शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

जीवन प्रमाण योजना राज्यातही लागू

By admin | Updated: December 4, 2015 02:40 IST

केंद्राच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी असलेल्या जीवन प्रमाण योजनेत सहभागी होण्याचा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने घेतला आहे.

डिजिटलायजेशन : निवृत्तांच्या हयात दाखल्याला ‘आधार’यवतमाळ : केंद्राच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी असलेल्या जीवन प्रमाण योजनेत सहभागी होण्याचा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने घेतला आहे. या योजनेत हयातीच्या दाखल्याच्या डिजिटलायेजशनची सुविधा उपलब्ध करून दिली जात असून केंद्राची ही ‘जीवन प्रमाण’ योजना राज्यातही लागू करण्याचा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने घेतला आहे.महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना आता हयातीच्या (जीवंत असल्याच्या) दाखल्यासंदर्भात डिजिटल सुविधा वित्त विभागाने लागू केली आहे. त्यामुळे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आपल्या संबंधित बँकेकडे हयातीचा दाखला लेखी स्वरुपात सादर करण्याची गरज नाही. परंतु डिजिटलायझेशनसाठी आधार क्रमांक अनिवार्य असल्याचे वित्त विभागाने म्हटले आहे. दरवर्षी साधारणत: नोव्हेंबर महिन्यात निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा फॉर्म आपल्या सबंधित बँकेकडे भरून द्यावा लागतो. ठराविक नमुन्यात हा फॉर्म भरणे अनिवार्य असते. फॉर्म भरून न दिल्यास सदर व्यक्ती हयात नसल्याचे समजून निवृत्तीवेतन बंद करण्यात येते. त्यामुळे दरवर्षी हा फॉर्म भरून देणे निवृत्तीवेतनधारकांसाठी गरजेचे आहे. आता यामध्ये वित्त विभागाने कमालीची सुधारणा केली आहे. सर्वच दाखले आॅनलाईन आणि डिझिटाईज होत असताना आता हयातीच्या फॉर्मचे देखिल डिझिटलायजेशन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला देण्याच्या दृष्टीने बायोेमेट्रीक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ‘जीवन प्रमाण’ ही संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीद्वारे निवृत्तीवेतन धारकाने केवळ त्याचे बोट अथवा डोळे स्कॅन करण्यासाठी असलेल्या यंत्राद्वारे स्कॅन करून घेतल्यास तो अद्याप जीवंत असल्याबाबत प्रमाणित करू शकतो. या संदर्भात राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना बायोमेट्रीक द्वारे हयातीचा दाखला देणे शक्य व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या जीवन प्रमाण योजनेमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांकडे आधार कार्ड क्रमांक असणे गरजेचे आहे. निवृत्तीवेतनधारकांसाठी ही योजना अतिशय सुटसुटीत आणि फायद्याची आहे. कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय केवळ आधार क्रमांकासह ते या योजनेत सहभागी होऊ शकतील. दरवर्षी लेखी स्वरुपात फॉर्म भरून देण्याच्या कटकटीतून त्यांची सुटका होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)