शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कोरोनात दगावलेल्या कर्जदारांना कर्जमाफी; बँकांना मागितला अहवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2022 11:00 IST

कोविडची झळ पोहोचलेल्या कुटुंबांच्या आशा पल्लवीत

यवतमाळ : कोरोना महामारीच्या संकटात अनेकांना आर्थिक अडचणी ओढवल्या. कुटुंबातील कर्ता पुरुष निघून गेला. अशांना दिलासा देण्याची घोषणा सरकारने केली होती; मात्र याची प्रतिपूर्ती झाली नाही. आता राज्य शासनाने सहकार विभाग व राष्ट्रीयीकृत बँका यांना कोरोनामुळे दगावलेल्या कर्जदारांची माहिती मागविली आहे. हा अहवाल मिळाल्यानंतरच शासनाकडून नेमकी कर्जमाफी कशा स्वरूपाची द्यायची हे निश्चित होणार आहे. या प्रक्रियेमुळे मात्र कोविडची झळ पोहोचलेल्या कुटुंबांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.

कोरोना महामारीने संपूर्ण जगालाच फटका बसला. जवळपास दीड वर्ष व्यवहार ठप्प झाले होते. या काळात नियमित कर्जदारही बँकांना कर्जाचे हप्ते भरू शकले नाही. नंतर मंदीची लाट उसळली. व्यवसायात अपेक्षित गती मिळायला बराचवेळ लागला. याच काळात कोरोनामुळे घरातील कर्त्यांचा बळी गेला. अशा कुटुंबाला आधार देण्यासाठी थकीत कर्जबाबत पुनरावलोकन केले जात आहे.

राज्य सरकारने जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठवून सर्व पतसंस्था, सहकारी बँका यांच्याकडे कोविड काळात दगावलेल्या थकीत कर्जदाराची माहिती मागविली आहे. त्यासाठी एक फॉर्मेट ठरवून दिला आहे. त्यात ही माहिती भरावी लागणार आहे. याच पद्धतीने राष्ट्रीयीकृत बँकांकडूनही माहिती गोळा केली जात आहे. अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडून राष्ट्रीयीकृत बँकेतील नोडल अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे.

थकीत कर्जदारांची आकडेवारी गोळा झाल्यानंतर कर्ज माफ करण्यासंदर्भात निर्णय होणार आहे. राज्य शासनाला कोविड काळातील कर्जदारांची संख्या आणि एकूण रक्कम किती याचे चित्र स्पष्ट होईल. त्यावरून माफीचा निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकारकडेही अर्थसहाय्याची मागणी करण्यात येणार आहे.

सहकार आयुक्तांचे पत्र मिळाले असून पतसंस्था, सहकारी बँक यांच्याकडून अशा थकीत कर्जदारांची माहिती मागविण्यात आली आहे. याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाईल.

- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

टॅग्स :GovernmentसरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ