शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आमदारांना आढळले नांझा पीएचसीला कुलूप

By admin | Updated: February 20, 2015 01:47 IST

तालुक्यातील नांझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंगळवारी आमदार डॉ.अशोक उईके यांनी दिलेल्या भेटीत आरोग्य केंद्राला चक्क कुलूप लाऊन असल्याचे आढळून आले.

कळंब : तालुक्यातील नांझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंगळवारी आमदार डॉ.अशोक उईके यांनी दिलेल्या भेटीत आरोग्य केंद्राला चक्क कुलूप लाऊन असल्याचे आढळून आले. हा संतापजनक प्रकार नेहमीचाच असल्याची माहीती नागरिकांनी आमदार डॉ.उईके यांना दिली. उल्लेखनिय म्हणजे याबाबत वारंवार केलेल्या तक्रारींची जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांकडून दखलच घेतली जात नसल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.संजय दुधे व डॉ.मंजुषा अचिंतलवार कार्यरत आहे. परंतु हे दोन्ही अधिकारी यवतमाळवरुन आपला कारभार पाहतात. तेच नाही तर इतर कर्मचारीही मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे कधीही रुग्णालय वेळेवर उघडले जात नाही. केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर रुग्णांना वाऱ्यावर सोडले जाते. एवढ्यावरच ही स्थिती थांबत नाही, तर रुग्णांना तुसडेपणाची वागणूक दिली जाते. औषधोपचार व मार्गदर्शन व्यवस्थित व वेळेवर केल्या जात नाही, आदी संबधीच्या तक्रारी येथील नागरिकांनी आमसभेमध्ये आमदार डॉ.उईके यांच्यापुढे केल्या होत्या. त्यानंतर संबधित वैद्यकीय अधिकारी यांना समज देण्यात आली. कारभार सुधारविण्यासंबधी सुचित करण्यात आले. परंतु या स्थितीमध्ये कुठलीही सुधारणा करण्यात आली नव्हती.अशातच मंगळवारी आमदाराच्या आकस्मित भेटीत दवाखान्याला चक्क कुलूप होते. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. काही ठिकाणी विष्टाही करून ठेवण्यात आली होती. हा संतापजनक प्रकार पाहल्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. स्वाईन फ्लुमुळे आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असताना येथील आरोग्य यंत्रणा मात्र अतिशय बेपर्वावृत्तीने वागत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच स्वच्छता अभियानाचा फज्जा उडविण्याचे कामही येथील केंद्रातून होत आहे. त्यामुळे संबधितावर कडक कारवाई करून रुग्णांची प्रामाणिक सेवा घडावी, यासाठी आमदार डॉ.अशोक उईके यांनी गांभीर्याने लक्ष देऊन जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील भोंगळपणाचा प्रश्न केवळ जिल्ह्यातील वरिष्ठांपर्यंतच नव्हे तर आरोग्य मंत्री व मुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊन कायमस्वरुपी सोडवावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)समज दिल्यानंतरही सुधारणा नाहीयेथील दोन्ही वैद्यकीय अधिकारी व बहुतांश कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे अनेकदा रुग्णांना रुग्णसेवा वेळेवर मिळत नाही. तसेच इतर अनेक अनियमिततेमुळे संबधितांवर कारवाई करण्यासंबधीचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. तसेच कारवाईसंबधी स्मरणपत्रही देण्यात आले. परंतु वरिष्ठ पातळीवरुन दोषींवर कुठलीही कारवाई झाली नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी नागरिकांनी याबाबत आमसभेमध्ये आमदारांकडे या रुग्णालयाच्या कारभारासंदर्भात तक्रार केली होती, त्यानंतर रुग्णालयीन व्यवस्थापनाला समजही देण्यात आली होती. त्यानंतरसुद्धा रुग्णालयीन कामकाजात कोणतीही सुरधारणा करण्यात आली नव्हती, त्यामुळे हा प्रकार अतिशय गंभीर मानल्या जात आहे.