शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

जीवन प्रमाण योजना राज्यातही लागू

By admin | Updated: December 4, 2015 02:40 IST

केंद्राच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी असलेल्या जीवन प्रमाण योजनेत सहभागी होण्याचा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने घेतला आहे.

डिजिटलायजेशन : निवृत्तांच्या हयात दाखल्याला ‘आधार’यवतमाळ : केंद्राच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी असलेल्या जीवन प्रमाण योजनेत सहभागी होण्याचा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने घेतला आहे. या योजनेत हयातीच्या दाखल्याच्या डिजिटलायेजशनची सुविधा उपलब्ध करून दिली जात असून केंद्राची ही ‘जीवन प्रमाण’ योजना राज्यातही लागू करण्याचा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने घेतला आहे.महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना आता हयातीच्या (जीवंत असल्याच्या) दाखल्यासंदर्भात डिजिटल सुविधा वित्त विभागाने लागू केली आहे. त्यामुळे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आपल्या संबंधित बँकेकडे हयातीचा दाखला लेखी स्वरुपात सादर करण्याची गरज नाही. परंतु डिजिटलायझेशनसाठी आधार क्रमांक अनिवार्य असल्याचे वित्त विभागाने म्हटले आहे. दरवर्षी साधारणत: नोव्हेंबर महिन्यात निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा फॉर्म आपल्या सबंधित बँकेकडे भरून द्यावा लागतो. ठराविक नमुन्यात हा फॉर्म भरणे अनिवार्य असते. फॉर्म भरून न दिल्यास सदर व्यक्ती हयात नसल्याचे समजून निवृत्तीवेतन बंद करण्यात येते. त्यामुळे दरवर्षी हा फॉर्म भरून देणे निवृत्तीवेतनधारकांसाठी गरजेचे आहे. आता यामध्ये वित्त विभागाने कमालीची सुधारणा केली आहे. सर्वच दाखले आॅनलाईन आणि डिझिटाईज होत असताना आता हयातीच्या फॉर्मचे देखिल डिझिटलायजेशन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला देण्याच्या दृष्टीने बायोेमेट्रीक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ‘जीवन प्रमाण’ ही संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीद्वारे निवृत्तीवेतन धारकाने केवळ त्याचे बोट अथवा डोळे स्कॅन करण्यासाठी असलेल्या यंत्राद्वारे स्कॅन करून घेतल्यास तो अद्याप जीवंत असल्याबाबत प्रमाणित करू शकतो. या संदर्भात राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना बायोमेट्रीक द्वारे हयातीचा दाखला देणे शक्य व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या जीवन प्रमाण योजनेमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांकडे आधार कार्ड क्रमांक असणे गरजेचे आहे. निवृत्तीवेतनधारकांसाठी ही योजना अतिशय सुटसुटीत आणि फायद्याची आहे. कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय केवळ आधार क्रमांकासह ते या योजनेत सहभागी होऊ शकतील. दरवर्षी लेखी स्वरुपात फॉर्म भरून देण्याच्या कटकटीतून त्यांची सुटका होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)