शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

कोरोनात दगावलेल्या कर्जदारांना कर्जमाफी; बँकांना मागितला अहवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2022 11:00 IST

कोविडची झळ पोहोचलेल्या कुटुंबांच्या आशा पल्लवीत

यवतमाळ : कोरोना महामारीच्या संकटात अनेकांना आर्थिक अडचणी ओढवल्या. कुटुंबातील कर्ता पुरुष निघून गेला. अशांना दिलासा देण्याची घोषणा सरकारने केली होती; मात्र याची प्रतिपूर्ती झाली नाही. आता राज्य शासनाने सहकार विभाग व राष्ट्रीयीकृत बँका यांना कोरोनामुळे दगावलेल्या कर्जदारांची माहिती मागविली आहे. हा अहवाल मिळाल्यानंतरच शासनाकडून नेमकी कर्जमाफी कशा स्वरूपाची द्यायची हे निश्चित होणार आहे. या प्रक्रियेमुळे मात्र कोविडची झळ पोहोचलेल्या कुटुंबांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.

कोरोना महामारीने संपूर्ण जगालाच फटका बसला. जवळपास दीड वर्ष व्यवहार ठप्प झाले होते. या काळात नियमित कर्जदारही बँकांना कर्जाचे हप्ते भरू शकले नाही. नंतर मंदीची लाट उसळली. व्यवसायात अपेक्षित गती मिळायला बराचवेळ लागला. याच काळात कोरोनामुळे घरातील कर्त्यांचा बळी गेला. अशा कुटुंबाला आधार देण्यासाठी थकीत कर्जबाबत पुनरावलोकन केले जात आहे.

राज्य सरकारने जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठवून सर्व पतसंस्था, सहकारी बँका यांच्याकडे कोविड काळात दगावलेल्या थकीत कर्जदाराची माहिती मागविली आहे. त्यासाठी एक फॉर्मेट ठरवून दिला आहे. त्यात ही माहिती भरावी लागणार आहे. याच पद्धतीने राष्ट्रीयीकृत बँकांकडूनही माहिती गोळा केली जात आहे. अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडून राष्ट्रीयीकृत बँकेतील नोडल अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे.

थकीत कर्जदारांची आकडेवारी गोळा झाल्यानंतर कर्ज माफ करण्यासंदर्भात निर्णय होणार आहे. राज्य शासनाला कोविड काळातील कर्जदारांची संख्या आणि एकूण रक्कम किती याचे चित्र स्पष्ट होईल. त्यावरून माफीचा निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकारकडेही अर्थसहाय्याची मागणी करण्यात येणार आहे.

सहकार आयुक्तांचे पत्र मिळाले असून पतसंस्था, सहकारी बँक यांच्याकडून अशा थकीत कर्जदारांची माहिती मागविण्यात आली आहे. याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाईल.

- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

टॅग्स :GovernmentसरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ