शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

Lok Sabha Election 2019; ‘प्रहार’च्या उमेदवारासाठी दहा लाखांंची लोकवर्गणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:19 IST

दिग्गज राजकारणी माणिकराव ठाकरे, खासदारकीच्या चार टर्म पूर्ण करून पाचव्यांदा निवडणूक रिंगणात असलेल्या भावनाताई गवळी यांच्याशी सामना करण्यासाठी प्रहारने सामान्य कुटुंबातील शेतकरी विधवा वैशाली येडे यांना रिंगणात उतरविले आहे.

ठळक मुद्देशेतकरी विधवेला गावागावांत निवडणुकीसाठी अर्थसहाय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिग्गज राजकारणी माणिकराव ठाकरे, खासदारकीच्या चार टर्म पूर्ण करून पाचव्यांदा निवडणूक रिंगणात असलेल्या भावनाताई गवळी यांच्याशी सामना करण्यासाठी प्रहारने सामान्य कुटुंबातील शेतकरी विधवा वैशाली येडे यांना रिंगणात उतरविले आहे. या महिलेला समाजातून निवडणूक निधीसाठी मोठे अर्थसहाय मिळत असून अवघ्या सहा दिवसात तब्बल दहा लाखांची लोकवर्गणी गोळा झाली आहे. यावरून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कल लक्षात येतो आहे.आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली येडे यांना उमेदवारी दिली आहे. अंगणवाडी मदतनीस असलेल्या वैशाली शेतकरी विधवा आहेत. शेतकरी व शेतमजुरांचे दु:ख त्या जाणून आहेत. म्हणूनच त्यांना शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात थेट लोकसभेची उमेदवारी देण्याचा धाडसी निर्णय आमदार कडू यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयाला जनतेतून आणि विशेषत: शेतकरी कुटुंबांमधून तेवढाच प्रतिसादही मिळतो आहे. गरीब महिला उमेदवार असल्याने प्रचारासाठी निधी आणायचा कोठून याची चिंता प्रहार कार्यकर्त्यांना भेडसावत होती. अखेर त्यांनी यावर जेथे जेथे प्रचाराला जाऊ तेथे मदतनिधीसाठी झोळी फिरवू हा मार्ग निवडला. वैशाली येडे यांनी नामांकन दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासूनच प्रहार कार्यकर्त्यांनी झोळी फिरविली. सहाही विधानसभा मतदारसंघात प्रहार कार्यकर्ते बाजारात लोकवर्गणीचा मदतीचा डबा घेऊन फिरत आहे. त्याला व्यापारी, व्यावसायिक, सामान्य नागरिक एवढेच काय शाळकरी विद्यार्थीही मोठा प्रतिसाद देत आहेत. या झोळीतून अवघ्या सहा दिवसात पाच लाख रुपये तर बँक खात्यात पाच लाख असे एकूण दहा लाख रुपये वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी गोळा झाले आहे. लोकवर्गणी येणे अद्याप सुरुच आहे. या निधीमुळे प्रचाराला मोठा हातभार लागला. गावागावातून समाजातील तमाम घटक शेतकरी विधवा वैशाली येडे यांच्या उमेदवारीने प्रभावित झाले असून त्यांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला जात आहे.वैशाली यांना मध्यवर्गीय व गोरगरीब कुटुंबाकडून मदत मिळत असल्याने त्यांची मतांमधील व्याप्ती वाढते आहे. ही व्याप्ती काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा ठरते आहे. कारण प्रहारच्या उमेदवारामुळे युती व आघाडीच्या मतांमध्ये विभाजन होणार आहे. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी कार्यक्षेत्र वाटून घेतले आहे. बैलगाडीतून एन्ट्री, झोळी या प्रचाराच्या वेगळ्या पद्धतीमुळे प्रहारचा उमेदवार लक्षवेधक ठरला आहे. लोकवर्गणीतून मिळणारा हा प्रतिसाद ११ एप्रिलला मतपेटीतही पूर्णत: मिळतो का याकडे नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019