शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

परतीच्या पावसाने राज्यात साडेतीन हजार कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:40 IST

राज्यभरात परतीच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीचा कहर सुरूच आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांनी केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार ५५ लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे५५ लाख हेक्टरला फटकापंचनाम्यासाठी २१ लाख शेतकऱ्यांचे अर्ज

रूपेश उत्त्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरात परतीच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीचा कहर सुरूच आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांनी केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार ५५ लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. हे नुकसान साडेतीन हजार कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आयुक्तांनी वर्तविला आहे. पंचनामे करण्यासाठी २१ लाख शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनी प्रतिनिधीकडे आले आहे. नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ७२ तासात विमाधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सतत कोसळणाºया पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे जथ्थे तालुका कृषी कार्यालयात धडकत आहे. या शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.२१ लाख शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी आतापर्यंत अर्ज सादर केले आहेत. यामध्ये बागायतदार शेतकऱ्यांसोबतच, कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी यासह इतर पिकांच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांचा अहवाल आला आहे.सर्वाधिक नुकसान द्राक्ष बागांचेकुठल्या पिकाचे किती नुकसान झाले, याची माहिती स्पष्ट झाल्यानंतर नुकसानीचा अंतिम अहवाल पुढे येणार आहे. ५४ लाख ८० हजार हेक्टरवर झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजात द्राक्ष बागांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.राज्यात आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने नुकसानीचा आकडा वाढणार आहे. फळबागा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.- हरी बाबतीवाल, उपसंचालक, राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्ष, पुणे

टॅग्स :agricultureशेती