शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पिकांना जीवदान

By admin | Updated: August 5, 2015 00:16 IST

उपविभागात सोमवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मध्यरात्री पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली होती.

उपविभागात रिमझिम : कापूस-सोयाबीन उत्पादक सुखावलावणी : उपविभागात सोमवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मध्यरात्री पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली होती. मंगळवारी दुपारपर्यंत रिमझीम पाऊस सुरूच होता. या पावसामुळे कपाशी व सोयाबीनला जीवदान मिळाले आहे.सोमवारी मध्यरात्रीपासून तर मंगळवारी दुपारपर्यंत १० मीली पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मध्यरात्री अर्धा तास दमदार पाऊस व त्यानंतर रिमझीम पाऊस सुरूच होता. जवळपास गेल्या एक ते दीड महिन्यापासून पावसाने उपविभागात दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी कमालीचे चिंताग्रस्त झाले होते. पावसाअभावी कपाशी व सोयाबीनवर विविध अळींने आक्रमण केल्यामुळे पिकेही नष्ट व्हायला सुरूवात झाली होती. त्याचबरोबर तालुक्यातील कपाशी पिवळी पडून मरण्याच्या वाटेवर होती. ही परीस्थिती पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. पाणी येत नसल्याने डोळ्यादेखत शेतकऱ्यांचे पिके वाळायला लागली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कशबशी जगविलेली पिके वन्यप्राणी नष्ट करीत होते. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढतच चालली होती. दरम्यान सोमवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे या पिकांना आता जिवदानच मिळाले आहे. हा पाऊस कपाशी व सोयाबीन पिकासाठी पोषक असल्याने या पावसामुळे कपाशीची वाढ होणार आहे. पावसाअभावी अनेक पिकांनी माना टाकल्या होत्या. कपाशीची वाढ खुंटल्यामुळे पिके मरणाच्या वाटेवर होती. आता पाऊस झाल्याने या पिकांची परिस्थिती सुधरल्याचे दिसून येत होते. पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी आता पुन्हा मजुरांच्या शोधात भटकत आहे. आजपर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे मजुरांच्याही हाताला काम नव्हते. मजुरांनाही आर्थिक अडचण भेडसावत होती. परंतु पावसाने हजेरी लावल्यामुळे आता उर्वरीत शेती कामांना वेग येणार आहे. यावर्षी मजुरांची टंचाई भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांना बाहेर गावावरून शेतीकामासाठी मजुरांना वाहनाद्वारे आणावे लागत आहे. त्यामुळे त्यांना वाहनाचा अधिकचा भूर्दंडही सहन करावा लागतो. मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यातसुद्धा पावसाने मध्यरात्री हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून येत होते. येत्या दोन-चार दिवसात पाऊस आला नसता, तर पिकांची काय अवस्था झाली असती, याचा विचार न केलेलाच बरा. उशीरा का होईना शेवटच्या घटकात पावसाने हजेरी लावल्यामुळे पिके धोक्याबाहेर असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)