शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

पावसाने पिकांना जीवदान

By admin | Updated: August 5, 2015 00:16 IST

उपविभागात सोमवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मध्यरात्री पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली होती.

उपविभागात रिमझिम : कापूस-सोयाबीन उत्पादक सुखावलावणी : उपविभागात सोमवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मध्यरात्री पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली होती. मंगळवारी दुपारपर्यंत रिमझीम पाऊस सुरूच होता. या पावसामुळे कपाशी व सोयाबीनला जीवदान मिळाले आहे.सोमवारी मध्यरात्रीपासून तर मंगळवारी दुपारपर्यंत १० मीली पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मध्यरात्री अर्धा तास दमदार पाऊस व त्यानंतर रिमझीम पाऊस सुरूच होता. जवळपास गेल्या एक ते दीड महिन्यापासून पावसाने उपविभागात दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी कमालीचे चिंताग्रस्त झाले होते. पावसाअभावी कपाशी व सोयाबीनवर विविध अळींने आक्रमण केल्यामुळे पिकेही नष्ट व्हायला सुरूवात झाली होती. त्याचबरोबर तालुक्यातील कपाशी पिवळी पडून मरण्याच्या वाटेवर होती. ही परीस्थिती पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. पाणी येत नसल्याने डोळ्यादेखत शेतकऱ्यांचे पिके वाळायला लागली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कशबशी जगविलेली पिके वन्यप्राणी नष्ट करीत होते. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढतच चालली होती. दरम्यान सोमवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे या पिकांना आता जिवदानच मिळाले आहे. हा पाऊस कपाशी व सोयाबीन पिकासाठी पोषक असल्याने या पावसामुळे कपाशीची वाढ होणार आहे. पावसाअभावी अनेक पिकांनी माना टाकल्या होत्या. कपाशीची वाढ खुंटल्यामुळे पिके मरणाच्या वाटेवर होती. आता पाऊस झाल्याने या पिकांची परिस्थिती सुधरल्याचे दिसून येत होते. पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी आता पुन्हा मजुरांच्या शोधात भटकत आहे. आजपर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे मजुरांच्याही हाताला काम नव्हते. मजुरांनाही आर्थिक अडचण भेडसावत होती. परंतु पावसाने हजेरी लावल्यामुळे आता उर्वरीत शेती कामांना वेग येणार आहे. यावर्षी मजुरांची टंचाई भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांना बाहेर गावावरून शेतीकामासाठी मजुरांना वाहनाद्वारे आणावे लागत आहे. त्यामुळे त्यांना वाहनाचा अधिकचा भूर्दंडही सहन करावा लागतो. मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यातसुद्धा पावसाने मध्यरात्री हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून येत होते. येत्या दोन-चार दिवसात पाऊस आला नसता, तर पिकांची काय अवस्था झाली असती, याचा विचार न केलेलाच बरा. उशीरा का होईना शेवटच्या घटकात पावसाने हजेरी लावल्यामुळे पिके धोक्याबाहेर असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)