शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

औटघटकेचे का होईना, दिवास्वप्न पूर्ण

By admin | Updated: September 21, 2014 00:03 IST

डोक्यावर पी कॅप अन् हातात केन, असा वर्दीचा रुबाब. खरे तर पोलीस खात्यात दाखल झाल्यापासूनच आपणही फौजदार व्हावे, असे प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वप्न असते. मात्र सेवानिवृत्ती उंबरठ्यावर येवूनही

यवतमाळ : डोक्यावर पी कॅप अन् हातात केन, असा वर्दीचा रुबाब. खरे तर पोलीस खात्यात दाखल झाल्यापासूनच आपणही फौजदार व्हावे, असे प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वप्न असते. मात्र सेवानिवृत्ती उंबरठ्यावर येवूनही हे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यासाठी अनुभव आणि सेवाज्येष्ठतेचा उपयोग होत नसल्याचे पाहून फौजदार होणे हे या कर्मचाऱ्यांसाठी तर दिवास्वप्नच. मात्र ते प्रत्यक्षात उतरले. विधासभा निवडणुकीने औटघटकेचे का होईना, जिल्हा पोलीस दलातील तब्बल ४० जणांना तात्पुरती फौजदार म्हणून नियुक्ती मिळाली. राज्याच्या पोलीस खात्यात फौजदारांची शेकडो पदे रिक्त आहेत. स्पर्धा परीक्षा व खात्यांतर्गत परीक्षा घेवूनही ही पदे रिक्तच राहिली. विधानसभा निवडणूक बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर ही पदे रिक्त ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे गृह विभागाने त्यावर तोडगा काढत सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना निवडणूक काळापुरती म्हणजेच तात्पुरती फौजदारकी बहाल करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आस्थापना विभागाने अर्ज मागविले होते. जिल्हा पोलीस दलात कार्यरत तब्बल १२२ सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी तात्पुरते फौजदार म्हणून नियुक्ती मिळावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्याकडे अर्ज केले. हे अर्ज अमरावती परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आले. पोलीस महानिरीक्षक बिपिन बिहारी यांनी त्यातील ४० जणांना तात्पुरते फौजदार म्हणून नियुक्ती देण्याचे आदेश काढले. हे आदेश शनिवारी सकाळी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले. त्यामध्ये सध्या मिळत असलेले वेतन आणि भत्ते यावरच तात्पुरते फौजदार म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. तसेच भविष्यात शासनाने निर्णय घेतल्यास कायमस्वरूपी फौजदारी दिली जावू शकते असेही नमूद आहे. आदेशात आपले नाव असल्याचे पाहून अनेकांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. औट घटकेचे का होईना, फौजदार होण्याचे दिवास्वप्न पुरे झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. (स्थानिक प्रतिनिधी)