शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

चार दिवसांत तीन हजार हेक्टरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सुरू आहे. गत चार दिवसांत जिल्ह्यात सरासरी १३५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.  जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आणि शेतशिवार खरडून गेले. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  यवतमाळ, उमरखेड, महागाव, दारव्हा, कळंब, वणी, घाटंजी, दिग्रस आठ तालुक्यांत नुकसानीची नोंद करण्यात आली. नदी आणि  नाल्याच्या पात्रात आलेल्या पुराने दोन व्यक्ती वाहून गेल्याची नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गत चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने तीन हजार हेक्टरचे नुकसान केले आहे. पुरात दोनजण वाहून गेले, तर अनेक घरांत पाणी शिरल्याने अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.  जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  नुकसानीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, नुकसानीची नोंद करण्यासाठी ७२ तासांचा कालावधी विमा कंपनीने दिला आहे. त्यासाठी लोकेशनसह नुकसानीचे क्षेत्र दाखवावे लागते. याबाबतची माहिती कंपनीला देण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क केला. मात्र, हा फोन रिसिव्हच होत नव्हता. तक्रारी ऑनलाईन नोंद करताना सर्व्हरही डाऊन असल्याचे प्रकार पाहायला मिळाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सुरू आहे. गत चार दिवसांत जिल्ह्यात सरासरी १३५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.  जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आणि शेतशिवार खरडून गेले. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  यवतमाळ, उमरखेड, महागाव, दारव्हा, कळंब, वणी, घाटंजी, दिग्रस आठ तालुक्यांत नुकसानीची नोंद करण्यात आली. नदी आणि  नाल्याच्या पात्रात आलेल्या पुराने दोन व्यक्ती वाहून गेल्याची नोंद झाली आहे. या पावसात विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला असून, चार जनावरेही वाहून गेली.  अनेक सखल भागात पुराचे पाणी साचले. यातून उत्पन्नाला मोठा  फटका बसणार आहे. कापूस, सोयाबीन, तूर आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक  पाऊस आल्याने शेतात दलदल निर्माण झाली आहे.

किडींचा प्रादूर्भाव- ढगाळी वातावरणासह बदलत्या हवामानाने किडीला पोषक असे वातावरण मिळत आहे. यामुळे पिकांवरील किडी जोर काढण्याची शक्यता आहे. यामुळे उघाड पडताच शेतकऱ्यांना किडींपासून संरक्षण मिळावे म्हणून उपाययोजना कराव्या लागणार आहे.  

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती