शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

‘लॉकडाऊन’ने मोडले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

दिग्रस शिवारात ऊस पीक घेण्यायोग्य जमिन असल्याने शेतकरी सुमारे १०० ते १५० एकरमध्ये काळ्या ऊसाची लागवड करतात. ऊसाची लागवड साधारणत: ऑक्टोबर महिन्यात करण्यात येत असून मार्च महिन्यापर्यंत त्याचे उत्पादन होते. लागवडीनंतर यावर्षी मार्च महिन्यात जेव्हा ऊस विक्री योग्य झाला त्यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्याने ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना मजुरच मिळाले नाही.

ठळक मुद्देरसवंती बंदचा फटका : पुढीलवर्षी पेरा घटण्याची शक्यता; यंदा लागवड खर्चही निघाला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी(रेल्वे) : नजीकच्या दिग्रस शिवारात शेतकरी काळ्या ऊसाची लागवड करून त्याचे उत्पन्न घेतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या संकटाने लॉकडाऊन असल्याने ऊस कापणीकरिता मजूर मिळत नसल्याने तसेच संचारबंदीमुळे बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शेतकरी हतबल अवस्थेत दिसत आहे.दिग्रस शिवारात ऊस पीक घेण्यायोग्य जमिन असल्याने शेतकरी सुमारे १०० ते १५० एकरमध्ये काळ्या ऊसाची लागवड करतात. ऊसाची लागवड साधारणत: ऑक्टोबर महिन्यात करण्यात येत असून मार्च महिन्यापर्यंत त्याचे उत्पादन होते. लागवडीनंतर यावर्षी मार्च महिन्यात जेव्हा ऊस विक्री योग्य झाला त्यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्याने ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना मजुरच मिळाले नाही. ऊस तोडणीसाठी बाहेर जिल्ह्यातून मजूर बोलविण्यात येत होते. पण, त्यांना देखील आणता आले नाही. शेतकरी ऊस नागपूर ,चंद्रपूर, वर्धा येथील बाजारपेठेत विक्रीकरिता नेत होते. तसेच रसवंतीसाठीही मोठ्याप्रमाणात ऊसाची मागणी असायची. पण, यावर्षी रसवंती सुरू न जाल्याने नाईलाजास्तव ऊस जनावरांना चारावा लागण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यावर्षी दिग्रस शिवारात १०० एकरवर ऊसाची लागवड झाली. त्यापैकी ५० एकरातील ऊस डिसेंबर, जानेवारी महिन्यापर्यंत विकल्या गेला व उर्वरित ५० एकरातील ऊस हा या विक्री करिता व पुन्हा लागवडीसाठी ठेवला होता. पण, लॉकडाऊनमुळे ऊस विक्री होवू न शकल्याने ऊस शेतातच वाळला. त्यामुळे उत्पन्न हाती येणार नाही.नुकसान भरपाईची मागणीऊसाला उठाव नसल्याने तसेच लॉकडाऊन असल्याने शेतकरी हताश झाले असून नियमित ऊस पीक घेणारे शेतकरी अन्य पिकाकडे वळल्याचे दिसून येत आहे. ऊसाच्या नुकसानीबाबत शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकºयांकडून होत आहे.५० एकर शेतातील पीक वाळलेलॉकडाऊनुमळे बाजारपेठा बंद असल्याने ऊसाला मागणी नसल्याने दिग्रस शिवारातील भुपेश देवतळे, नाना घोडे, आशिष देवतळे, मनोज गवते, मनोहर साठोणे, नामदेव घोडे, राजू देवतळे, दत्तू नखाते, सागर देवतळे, बंडू खडसे आदींसह अनेक शेतकºयांचा ५० एकरातील ऊस शेतातच वाळला असून नाईलाजास्तव त्यांना ऊस जनावरांना चारावा लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagricultureशेती