शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

दारव्हा तालुक्यात केळी बागांचे नुकसान

By admin | Updated: August 8, 2015 02:40 IST

जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाचा फटका दारव्हा तालुक्यातील केळीच्या बागांना बसला आहे.

दारव्हा : जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाचा फटका दारव्हा तालुक्यातील केळीच्या बागांना बसला आहे. सुमारे ५० एकरावरील केळीचे पीक उद्ध्वस्त झाले असून, गणेशपूर, बिजोरा, कुंभारकिन्ही, किन्ही वडकी, टाकळी बोथ, गाजेपूर या गावांना फटका बसला. तालुक्यात ४ आॅगस्टच्या रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने केळीचे पीक उद्ध्वस्त झाले. दारव्हा तालुक्यातील शेतकरी अलिकडे केळी पिकाकडे वळले आहे. या केळीचे योग्य संगोपनही करण्यात आले. मात्र वादळाने केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कृषी विभागामार्फत केळी पिकाच्या लागवडीसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. परंतु दारव्हा तालुक्यात लक्षांक नसल्याने हे शेतकरी अनुदानापासूनही वंचित राहिले. विशेष म्हणजे विविध पिकांचा विमा काढता येतो, मात्र केळी पिकाचा त्यात समावेश नसल्याने यापासूनही वंचित राहावे लागत आहे. यासंदर्भात गणेशपूर येथील शाम गावंडे यांनी कृषी मंत्र्याकडे निवेदन पाठविले. त्यानंतर नुकसानग्रस्त केळीची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी पुरूषोत्तम अनगाई, आत्माचे तालुका तंत्रज्ञ जीवन जाधव यांच्या चमुने पाहणी केली. नुकसानीचा अहवाल वरिष्ठांना कळविणार असल्याचे त्यांना सांगितले. (प्रतिनिधी)