शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

कोरोनात दगावलेल्या कर्जदारांना कर्जमाफी; बँकांना मागितला अहवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2022 11:00 IST

कोविडची झळ पोहोचलेल्या कुटुंबांच्या आशा पल्लवीत

यवतमाळ : कोरोना महामारीच्या संकटात अनेकांना आर्थिक अडचणी ओढवल्या. कुटुंबातील कर्ता पुरुष निघून गेला. अशांना दिलासा देण्याची घोषणा सरकारने केली होती; मात्र याची प्रतिपूर्ती झाली नाही. आता राज्य शासनाने सहकार विभाग व राष्ट्रीयीकृत बँका यांना कोरोनामुळे दगावलेल्या कर्जदारांची माहिती मागविली आहे. हा अहवाल मिळाल्यानंतरच शासनाकडून नेमकी कर्जमाफी कशा स्वरूपाची द्यायची हे निश्चित होणार आहे. या प्रक्रियेमुळे मात्र कोविडची झळ पोहोचलेल्या कुटुंबांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.

कोरोना महामारीने संपूर्ण जगालाच फटका बसला. जवळपास दीड वर्ष व्यवहार ठप्प झाले होते. या काळात नियमित कर्जदारही बँकांना कर्जाचे हप्ते भरू शकले नाही. नंतर मंदीची लाट उसळली. व्यवसायात अपेक्षित गती मिळायला बराचवेळ लागला. याच काळात कोरोनामुळे घरातील कर्त्यांचा बळी गेला. अशा कुटुंबाला आधार देण्यासाठी थकीत कर्जबाबत पुनरावलोकन केले जात आहे.

राज्य सरकारने जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठवून सर्व पतसंस्था, सहकारी बँका यांच्याकडे कोविड काळात दगावलेल्या थकीत कर्जदाराची माहिती मागविली आहे. त्यासाठी एक फॉर्मेट ठरवून दिला आहे. त्यात ही माहिती भरावी लागणार आहे. याच पद्धतीने राष्ट्रीयीकृत बँकांकडूनही माहिती गोळा केली जात आहे. अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडून राष्ट्रीयीकृत बँकेतील नोडल अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे.

थकीत कर्जदारांची आकडेवारी गोळा झाल्यानंतर कर्ज माफ करण्यासंदर्भात निर्णय होणार आहे. राज्य शासनाला कोविड काळातील कर्जदारांची संख्या आणि एकूण रक्कम किती याचे चित्र स्पष्ट होईल. त्यावरून माफीचा निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकारकडेही अर्थसहाय्याची मागणी करण्यात येणार आहे.

सहकार आयुक्तांचे पत्र मिळाले असून पतसंस्था, सहकारी बँक यांच्याकडून अशा थकीत कर्जदारांची माहिती मागविण्यात आली आहे. याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाईल.

- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

टॅग्स :GovernmentसरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ