शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

Lok Sabha Election 2019; ‘प्रहार’च्या उमेदवारासाठी दहा लाखांंची लोकवर्गणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:19 IST

दिग्गज राजकारणी माणिकराव ठाकरे, खासदारकीच्या चार टर्म पूर्ण करून पाचव्यांदा निवडणूक रिंगणात असलेल्या भावनाताई गवळी यांच्याशी सामना करण्यासाठी प्रहारने सामान्य कुटुंबातील शेतकरी विधवा वैशाली येडे यांना रिंगणात उतरविले आहे.

ठळक मुद्देशेतकरी विधवेला गावागावांत निवडणुकीसाठी अर्थसहाय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिग्गज राजकारणी माणिकराव ठाकरे, खासदारकीच्या चार टर्म पूर्ण करून पाचव्यांदा निवडणूक रिंगणात असलेल्या भावनाताई गवळी यांच्याशी सामना करण्यासाठी प्रहारने सामान्य कुटुंबातील शेतकरी विधवा वैशाली येडे यांना रिंगणात उतरविले आहे. या महिलेला समाजातून निवडणूक निधीसाठी मोठे अर्थसहाय मिळत असून अवघ्या सहा दिवसात तब्बल दहा लाखांची लोकवर्गणी गोळा झाली आहे. यावरून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कल लक्षात येतो आहे.आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली येडे यांना उमेदवारी दिली आहे. अंगणवाडी मदतनीस असलेल्या वैशाली शेतकरी विधवा आहेत. शेतकरी व शेतमजुरांचे दु:ख त्या जाणून आहेत. म्हणूनच त्यांना शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात थेट लोकसभेची उमेदवारी देण्याचा धाडसी निर्णय आमदार कडू यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयाला जनतेतून आणि विशेषत: शेतकरी कुटुंबांमधून तेवढाच प्रतिसादही मिळतो आहे. गरीब महिला उमेदवार असल्याने प्रचारासाठी निधी आणायचा कोठून याची चिंता प्रहार कार्यकर्त्यांना भेडसावत होती. अखेर त्यांनी यावर जेथे जेथे प्रचाराला जाऊ तेथे मदतनिधीसाठी झोळी फिरवू हा मार्ग निवडला. वैशाली येडे यांनी नामांकन दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासूनच प्रहार कार्यकर्त्यांनी झोळी फिरविली. सहाही विधानसभा मतदारसंघात प्रहार कार्यकर्ते बाजारात लोकवर्गणीचा मदतीचा डबा घेऊन फिरत आहे. त्याला व्यापारी, व्यावसायिक, सामान्य नागरिक एवढेच काय शाळकरी विद्यार्थीही मोठा प्रतिसाद देत आहेत. या झोळीतून अवघ्या सहा दिवसात पाच लाख रुपये तर बँक खात्यात पाच लाख असे एकूण दहा लाख रुपये वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी गोळा झाले आहे. लोकवर्गणी येणे अद्याप सुरुच आहे. या निधीमुळे प्रचाराला मोठा हातभार लागला. गावागावातून समाजातील तमाम घटक शेतकरी विधवा वैशाली येडे यांच्या उमेदवारीने प्रभावित झाले असून त्यांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला जात आहे.वैशाली यांना मध्यवर्गीय व गोरगरीब कुटुंबाकडून मदत मिळत असल्याने त्यांची मतांमधील व्याप्ती वाढते आहे. ही व्याप्ती काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा ठरते आहे. कारण प्रहारच्या उमेदवारामुळे युती व आघाडीच्या मतांमध्ये विभाजन होणार आहे. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी कार्यक्षेत्र वाटून घेतले आहे. बैलगाडीतून एन्ट्री, झोळी या प्रचाराच्या वेगळ्या पद्धतीमुळे प्रहारचा उमेदवार लक्षवेधक ठरला आहे. लोकवर्गणीतून मिळणारा हा प्रतिसाद ११ एप्रिलला मतपेटीतही पूर्णत: मिळतो का याकडे नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019