शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पावसाने पिकांना जीवदान

By admin | Updated: August 5, 2015 00:16 IST

उपविभागात सोमवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मध्यरात्री पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली होती.

उपविभागात रिमझिम : कापूस-सोयाबीन उत्पादक सुखावलावणी : उपविभागात सोमवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मध्यरात्री पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली होती. मंगळवारी दुपारपर्यंत रिमझीम पाऊस सुरूच होता. या पावसामुळे कपाशी व सोयाबीनला जीवदान मिळाले आहे.सोमवारी मध्यरात्रीपासून तर मंगळवारी दुपारपर्यंत १० मीली पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मध्यरात्री अर्धा तास दमदार पाऊस व त्यानंतर रिमझीम पाऊस सुरूच होता. जवळपास गेल्या एक ते दीड महिन्यापासून पावसाने उपविभागात दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी कमालीचे चिंताग्रस्त झाले होते. पावसाअभावी कपाशी व सोयाबीनवर विविध अळींने आक्रमण केल्यामुळे पिकेही नष्ट व्हायला सुरूवात झाली होती. त्याचबरोबर तालुक्यातील कपाशी पिवळी पडून मरण्याच्या वाटेवर होती. ही परीस्थिती पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. पाणी येत नसल्याने डोळ्यादेखत शेतकऱ्यांचे पिके वाळायला लागली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कशबशी जगविलेली पिके वन्यप्राणी नष्ट करीत होते. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढतच चालली होती. दरम्यान सोमवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे या पिकांना आता जिवदानच मिळाले आहे. हा पाऊस कपाशी व सोयाबीन पिकासाठी पोषक असल्याने या पावसामुळे कपाशीची वाढ होणार आहे. पावसाअभावी अनेक पिकांनी माना टाकल्या होत्या. कपाशीची वाढ खुंटल्यामुळे पिके मरणाच्या वाटेवर होती. आता पाऊस झाल्याने या पिकांची परिस्थिती सुधरल्याचे दिसून येत होते. पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी आता पुन्हा मजुरांच्या शोधात भटकत आहे. आजपर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे मजुरांच्याही हाताला काम नव्हते. मजुरांनाही आर्थिक अडचण भेडसावत होती. परंतु पावसाने हजेरी लावल्यामुळे आता उर्वरीत शेती कामांना वेग येणार आहे. यावर्षी मजुरांची टंचाई भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांना बाहेर गावावरून शेतीकामासाठी मजुरांना वाहनाद्वारे आणावे लागत आहे. त्यामुळे त्यांना वाहनाचा अधिकचा भूर्दंडही सहन करावा लागतो. मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यातसुद्धा पावसाने मध्यरात्री हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून येत होते. येत्या दोन-चार दिवसात पाऊस आला नसता, तर पिकांची काय अवस्था झाली असती, याचा विचार न केलेलाच बरा. उशीरा का होईना शेवटच्या घटकात पावसाने हजेरी लावल्यामुळे पिके धोक्याबाहेर असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)