शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जीवन प्रमाण योजना राज्यातही लागू

By admin | Updated: December 4, 2015 02:40 IST

केंद्राच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी असलेल्या जीवन प्रमाण योजनेत सहभागी होण्याचा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने घेतला आहे.

डिजिटलायजेशन : निवृत्तांच्या हयात दाखल्याला ‘आधार’यवतमाळ : केंद्राच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी असलेल्या जीवन प्रमाण योजनेत सहभागी होण्याचा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने घेतला आहे. या योजनेत हयातीच्या दाखल्याच्या डिजिटलायेजशनची सुविधा उपलब्ध करून दिली जात असून केंद्राची ही ‘जीवन प्रमाण’ योजना राज्यातही लागू करण्याचा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने घेतला आहे.महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना आता हयातीच्या (जीवंत असल्याच्या) दाखल्यासंदर्भात डिजिटल सुविधा वित्त विभागाने लागू केली आहे. त्यामुळे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आपल्या संबंधित बँकेकडे हयातीचा दाखला लेखी स्वरुपात सादर करण्याची गरज नाही. परंतु डिजिटलायझेशनसाठी आधार क्रमांक अनिवार्य असल्याचे वित्त विभागाने म्हटले आहे. दरवर्षी साधारणत: नोव्हेंबर महिन्यात निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा फॉर्म आपल्या सबंधित बँकेकडे भरून द्यावा लागतो. ठराविक नमुन्यात हा फॉर्म भरणे अनिवार्य असते. फॉर्म भरून न दिल्यास सदर व्यक्ती हयात नसल्याचे समजून निवृत्तीवेतन बंद करण्यात येते. त्यामुळे दरवर्षी हा फॉर्म भरून देणे निवृत्तीवेतनधारकांसाठी गरजेचे आहे. आता यामध्ये वित्त विभागाने कमालीची सुधारणा केली आहे. सर्वच दाखले आॅनलाईन आणि डिझिटाईज होत असताना आता हयातीच्या फॉर्मचे देखिल डिझिटलायजेशन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला देण्याच्या दृष्टीने बायोेमेट्रीक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ‘जीवन प्रमाण’ ही संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीद्वारे निवृत्तीवेतन धारकाने केवळ त्याचे बोट अथवा डोळे स्कॅन करण्यासाठी असलेल्या यंत्राद्वारे स्कॅन करून घेतल्यास तो अद्याप जीवंत असल्याबाबत प्रमाणित करू शकतो. या संदर्भात राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना बायोमेट्रीक द्वारे हयातीचा दाखला देणे शक्य व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या जीवन प्रमाण योजनेमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांकडे आधार कार्ड क्रमांक असणे गरजेचे आहे. निवृत्तीवेतनधारकांसाठी ही योजना अतिशय सुटसुटीत आणि फायद्याची आहे. कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय केवळ आधार क्रमांकासह ते या योजनेत सहभागी होऊ शकतील. दरवर्षी लेखी स्वरुपात फॉर्म भरून देण्याच्या कटकटीतून त्यांची सुटका होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)