शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

भांब आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले

By admin | Updated: July 3, 2016 02:30 IST

आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा अनुभव शनिवारी भांब येथील नागरिकांना आला. डायरियाची लागण झालेल्या ...

नागरिकांत रोष : डायरियाच्या रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळहिवरी : आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा अनुभव शनिवारी भांब येथील नागरिकांना आला. डायरियाची लागण झालेल्या रुग्णांना या गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचार मिळू शकले नाही. परिणामी गंभीर अवस्थेतील १० रुग्ण यवतमाळ येथे हलविण्यात आले. अन्न पदार्थातून काही जणांना डायरियाची लागण झाली. यामध्ये वैष्णवी विलास काळे (५), रागिणी दिलीप देवरे (५), मारोती काळे (५०), यल्ला काळे (४५) आदींचा समावेश आहे. उपचारार्थ त्यांना सुरूवातीला भांब येथील आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नव्हते. केवळ परिचारिकांची उपस्थिती होती. त्यांनी रुग्णांवर उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे या रुग्णांना हिवरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. याठिकाणीही भांब उपकेंद्राचाच अनुभव नागरिकांना आला. वैद्यकीय अधिकारी नसल्याने सर्व रुग्ण यवतमाळ येथे हलविण्यात आले. भांब आणि हिवरी येथील आरोग्य केंद्राच्या कारभाराविषयी उपसरपंच सुनील डिवरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड यांच्याशी संपर्क केला. यावर त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सदर आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून आपला राग व्यक्त केला. या परिसरातील नागरिकांना नेहमीच चांगल्या आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागते. गंभीर रुग्णांवर कधीही उपचार केले जात नाही. यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला दिला जातो. या प्रकाराविषयी वरिष्ठ पातळीवरील अधिकारीही गंभीर नसल्याचे दिसून येते. सदर प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. (वार्ताहर)