शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

कापूस खरेदीत शेतकºयांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:08 IST

तालुक्यातील दोन्ही ठिकाणी उद्यापर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकºयांना आपला कापूस खुल्या बाजारात विकावा लागत आहे.

ठळक मुद्देशेतकरी संतप्त : दारव्हा तालुक्यात शासकीय कापूस खरेदीचा मुहूर्तच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील दोन्ही ठिकाणी उद्यापर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकºयांना आपला कापूस खुल्या बाजारात विकावा लागत आहे. आता संपूर्ण कापूस व्यापाºयांकडे गेल्यानंतर ही केंद्रे सुरु करणार का असा संतप्त सवाल शेतकºयांनी उपस्थित केला आहे.ही केंद्रे सुरू करण्याबाबत पणन महासंघाकडे संपर्क साधला तर दारव्हा सीसीआयकडे असल्याचे सांगण्यात येते तर सीसीआयचे अधिकारी स्टाफ नसल्याचे कारण पुढे करतात. या दोन्ही एजंसीकडून अशा प्रकारे टोलवाटोलवी सुरू असून यात शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने चालू हंगामातील शेतमालाची किमान आधारभूत किंमत जाहीर केल्यानंतर या किंमतीने माल विकण्याकरतिा मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी करून मालाची आॅन लाईन नोंदणी करण्याचे आवाह केले होते. त्यानुसार शेतकरी नोंदणीसाठी गर्दी करीत आहे.दारव्हा तालुक्यात दारव्हा व बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेंटरवर यापूर्वी ही खरेदी केली जात होती मात्र यावर्षी हे दोनही सेंटर सुरु झाले नाही.यासंदर्भात राज्य कापुस उत्पादक पणन महासंघाच्या यवतमाळ येथील कार्यालयात विचारणा केली असता दारव्हा सेंटर सीसीआयकडे असल्याचे सांगून त्यांनी हात झटकले आणि सीसीआयचे अधिकारी त्यांच्याकडे पुरेसा स्टाफ नाही असे सांगतात. त्यांनी पूर्वीच अधिकारी, कर्मचारी इतर राज्यातील सेंटरवर पाठविल्याचे समजते. त्यामुळे दारव्हा तालुक्यातील कापुस केंद्र की राज्य सरकारच्या एजंसीने खरेदी करावा असा पेच निर्माण झाला आहे. इकडे शासकीय खरेदी केंद्र उघडण्यास मोठव विलंब होत असल्यामुळे शेतकºयांसमोर अडचण निर्माण झाली आहे. नाईलाजास्तर शेतकरी खाजगी व्यापाºयाकडे कापुस विक्रीला आणत आहे. व्यापारी अशावेळी मनमानी भावाने शेतकºयांकडून कापसाची खरेदी करतात.काही दिवसांपासून कापसाची आवक वाढल्याने खुल्या बाजारात तेजी असून व्यापारी वर्गाची चांगली मौज आहे. शेतकºयांचे मात्र नुकसान होत आहे. यामुळे तात्काळ शासकीय कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी आहे.कापसाची आॅनलाईन नोंदणी नाहीशासनातर्फे एकीकडे शेतमाल विक्रीकरिता आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र बाजार समितीने अद्याप नोंदणी सुरु केली नाही. बाजार समिती प्रशासनाने सीसीआयच्या अधिकाºयांकडे नोंदणी संदर्भात विचारणा केली असता त्यांना नोंदणी करून घ्या मात्र शेतकºयांना कापूस विकायला आर्णीच्या केंद्रावर पाठवा असे सांगण्यात आले.त्यामुळे ही नोंदणी सुरु झाली नाही.