शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत तीन हजार हेक्टरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सुरू आहे. गत चार दिवसांत जिल्ह्यात सरासरी १३५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.  जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आणि शेतशिवार खरडून गेले. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  यवतमाळ, उमरखेड, महागाव, दारव्हा, कळंब, वणी, घाटंजी, दिग्रस आठ तालुक्यांत नुकसानीची नोंद करण्यात आली. नदी आणि  नाल्याच्या पात्रात आलेल्या पुराने दोन व्यक्ती वाहून गेल्याची नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गत चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने तीन हजार हेक्टरचे नुकसान केले आहे. पुरात दोनजण वाहून गेले, तर अनेक घरांत पाणी शिरल्याने अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.  जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  नुकसानीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, नुकसानीची नोंद करण्यासाठी ७२ तासांचा कालावधी विमा कंपनीने दिला आहे. त्यासाठी लोकेशनसह नुकसानीचे क्षेत्र दाखवावे लागते. याबाबतची माहिती कंपनीला देण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क केला. मात्र, हा फोन रिसिव्हच होत नव्हता. तक्रारी ऑनलाईन नोंद करताना सर्व्हरही डाऊन असल्याचे प्रकार पाहायला मिळाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सुरू आहे. गत चार दिवसांत जिल्ह्यात सरासरी १३५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.  जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आणि शेतशिवार खरडून गेले. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  यवतमाळ, उमरखेड, महागाव, दारव्हा, कळंब, वणी, घाटंजी, दिग्रस आठ तालुक्यांत नुकसानीची नोंद करण्यात आली. नदी आणि  नाल्याच्या पात्रात आलेल्या पुराने दोन व्यक्ती वाहून गेल्याची नोंद झाली आहे. या पावसात विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला असून, चार जनावरेही वाहून गेली.  अनेक सखल भागात पुराचे पाणी साचले. यातून उत्पन्नाला मोठा  फटका बसणार आहे. कापूस, सोयाबीन, तूर आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक  पाऊस आल्याने शेतात दलदल निर्माण झाली आहे.

किडींचा प्रादूर्भाव- ढगाळी वातावरणासह बदलत्या हवामानाने किडीला पोषक असे वातावरण मिळत आहे. यामुळे पिकांवरील किडी जोर काढण्याची शक्यता आहे. यामुळे उघाड पडताच शेतकऱ्यांना किडींपासून संरक्षण मिळावे म्हणून उपाययोजना कराव्या लागणार आहे.  

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती