शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

खासगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:19 IST

महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार मंगळवारपासून संपावर गेल्याने खासगी वाहतुकदारांची चांदी झाली.

ठळक मुद्देसंपाचा फायदा : दुप्पट प्रवास भाडे आकारणी, वणी आगाराला तीन लाखांचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार मंगळवारपासून संपावर गेल्याने खासगी वाहतुकदारांची चांदी झाली. वणी आगारातून एकही बस सोडण्यात न आल्याने एकीकडे प्रवाशांचे चांगलेच हाल झालेत, तर दुसरीकडे प्रवाशांची गरज हेरून खासगी प्रवासी वाहतुकदारांनी त्यांची चांगलीच लूट केली. कुणी दुप्पट, कुणी तिप्पट तर कुणी चौपट भाडे आकारून प्रवाशांचे खिसे रिकामे केले. या संपामुळे वणी आगाराला मंगळवारी सुमारे तीन लाखांचा फटका बसला.वणी आगारात २८१ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांपैकी २५० कर्मचारी संपात उतरले आहेत. परिणामी मंगळवारी सकाळपासून वणी आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. मंगळवारपासून हे कर्मचारी संपावर उतरणार आहेत, याची कल्पना नसलेले शेकडो प्रवासी सकाळी वणी बसस्थानक परिसरात आलेत. मात्र एसटी कर्मचारी संपात उतरल्याची माहिती मिळाल्याने या प्रवाशांनी खासगी वाहनांचा प्रवासासाठी आधार घेतला. शाळांना सुट्या असल्याने व दिवाळीच्या सणाला प्रारंभ झाल्याने वणी बसस्थानकावर दररोज प्रवाशांची मोठी गर्दी होते. मात्र मंगळवारी संपामुळे या प्रवाशांची चांगलीच गोची झाली. वणी-वरोरा या मार्गाचे प्रवास भाडे २५ रुपये आहे. मात्र प्रवाशांची गरज हेरून अनेक आॅटो चालकांनी वणी-वरोरा मार्गासाठी ५० रुपये घेतले. घोन्सा ते झरी या १८ किलोमिटर अंतराचे एसटी भाडे २३ रुपये आहे. मात्र आॅटो चालकांनी प्रत्येकी १०० रुपये प्रवाशांकडून वसुल केले. यामुळे खासगी वाहतूकदारांची दिवाळीच साजरी झाली.संपात उतरलेल्या येथील कर्मचाºयांनी सकाळी घोषणाबाजी करीत निदर्शने केली. त्यानंतर दिवसभर आगार परिसरात भजनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळपर्यंत हा संप सुरूच होता. मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा फिस्कटल्याने मागणीच्या पूर्ततेसाठी एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. होत असलेला त्रास लक्षात घेता सदर संप मिटावा, अशी जनभावना आहे.अन् त्या बसला परत पाठविलेसंप सुरू असताना मंगळवारी सकाळी यवतमाळ येथून महामंडळाची एक बस वणी येथे पोहचताच, संतप्त संपकरी कामगारांनी सदर बस अडवून चालकाची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर ही बस वणीच्या आगारात लावण्यात आली. वातावरण शांत झाल्यानंतर बस यवतमाळ येथे परत पाठविण्यात आली.वणी आगारात एकूण २८१ कर्मचारी असून त्यांपैकी २५० लोक संपात उतरले आहे. परिणामी वणी आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. मंगळवारचा हा संप शंभर टक्के यशस्वी झाला.-अभिजीत कोरटकर,आगार व्यवस्थापक वणी