शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

प्रकल्पग्रस्त जगताहेत वेठबिगारीचे जीणे

By admin | Updated: December 11, 2015 03:04 IST

आयुष्याची शिदोरी असलेली लाखमोलाची जमीन धरणात बुडाल्यानंतर शासन सुविधा देईल, अशी आशा असलेल्या बेंबळा प्रकल्पग्रस्ताची आता पुरती फसगत झाली आहे.

आरिफ अली बाभूळगावआयुष्याची शिदोरी असलेली लाखमोलाची जमीन धरणात बुडाल्यानंतर शासन सुविधा देईल, अशी आशा असलेल्या बेंबळा प्रकल्पग्रस्ताची आता पुरती फसगत झाली आहे. बेंबळेच्या कोणत्याही पुनर्वसन झालेल्या वसाहतीत फेरफटका मारला तरी आज प्रकल्पग्रस्ताचे हाल दिसून येतात. बहुतांश प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले असून वेठबिगारीचे जीणे जगत आहे.बाभूळगाव तालुक्यातील खडक सावंगा येथे महाकाय बेंबळा प्रकल्प साकारण्यात आला. ५० कोटींचा असलेला हा प्रकल्प दोन हजार कोटींवर जावून पोहोचला. मात्र अद्यापही या धरणग्रस्तांच्या समस्या कायम आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेली. त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. सुरुवातील कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शासकीय नोकरीत पाच टक्केच जागा प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे ते आश्वासनही फोल ठरले. बेंबळा प्रकल्पग्रस्तांच्या सुशिक्षित मुलांनी नोकरीकरिता आवश्यक असणारी वयोमर्यादाही ओलांडली आहे. मात्र त्यांना नोकरीत सामावल्या गेले नाही. आता एचबार झालेले अनेक प्रकल्पग्रस्त मोठ्या पदव्यॉ घेवूनही दुसऱ्या कामावर राबताना दिसत आहेत. धरणग्रस्तांसाठी असलेल्या नोकऱ्यांची किती वाट पाहावी लागेल, हा कळीचा मुद्दा आहे.धरणा धरणामुळे मोठे शेतकरी अल्पभूधारक झाले तर अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. अल्प मिळालेल्या मोबदल्यात इतरत्र शेती मिळू शकली नाही. त्यामुळे हाती आलेला पैसा खर्च झाला. यामुळे त्याला आता दुसऱ्याच्या मजुरीवर जाण्याशिवाय पर्याय ऊरला नाही. बेंबळा धरणाला तसा बुडित क्षेत्रातील नागरिकांचा प्रखर विरोध होता. नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी बाभूळगावात येवून धरणाविरोधात रणशिंग फुंकले होते, जंगी जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर प्रसिद्ध वकील राम जेठमलानी, माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी इतर धरणाची व्यथा यावेळी सांगितली होती. पंरतु सरकारपुढे कुणाचेही चालले नाही. आता वेळ निघून गेली. काळ कुणासाठी थांबत नाही. परंतु या धरणग्रस्तांच्या व्यथांना वाचा फोडायलाही कुणी येत नाही. न्यायालयात जाणे हा एकमेव पर्याय प्रकल्पग्रस्तांसमोर शिल्लक आहे.