शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

‘नाम’ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर

By admin | Updated: January 11, 2017 00:31 IST

शेतकऱ्यांनी संकटाला न घाबरता परिश्रमातून शेती पिकविली पाहिजे. परिश्रम केल्यानंतर संकट आलेच तर न घाबरता त्याच्याशी दोन हात करता आले पाहजे.

मकरंद अनासपुरे : दिग्रस येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा दिग्रस : शेतकऱ्यांनी संकटाला न घाबरता परिश्रमातून शेती पिकविली पाहिजे. परिश्रम केल्यानंतर संकट आलेच तर न घाबरता त्याच्याशी दोन हात करता आले पाहजे. याउपरही आत्महत्या करण्यासारखी वेळ आली तर नाम फाऊंडेशन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेते तथा ‘नाम’ फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी येथे केले. ईश्वर देशमुख कृषी तंत्रनिकेतन आणि डेअरी टेक्नॉलॉजीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी भूषण कांतराव झरीकर, अर्चना मेहरकर, छाया राठोड, स्वप्नील देशमुख, सतीश इथापे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, विजय बंग, रवींद्र अरगडे, अ‍ॅड़ सुधाकर जाधव, प्रा. प्रेम राठोड उपस्थित होते. यावेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना साडी-चोळी व मदतीचे वितरण करण्यात आले. तसेच ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे डेहणी येथील रानडुकराच्या हल्ल्यात जखमी गजानन इहरे या शेतकऱ्याला १५ हजार रुपयांचा धनादेश नाम फाऊंडेशनतर्फे देण्यात आला. त्यानंतर दुर्गामाता संस्थेव्दारा संचालित शाळा व महाविद्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ११ मुलींना मोफत शिक्षण तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. ईश्वर फाऊंडेशनच्या संयोजिका वैशाली देशमुख यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या विविध खेळ व स्पर्धेतील विजेत्यांना मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते १० महिलांना मानाची पैठणी व बक्षीस देण्यात आले. संचालन कपील बोरुंदीया व गिरीश बोबडे तर आभार राजू ढोले यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)