शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

विविधतेत जीवन व्यतीत करणे भारतीयांचे खास वैशिष्ट्य

By admin | Updated: June 20, 2017 01:19 IST

विविधता आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भाषा, धर्म, जात यामध्ये वेगळेपण असताना मानवतेच्या आणि आपण भारतीय आहोत

लाईक अहेमद : स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशनची इफ्तार पार्टी लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : विविधता आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भाषा, धर्म, जात यामध्ये वेगळेपण असताना मानवतेच्या आणि आपण भारतीय आहोत या भावनेने येथे एकदुसऱ्यांची मने जुळलेली आहेत. भारतीय समाज हजारो वर्षांपासून विविधतेमध्ये जगण्याची पद्धत जाणतो, असे प्रतिपादन एसआयओ विद्यार्थी संघटनेचे केंद्रीय सदस्य लाईक अहेमद खान (हैदराबाद) यांनी येथे केले. स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्यावतीने आयोजन इफ्तार पार्टीत ‘सांप्रदायिक सद्भाव आणि राष्ट्र निर्माण’ या विषयावर ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नामदेव ससाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, नगरपरिषद उपाध्यक्ष अरविंद भोयर, भाजपा शहराध्यक्ष महेश काळेश्वरकर, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, फिरोज अन्सारी, एसआयओचे अध्यक्ष शोएब इक्बाल उपस्थित होते. लाईक अहेमद म्हणाले, भारतीय संविधान जगातील सर्वात उत्तम संविधान आहे. राज्यघटनेने सर्व धर्म व संप्रदायांना मानणाऱ्या लोकांना धार्मिक स्वातंत्र दिले. सर्व जातीधर्मा दरम्यान बंधुत्व, शांती, सुरक्षा हे संविधानाचे मुळ आहे. त्यामुळे देश संविधानानेचे पुढे गेला पाहिेजे, असे ते म्हणाले. भारत धार्मिक लोकांचा देश आहे. येथी सर्व धर्माचे लोक आपली ओळख, संस्कृती अबाधित ठेऊन जीवन जगू इच्छितात हीच भारतीय लोकशाही असल्याचे त्यांनी सांगितले. रमजानमध्ये कुरआनचे अवतरण झाले. कुरआनपासून मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी नितीमत्ता व उच्च चरित्र्य आवश्यक आहे. त्याकरिता उपवास आहेत. उपसासात मनुष्य वाईट बाबींपासून व कामापासून वाचतो. कुरआनचे मार्गदर्शन प्राप्त करून त्यावर आचरण करण्यासाठी रोजे-उपवास हे प्रशिक्षण आहे. यामुळे मानवाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. पैगंबरांनी अरबस्थानात मनुष्य अल्लाह-ईश्वराच्या सदैव दृष्टिक्षेपात आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरूवात इरफान खान यांच्या कुरआन पठणाने झाली. प्रास्ताविक शोएब खान यांनी तर आभार काझी मलीक यांनी मानले.