शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये बुडाला ४४ कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

जिल्ह्यातून दारू निर्मिती कारखान्यापासून मिळणारे महसुली उत्पन्न्न ५२ कोटी ९२ लाख इतके अपेक्षित आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात ४८ कोटींचा महसूल वसूल झाला. १८ मार्चपासून मंगरुळ येथील देशी दारू कारखान्याचे उत्पादन बंद करण्यात आले. यामुळे आतापर्यंत जवळपास सहा कोटींचा महसूल बुडाला आहे. तर दारू दुकाने बंद असल्याने ४५ दिवसात होणारी सरासरी विक्री थांबली. यामुळे ३८ कोटी २५ लाखांचा महसूल बुडाला.

ठळक मुद्दे४५ दिवसांचा कालावधी : दारूनिर्मिती थांबल्याने सहा कोटींचे नुकसान

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारूची निर्मिती, विक्री नैतिकदृष्ट्या वाईटच आहे. मात्र दुसरी बाजू या दारूच्या निर्मिती व विक्रीतून मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल मिळतो. त्याच आधारावर इतरही सोईसुविधा पुरविल्या जातात. दारू दुकाने बंदच्या काळात तब्बल ४४ कोटी २५ लाखांचा महसूल बुडाला आहे. यात यवतमाळ जिल्ह्यात दारू निर्मितीतून मिळणाऱ्या सहा कोटी महसुलाचाही समावेश आहे.जिल्ह्यातून दारू निर्मिती कारखान्यापासून मिळणारे महसुली उत्पन्न्न ५२ कोटी ९२ लाख इतके अपेक्षित आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात ४८ कोटींचा महसूल वसूल झाला. १८ मार्चपासून मंगरुळ येथील देशी दारू कारखान्याचे उत्पादन बंद करण्यात आले. यामुळे आतापर्यंत जवळपास सहा कोटींचा महसूल बुडाला आहे. तर दारू दुकाने बंद असल्याने ४५ दिवसात होणारी सरासरी विक्री थांबली. यामुळे ३८ कोटी २५ लाखांचा महसूल बुडाला. शासनाला एकट्या यवतमाळ जिल्ह्यातून ४५ दिवसाच्या कालावधीत बंदमुळे ४४ कोटी २५ लाखाच्या महसुलावर पाणी सोडावे लागले.कोरोना विषाणू संसर्गाची महामारी आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी व विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले. त्यामुळेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे.दारूच्या निर्मिती व विक्रीतून राज्याच्या कोषात घसघशीत रक्कम जमा होते. याचा हिशेबही सर्वश्रृत आहे. आता सरकार आर्थिक अडचणीत असल्याने थेट केंद्रातूनच दारू दुकाने सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात आले.यवतमाळ शहर वगळता जिल्ह्यातील दारू दुकाने सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात २३ विदेशी दारूची दुकाने, १२४ देशी दारूचे दुकाने व ६२ बीअर शॉपी आहेत. ही सर्व दुकाने ५ मेपासून सुरू करण्याचे आदेश होते. हा आदेश रद्द करून आता ही सर्व दुकाने पुढील आदेशापर्यंत बंदच ठेवली जाणार आहे.तळीरामांचा आनंद ठरला औटघटकेचायवतमाळ शहरातील ११ विदेशी दारू दुकाने, १९ बीअर शॉपी, ११ देशी दारू दुकाने बंद राहणार आहे. ग्रामीण भागातील दारू दुकाने सुरु झाल्यानंतर यवतमाळ शहरातील तळीरामांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळविला होता. वणी येथे विदेशी दारूचे एक दुकान व देशी दारूचे दोन दुकाने बुधवारी सकाळी ८ वाजता उघडण्यात आली होती. येथील गर्दी पाहून आतापर्यंत तळीरामांचा जीव किती कासावीस झाला हे दिसून येते. मात्र वणीतील गर्दी पाहून प्रशासनाने दारू दुकान सुरू ठेवण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला. शिवाय कोरोना रुग्ण वाढत असल्याने ग्रामीण भागात दारू विक्रीची दिलेली सूट रद्द केली. पुढील आदेशापर्यंत जिल्ह््यात सर्वच ठिकाणी मद्य विक्रीला बंदी आहे.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाcorona virusकोरोना वायरस बातम्या