शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

भांब आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले

By admin | Updated: July 3, 2016 02:30 IST

आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा अनुभव शनिवारी भांब येथील नागरिकांना आला. डायरियाची लागण झालेल्या ...

नागरिकांत रोष : डायरियाच्या रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळहिवरी : आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा अनुभव शनिवारी भांब येथील नागरिकांना आला. डायरियाची लागण झालेल्या रुग्णांना या गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचार मिळू शकले नाही. परिणामी गंभीर अवस्थेतील १० रुग्ण यवतमाळ येथे हलविण्यात आले. अन्न पदार्थातून काही जणांना डायरियाची लागण झाली. यामध्ये वैष्णवी विलास काळे (५), रागिणी दिलीप देवरे (५), मारोती काळे (५०), यल्ला काळे (४५) आदींचा समावेश आहे. उपचारार्थ त्यांना सुरूवातीला भांब येथील आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नव्हते. केवळ परिचारिकांची उपस्थिती होती. त्यांनी रुग्णांवर उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे या रुग्णांना हिवरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. याठिकाणीही भांब उपकेंद्राचाच अनुभव नागरिकांना आला. वैद्यकीय अधिकारी नसल्याने सर्व रुग्ण यवतमाळ येथे हलविण्यात आले. भांब आणि हिवरी येथील आरोग्य केंद्राच्या कारभाराविषयी उपसरपंच सुनील डिवरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड यांच्याशी संपर्क केला. यावर त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सदर आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून आपला राग व्यक्त केला. या परिसरातील नागरिकांना नेहमीच चांगल्या आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागते. गंभीर रुग्णांवर कधीही उपचार केले जात नाही. यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला दिला जातो. या प्रकाराविषयी वरिष्ठ पातळीवरील अधिकारीही गंभीर नसल्याचे दिसून येते. सदर प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. (वार्ताहर)