शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

Lok Sabha Election 2019; शिवसेनेला रस्त्यावरचे वैर धोकादायक काँग्रेसला सामाजिक तणावाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 21:36 IST

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतरही निवडणुकीत रंगत दिसत नाही. त्यामुळे स्थानिक समीकरणाचाच प्रभाव लोकसभेच्या मतदानावर राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पक्षीय उमेदवारांना स्थानिक राजकीय समीकरणाचा फटका अथवा फायदा होण्याची प्रत्येक शहरातील स्थिती वेगवेगळी आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांची भूमिका निर्णायक : सामाजिक संवेदनशील शहरात फिरु शकतो निकालयवतमाळ, कारंजा, पुसद ठरू शकतात निर्णायक

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतरही निवडणुकीत रंगत दिसत नाही. त्यामुळे स्थानिक समीकरणाचाच प्रभाव लोकसभेच्या मतदानावर राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पक्षीय उमेदवारांना स्थानिक राजकीय समीकरणाचा फटका अथवा फायदा होण्याची प्रत्येक शहरातील स्थिती वेगवेगळी आहे.यवतमाळ-वाशिम लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान हे यवतमाळ विधानसभेत आहेत. येथील तीन लाख ६३ हजार ६३८ मतदारांपैकी ७० टक्के मतदार एकट्या यवतमाळ शहरात आहे. यवतमाळातील पालिकेच्या राजकारणात शिवसेना-भाजप एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. या वैराचा फटका शिवसेना उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. दुसऱ्या क्रमांकाची मतदारसंख्या वाशिम मतदारसंघात आहे. तेथे तीन लाख ४० हजार ८०२ मतदार आहेत. यातील ६० टक्के मतदार वाशिम शहरात आहे. या ठिकाणी सामाजिक समीकरणांचा फटका बसण्याची शक्यता आहे. येथेही सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये अगदी रस्त्यावरचे वैर आहे. मतदान काढताना याचा प्रभाव पडल्यास युतीच्या उमेदवाराला मायनस करू शकतो. कारंजा शहरात विधानसभेतील ४० टक्के मतदार आहेत. सामाजिक दृष्ट्या संवेदनशील शहर असून त्याचा प्रभाव राहणार आहे. एका गटाकडे किंवा समाजाकडे गेल्यास दुसरा गट व समाज उमेदवारापासून दूर होतो. याचा फटका आघाडीतील उमेदवाराला बसण्याची चिन्हे आहेत. दिग्रस शहरात आघाडीच्या उमेदवाराला अल्पसंख्यक घटकातून अपेक्षित मदत मिळण्याची चिन्हे नाहीत. उलट दिग्रस व दारव्हा येथे काही प्रमाणात सहानुभूतीची लाट तयार होत आहे. राळेगाव व कळंब या दोन तालुक्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी विधवेबद्दल वेगळे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे युती व आघाडीच्या उमेदवाराला येथे चांगला संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. पुसदमध्ये ‘नाईक पॅटर्न’ किती यशस्वी होतो यावर आघाडीचे भवितव्य आहे. येथे समाज म्हणून मतदान झाल्यास अपक्षाला ताकद मिळण्याची चिन्हे आहेत.युती, आघाडीपुढे प्रहार, वंचित, भाजप बंडखोराचे आव्हानशिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा रिंगणात आहेत. त्यांना यापूर्वी २००९ व २०१४ मध्ये राळेगाव विधानसभेतून भक्कम आघाडी मिळाली होती. दिग्रस विधानसभेतही युतीचे गणित जुळले होते. या निवडणुकीत परिस्थिती बदलली असून येथे ग्राफ खाली येण्याची भीती आहे.आघाडीचे माणिकराव ठाकरे यांच्या मुलाला २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. आता विभाजनाचा फटका यवतमाळ शहरात कमी होण्याची चिन्हे आहेत. तसेच भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधील वैराचा फायदा होऊ शकतो.प्रहार की अपक्ष प्रहार जनशक्तीच्या शेतकरी विधवा आणि समाज आणि धनशक्तीसह युतीतील नेत्यांचा छुपा पाठिंबा यावर अपक्ष उमेदवार आपला क्रमांक वाढविण्यासाठी लढत देऊ शकतो. यांना ग्रामीण मतदारांची साथ लाभण्याची स्थिती आहे. या दोनही उमेदवारांकडून प्रचार मोहीम जोरात राबविली जात आहे. यासाठी विविध माध्यमे वापरण्यात येत आहे.2009राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, वाशिम या चार मतदारसंघातून शिवसेनेला भक्कम लिड मिळाली होती.2014पुसद वगळता मोदी लाटेत राळेगाव, कारंजा, वाशिम, यवतमाळ येथे सेनेचा लिड वाढला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिम