शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

‘लॉकडाऊन’ने मोडले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

दिग्रस शिवारात ऊस पीक घेण्यायोग्य जमिन असल्याने शेतकरी सुमारे १०० ते १५० एकरमध्ये काळ्या ऊसाची लागवड करतात. ऊसाची लागवड साधारणत: ऑक्टोबर महिन्यात करण्यात येत असून मार्च महिन्यापर्यंत त्याचे उत्पादन होते. लागवडीनंतर यावर्षी मार्च महिन्यात जेव्हा ऊस विक्री योग्य झाला त्यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्याने ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना मजुरच मिळाले नाही.

ठळक मुद्देरसवंती बंदचा फटका : पुढीलवर्षी पेरा घटण्याची शक्यता; यंदा लागवड खर्चही निघाला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी(रेल्वे) : नजीकच्या दिग्रस शिवारात शेतकरी काळ्या ऊसाची लागवड करून त्याचे उत्पन्न घेतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या संकटाने लॉकडाऊन असल्याने ऊस कापणीकरिता मजूर मिळत नसल्याने तसेच संचारबंदीमुळे बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शेतकरी हतबल अवस्थेत दिसत आहे.दिग्रस शिवारात ऊस पीक घेण्यायोग्य जमिन असल्याने शेतकरी सुमारे १०० ते १५० एकरमध्ये काळ्या ऊसाची लागवड करतात. ऊसाची लागवड साधारणत: ऑक्टोबर महिन्यात करण्यात येत असून मार्च महिन्यापर्यंत त्याचे उत्पादन होते. लागवडीनंतर यावर्षी मार्च महिन्यात जेव्हा ऊस विक्री योग्य झाला त्यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्याने ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना मजुरच मिळाले नाही. ऊस तोडणीसाठी बाहेर जिल्ह्यातून मजूर बोलविण्यात येत होते. पण, त्यांना देखील आणता आले नाही. शेतकरी ऊस नागपूर ,चंद्रपूर, वर्धा येथील बाजारपेठेत विक्रीकरिता नेत होते. तसेच रसवंतीसाठीही मोठ्याप्रमाणात ऊसाची मागणी असायची. पण, यावर्षी रसवंती सुरू न जाल्याने नाईलाजास्तव ऊस जनावरांना चारावा लागण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यावर्षी दिग्रस शिवारात १०० एकरवर ऊसाची लागवड झाली. त्यापैकी ५० एकरातील ऊस डिसेंबर, जानेवारी महिन्यापर्यंत विकल्या गेला व उर्वरित ५० एकरातील ऊस हा या विक्री करिता व पुन्हा लागवडीसाठी ठेवला होता. पण, लॉकडाऊनमुळे ऊस विक्री होवू न शकल्याने ऊस शेतातच वाळला. त्यामुळे उत्पन्न हाती येणार नाही.नुकसान भरपाईची मागणीऊसाला उठाव नसल्याने तसेच लॉकडाऊन असल्याने शेतकरी हताश झाले असून नियमित ऊस पीक घेणारे शेतकरी अन्य पिकाकडे वळल्याचे दिसून येत आहे. ऊसाच्या नुकसानीबाबत शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकºयांकडून होत आहे.५० एकर शेतातील पीक वाळलेलॉकडाऊनुमळे बाजारपेठा बंद असल्याने ऊसाला मागणी नसल्याने दिग्रस शिवारातील भुपेश देवतळे, नाना घोडे, आशिष देवतळे, मनोज गवते, मनोहर साठोणे, नामदेव घोडे, राजू देवतळे, दत्तू नखाते, सागर देवतळे, बंडू खडसे आदींसह अनेक शेतकºयांचा ५० एकरातील ऊस शेतातच वाळला असून नाईलाजास्तव त्यांना ऊस जनावरांना चारावा लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagricultureशेती