शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’ने मोडले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

दिग्रस शिवारात ऊस पीक घेण्यायोग्य जमिन असल्याने शेतकरी सुमारे १०० ते १५० एकरमध्ये काळ्या ऊसाची लागवड करतात. ऊसाची लागवड साधारणत: ऑक्टोबर महिन्यात करण्यात येत असून मार्च महिन्यापर्यंत त्याचे उत्पादन होते. लागवडीनंतर यावर्षी मार्च महिन्यात जेव्हा ऊस विक्री योग्य झाला त्यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्याने ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना मजुरच मिळाले नाही.

ठळक मुद्देरसवंती बंदचा फटका : पुढीलवर्षी पेरा घटण्याची शक्यता; यंदा लागवड खर्चही निघाला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी(रेल्वे) : नजीकच्या दिग्रस शिवारात शेतकरी काळ्या ऊसाची लागवड करून त्याचे उत्पन्न घेतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या संकटाने लॉकडाऊन असल्याने ऊस कापणीकरिता मजूर मिळत नसल्याने तसेच संचारबंदीमुळे बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शेतकरी हतबल अवस्थेत दिसत आहे.दिग्रस शिवारात ऊस पीक घेण्यायोग्य जमिन असल्याने शेतकरी सुमारे १०० ते १५० एकरमध्ये काळ्या ऊसाची लागवड करतात. ऊसाची लागवड साधारणत: ऑक्टोबर महिन्यात करण्यात येत असून मार्च महिन्यापर्यंत त्याचे उत्पादन होते. लागवडीनंतर यावर्षी मार्च महिन्यात जेव्हा ऊस विक्री योग्य झाला त्यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्याने ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना मजुरच मिळाले नाही. ऊस तोडणीसाठी बाहेर जिल्ह्यातून मजूर बोलविण्यात येत होते. पण, त्यांना देखील आणता आले नाही. शेतकरी ऊस नागपूर ,चंद्रपूर, वर्धा येथील बाजारपेठेत विक्रीकरिता नेत होते. तसेच रसवंतीसाठीही मोठ्याप्रमाणात ऊसाची मागणी असायची. पण, यावर्षी रसवंती सुरू न जाल्याने नाईलाजास्तव ऊस जनावरांना चारावा लागण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यावर्षी दिग्रस शिवारात १०० एकरवर ऊसाची लागवड झाली. त्यापैकी ५० एकरातील ऊस डिसेंबर, जानेवारी महिन्यापर्यंत विकल्या गेला व उर्वरित ५० एकरातील ऊस हा या विक्री करिता व पुन्हा लागवडीसाठी ठेवला होता. पण, लॉकडाऊनमुळे ऊस विक्री होवू न शकल्याने ऊस शेतातच वाळला. त्यामुळे उत्पन्न हाती येणार नाही.नुकसान भरपाईची मागणीऊसाला उठाव नसल्याने तसेच लॉकडाऊन असल्याने शेतकरी हताश झाले असून नियमित ऊस पीक घेणारे शेतकरी अन्य पिकाकडे वळल्याचे दिसून येत आहे. ऊसाच्या नुकसानीबाबत शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकºयांकडून होत आहे.५० एकर शेतातील पीक वाळलेलॉकडाऊनुमळे बाजारपेठा बंद असल्याने ऊसाला मागणी नसल्याने दिग्रस शिवारातील भुपेश देवतळे, नाना घोडे, आशिष देवतळे, मनोज गवते, मनोहर साठोणे, नामदेव घोडे, राजू देवतळे, दत्तू नखाते, सागर देवतळे, बंडू खडसे आदींसह अनेक शेतकºयांचा ५० एकरातील ऊस शेतातच वाळला असून नाईलाजास्तव त्यांना ऊस जनावरांना चारावा लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagricultureशेती