शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
2
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
3
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
4
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
5
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
6
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
7
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
8
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
9
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
10
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
11
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
12
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
13
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
14
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
15
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
16
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
17
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
18
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
19
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
20
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

गाडेघाटातील आदिवासी जगताहेत उपेक्षिताचे जीणे

By admin | Updated: May 26, 2016 00:03 IST

राळेगाव तालुक्यातील गाडेघाट हे संपूर्ण आदिवासी समाजाचे गाव. विकास नावाची गोष्टच या गावाला माहीत नाही.

समस्यांची गर्दी : शासकीय योजनांचा पत्ता नाहीकिन्ही (जवादे) : राळेगाव तालुक्यातील गाडेघाट हे संपूर्ण आदिवासी समाजाचे गाव. विकास नावाची गोष्टच या गावाला माहीत नाही. या बाबी तर दूर मुलभूत सुविधाही त्यांना उपलब्ध होत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी शेतशिवार गाठावे लागते. एवढेच काय तर सदर गाव ज्या ग्रामपंचायत अंतर्गत येते तेथील सचिवाचेही कधी या गावाला दर्शन झाले नाही. समस्यांच्या गर्दीत हे गाव सापडले आहे. पिंपरी (सावित्री) या ग्रामपंचायत अंतर्गत गाडेघाट या गावाचा समावेश आहे. ग्रामपंचायतीकडून कुठल्याही योजनांचा लाभ या भागाला दिला जात नाही. वैयक्तिक सुविधाही पुरविल्या जात नाही. आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या या गावामध्ये गावकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी साधा हातपंपही नाही. गावशिवारात असलेल्या शेतातून पाणी आणावे लागते. सांडपाण्याच्या नाल्या नेमक्या आहे. त्याही कधी स्वच्छ केल्या जात नाही. कचऱ्याने भरलेल्या नालीमुळे दुर्गंधी वाढली आहे. ग्रामपंचायतीचा कर्मचारी कधीही या भागात फिरकत नाही. वीज खांबावर पथदिवे नाही. अंधाराचा सामना नागरिकांना करावा लागतो. पावसाळ्यात तर प्रचंड हाल सोसावे लागते. सर्वत्र पाणी साचून राहते. कालांतराने त्याचे रूपांतर गटारामध्ये होते. त्यात तयार होणारे डास आरोग्यासाठी घातक ठरते. पिंपरी(सावित्री) ग्रामपंचायतीला असलेल्या ग्रामसचिवाचे गाडेघाटकडे दुर्लक्षच नाही, तर त्यांचे कधी या गावाला दर्शनच झाले नाही. काम पडल्यास आदिवासी बांधवांना त्यांचा शोध घ्यावा लागतो. शासनाच्या विविध योजना पिंपरी(सावित्री)मध्येच जिरतात. पदाधिकारी आणि सचिवांना या गावाशी काहीएक देणे-घेणे नसल्याचे दिसून येते, असा आरोप या गावातील रामेश्वर सिडाम यांनी केला आहे. शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक शौचालय, सिंचन विहीर आदी योजनांची माहिती गावापर्यंत पोहोचत नाही. पात्र असूनही लाभ मिळत नाही. ग्रामपंचायतीमध्ये चौकशी केल्यास समाधानकारक उत्तर दिले जात नाही. परिणामी या गावातील नागरिकांना उपेक्षित जीणे जगावे लागत आहे. तालुका आणि जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर) राळेगाव तालुक्यातील गाडेघाट म्हणजे समस्यांचे माहेरघर अशी अवस्था झाली आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही कधीच पुढाकार घेत नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते. आमचा उपयोग केवळ मतदानापुरताच काय, असा सवाल आहे.