. नदी आणि  नाल्याच्या पात्रात आलेल्या पुराने दोन व्यक्ती वाहून गेल्याची नोंद झाली आहे. या पावसात विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला असून, चार जनावरेही वाहून गेली.  अनेक सखल भागात पुराचे पाणी साचले. यातून उत्पन्नाला मोठा  फटका बसणार आहे. कापूस, सोयाबीन, तूर आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक  पाऊस आल्याने शेतात दलदल निर्माण झाली आहे.

किडींचा प्रादूर्भाव- ढगाळी वातावरणासह बदलत्या हवामानाने किडीला पोषक असे वातावरण मिळत आहे. यामुळे पिकांवरील किडी जोर काढण्याची शक्यता आहे. यामुळे उघाड पडताच शेतकऱ्यांना किडींपासून संरक्षण मिळावे म्हणून उपाययोजना कराव्या लागणार आहे.  

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती