शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

‘नाम’ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर

By admin | Updated: January 11, 2017 00:31 IST

शेतकऱ्यांनी संकटाला न घाबरता परिश्रमातून शेती पिकविली पाहिजे. परिश्रम केल्यानंतर संकट आलेच तर न घाबरता त्याच्याशी दोन हात करता आले पाहजे.

मकरंद अनासपुरे : दिग्रस येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा दिग्रस : शेतकऱ्यांनी संकटाला न घाबरता परिश्रमातून शेती पिकविली पाहिजे. परिश्रम केल्यानंतर संकट आलेच तर न घाबरता त्याच्याशी दोन हात करता आले पाहजे. याउपरही आत्महत्या करण्यासारखी वेळ आली तर नाम फाऊंडेशन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेते तथा ‘नाम’ फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी येथे केले. ईश्वर देशमुख कृषी तंत्रनिकेतन आणि डेअरी टेक्नॉलॉजीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी भूषण कांतराव झरीकर, अर्चना मेहरकर, छाया राठोड, स्वप्नील देशमुख, सतीश इथापे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, विजय बंग, रवींद्र अरगडे, अ‍ॅड़ सुधाकर जाधव, प्रा. प्रेम राठोड उपस्थित होते. यावेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना साडी-चोळी व मदतीचे वितरण करण्यात आले. तसेच ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे डेहणी येथील रानडुकराच्या हल्ल्यात जखमी गजानन इहरे या शेतकऱ्याला १५ हजार रुपयांचा धनादेश नाम फाऊंडेशनतर्फे देण्यात आला. त्यानंतर दुर्गामाता संस्थेव्दारा संचालित शाळा व महाविद्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ११ मुलींना मोफत शिक्षण तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. ईश्वर फाऊंडेशनच्या संयोजिका वैशाली देशमुख यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या विविध खेळ व स्पर्धेतील विजेत्यांना मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते १० महिलांना मानाची पैठणी व बक्षीस देण्यात आले. संचालन कपील बोरुंदीया व गिरीश बोबडे तर आभार राजू ढोले यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)