शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींसाठी लगबग

By admin | Updated: January 23, 2015 00:06 IST

येत्या मे आणि सप्टेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक लवकरच घेतली जाणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच गाव पुढारयांची लगबग सुरू झाली आहे.

वणी : येत्या मे आणि सप्टेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक लवकरच घेतली जाणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच गाव पुढारयांची लगबग सुरू झाली आहे. परिणामी ग्रामीण भागात ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे.वणी तालुक्यातील जवळपास ३८ ग्रामपंचायतींची मुदत येत्या ७ मे रोजी संपणार आहे. त्यानंतर ७ सप्टेंबरपर्यंत आणखी ४४ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यासाठी दोन टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्याची निवडणूक विभागाने तयारी केली आहे. त्यासाठी प्रथम प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले. महिलांचे आरक्षणही घोषित झाले आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांसाठी आरक्षित प्रभागांची यादी तयार झाली आहे. आता या ३८ ग्रामपंचायतींसाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या ३८ ग्रामपंचायतींमध्ये बेसा, बेलोरा, भालर, चिंचोली, दहेगाव (घोन्सा), कवडशी, कुंभारखणी, लालगुडा, लाठी, मानकी, मारेगाव (कोरंबी), मोहोर्ली, मुर्धोनी, नायगाव (खु.), नायगाव (बु.), नवरगाव, निलजई, निवली, पेटूर, पिंपळगाव, परसोडा, पिंपरी (कायर), पुनवट, पुरड, रासा, सावंगी, सावर्ला, शेलू (बु.), शिरपूर, सोनेगाव, सुकनेगाव, तरोडा, उकणी, उमरी, विरकुंड, वाघदरा आणि वडजापूर या ३८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये सुकनेगाव, सावर्ला, मानकी, दहेगाव, घोन्सा, सावंगी, वडजापूर, उकणी, नायगाव, रासा, लालगुडा, शिरपूर आदी मोठ्या आणि ग्रामीण पुढाऱ्यांच्या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यापैकी काही गावांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आहेत. येत्या दोन वर्षात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचीही निवडणूक येणार आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी या ग्रामपंचायत निवडणुकीकडे पुढील रणनिती म्हणून बघत आहे. पुढील दृष्टिकोनातून ही ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक गावपुढाऱ्यांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. या गाव पुढाऱ्यांची त्यांच्याच गावात किती पत आहे, हे ही निवडणूक स्पष्ट कणार आहे. परिणामी गावपुढारी आत्तापासूनच निवडणुकीच्या लगबगीत दिसून येत आहे. अनेकांनी त्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. प्रभागनिहाय उमेदवारांचा शोध घेणे सुरू केले आहे. विविध प्रवर्गातील उमेदवारांना निवडणुकीसाठी तयार केले जात आहे. गावातील मातब्बर आपल्यासोबत राहावे म्हणून गाव पुढारी त्यांची मनधरणी करीत आहे. वणी विधानसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आता भाजपाच्या गाव पुढाऱ्यांची खरी कसोटी लागणार आहे. अनेकांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या गावातील मताधिक्य आपल्यामुळेच मिळाल्याचे त्यावेळी ठासून सांगितले होते. आता त्यांची खरी पत दिसून येणार आहे. त्यामुळे गावपुढारी आत्तापासूनच निवडणूक रणनिती आखत आहे. या निवडणुकीमुळे सर्वच पक्षीय गावपुढारी पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. गावावर वर्चस्व प्राप्त करून त्यांना आपापल्या पक्षातील स्थान अधिक मजबूत करावयाचे आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)फेब्रुवारी, मार्चमध्ये होणार मतदान, ४४ ग्रामपंचायतींचे मतदान आॅगस्टमध्ये येत्या ७ मेपर्यंत मुदत संपणाऱ्या गा्रमपंचायतीसाठी येत्या फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. अद्याप त्याबाबतचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम घोषित झाला नाही. तथापि जिल्हाधिकारी लवकरच हा कार्यक्रम घोषित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावपुढाऱ्यांची धडधड वाढली आहे. येत्या दोन महिन्यात या निवडुकीमुळे ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापणार आहे. विशेष म्हणजे लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीप्रमाणे ही निवडणूक पक्षीय चिन्हावर लढवीली जात नाही. तथापि गावागावांतील राजकीय पक्षांचे गाव पुढारी आपल्या पक्षाचे समर्थक निवडून येण्यासाठी खटाटोप करतात. त्यावरच त्यांची गावातील पकडही दिसून येते. दुसऱ्या टप्प्यातील ४४ ग्रामपंचायतींसाठी येत्या सप्टेंबरमध्ये मतदान घेतले जाण्याची शक्यता आहे. या ग्रामपंचायतींची मुदत ७ सप्टेंबरला संपणार आहे. तत्पूर्वीच निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये ग्रामपंचायतीचा दुसरा निवडणूक टप्पा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील नेरड, नांदेपेरा, राजूर कॉलरी, मजरा, भांदेवाडा, मुंगोली, कोलगाव, तेजापूर, पठारपूर आदी महत्वाच्या गावांमध्ये निवडणूक होणार आहे. या गावांमध्ये नेहमी अतिशय चुरशीची निवडणूक होते, असे आजपर्यंत दिसून आले आहे.