शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

‘मजीप्रा’ला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:13 IST

शहरातील चापडोह प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या बांगरनगर, विठ्ठलवाडी परिसरात बुधवारी सकाळी अकरा वाजता नळ आल्यानंतर काही मिनीटातच पुरवठा बंद झाला. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देकाही मिनिटांत गेले नळ : बांगरनगर, विठ्ठलवाडीवासीयांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील चापडोह प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या बांगरनगर, विठ्ठलवाडी परिसरात बुधवारी सकाळी अकरा वाजता नळ आल्यानंतर काही मिनीटातच पुरवठा बंद झाला. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. तिथे कोणीच जाबाबदार अधिकारी नसल्याने कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले.चापडोह प्रकल्पातील पाणीसाठा पूर्णत: आटल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. या भागात नियमित नळ येत नाही. शहरातील इतर भागात नियमित पाणी दिले जाते. केवळ बांगरनगर परिसरावरच अन्याय होत असल्याचा आरोप करत काँग्रेस नगरसेवक वैशाली सवाई, विशाल पावडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांनी धडक दिली. एकाच दिवशी दोन मोर्चे जीवन प्राधिकरणावर धडकले. शहरातील पाणी समस्या भीषण रूप धारण करत आहे.यावेळी छाया कुटेमाटे, मालती सातव, भारती येन्नावार, कुसुम स्थूल, नीलिमा रामगीरवार, मंदा वांद्रेकर, काजल गाडगे, पुष्पा बिहाडे, सुनीता तिवाडे, पुनम चव्हाण, स्वाती पाटील, सारिका बिडवे, संगीता सोनार, किरण संजय लांडे, सुवर्णा राखे, प्रज्ञा बिडवे, ज्योती शेंडे यांच्यासह पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांची उपस्थिती होती.