शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
7
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
8
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
9
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
10
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
11
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
12
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
13
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
14
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
15
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
16
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
17
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
18
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
19
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
20
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
Daily Top 2Weekly Top 5

असाह्य मजुरांचा जीवघेणा प्रवास थांबता थांबेना..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST

शहरातील रोजगार गेल्याने मजुर आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले. सुरूवातीला ट्रकमध्ये लपूनछपून हे मजूर प्रवास करीत होते. त्यांची तपासणी करून नंतर त्यांना सोडण्यात येत होते. मजुरांनी न थांबता पायीच रस्ता धरला आणि जीव गेला तरी बेहत्तर पण आपल्या गावी जाणार, असा निर्धार करीत हजारो मैलांचा पायी प्रवास या मजुरांनी सुरूच ठेवला.

ठळक मुद्देस्वगृही जाण्याची आस : रखरखत्या उन्हात हजारो मैल पायी प्रवास, हालअपेष्टांनी मजूर जेरीस, मदतही मिळेना

प्रवीण पिन्नमवार ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : सर्वत्र लॉकडाउन, त्यात रखरखते ऊन, रस्त्याने ना खाण्याची ना पिण्याच्या पाण्याची सोय. खिशात दमडी नाही. माय-बापाच्या कडेवर चिमुकली लेकरं, डोक्यावर प्रपंचाच ओझं, जागोजागी चौकशीचा त्रास, पायी चालून चालून क्षीण झालेले शरीर. कुठे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाची छाया, कधी ट्रकमधून लपूनछपून प्रवास. कधी पायी, मिळेल त्या वाहनात बसून आपल्या गावी जाण्याची आस असलेल्या मजुरांचा हजारो मैलांचा जीवघेणा प्रवास अद्याप थांबलेला नाही.हैद्राबादवरून मधप्रदेश, उत्तरप्रदेशकडे आपल्या गावी, मातृभूमीकडे निघालेल्या स्थलांतरीत मजुरांचे पांढरकवडा तालुक्यातून जाणारे असाह्य मजुरांचे लोेंढे व त्यांच्या यातना पाहून सारेच गलबलून जात आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशात लॉकडाऊन सुरू झाले. लॉकडाउनमुळे अनेक मजूर अडकून पडलेत. शहरातील रोजगार गेल्याने मजुर आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले. सुरूवातीला ट्रकमध्ये लपूनछपून हे मजूर प्रवास करीत होते. त्यांची तपासणी करून नंतर त्यांना सोडण्यात येत होते. मजुरांनी न थांबता पायीच रस्ता धरला आणि जीव गेला तरी बेहत्तर पण आपल्या गावी जाणार, असा निर्धार करीत हजारो मैलांचा पायी प्रवास या मजुरांनी सुरूच ठेवला. सुरूवातीला काही सामाजिक संस्थांनी, काही गावातील नागरिकांनी जेवण व पाण्याची सोय केली. परंतु मजुरांचे लोंढेच सुरू झाल्याने त्यांच्या मदतीला मर्यादा आल्या. प्रशासनच्यावतीने मजुरांचे स्तलांतर थांबविण्यासाठी काही ठिकाणी त्याची राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. दरम्यान, मजुरांचे पायी चालत जाणे सुरूच राहिले. ३०० ते ४०० मजुरांचे जथ्थे पायी चालत हैदराबाद येथून निघून पांढरकवडात पोहचले. कुणी पायी चालत होते, तर कुणी मिळेल त्या झाडाच्या सावलीत थांबून विसावा घेत आहेत. यातील अनेकजण उपाशीपोटी होते. काहींना पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नव्हते. काही वेळ थांबून बैतुल मधप्रदेशकडे ते रवाना झाले होते. असे मजूर दररोज पायीच चालत असताना दिसत आहेत. राज्या-राज्यात प्रवेशबंदी आहे. तरी या मजुरांना रोखणे अशक्यप्राय झाले आहे. हजारो मजूर एकत्र निघाले असताना कोरोना संसर्गाची भीती आहे. तरीसुद्धा मरू पण आपल्या गावी जाऊन मरू, असे म्हणत या मजुरांनी आपल्या गावी जाण्याची आस सोडली नाही. आता मजुरांना जाण्याबाबत काही नियम शिथिल झाले आहेत. काही ठिकाणी वैद्यकीय शिबीर सुरू आहे. त्या ठिकाणाहून मजुरांना वाहनांची व्यवस्था करण्यात येत असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Labourकामगार