शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा महोत्सवाकडे सर्वांची पाठ

By admin | Updated: January 23, 2016 02:36 IST

तालुक्यातील रांगणा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाकडे पंचायत समिती,

वणी : तालुक्यातील रांगणा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाकडे पंचायत समिती, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी चक्क पाठ फिरविली. त्यामुळे संतप्त झालेल्या रांगणावासीयांनी थेट पंचायत समिती गाठून रोष व्यक्त केला. या महोत्सवासाठी ग्रामस्थांनी तब्बल १ लाख ३५ हजार रूपये गोळा केले होते, हे विशेष.२० ते २३ जानेवारीदरम्यान रांगणा येथील जिल्हा परिषद शाळेत वणी तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव घेण्यात येत आहे. बुधवारी २० जानेवारीला या महोत्सवाचे मोठ्या थाटात पंचायत समिती सभापती सुधाकर गोरे यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य मिलिंद पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य शरद ठाकरे, वृशाली खानझोडे, दयालाल अर्के, सरपंच दिलीप परचाके, सविता वांढरे, मारोती तेलंग, महादेव कातकर व शाळा समिती सदस्य उपस्थित होते. उद्घाटनानंतर गुरूवारपासून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू होणार होत्या. मात्र गुरूवारी कोणत्याही शाळेचा संघ रांगणा येथे पोहोचलाच नाही. ग्रामस्थांनी संघ शुक्रवारी येतील, म्हणून वाट बघितली. मात्र शुक्रवारीही संघ दाखल झालेच नाही.गेल्या महिन्यात तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव घेण्यात आले. त्यात विजयी झालेले संघ या तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवात सहभागी होणार होते. त्यासाठी रांगणा येथील शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून तब्बल १ लाख ३५ हजार रूपये गोळा केले होते. या चार दिवसांची शिक्षक व विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. त्यासाठी गावकऱ्यांनी धान्य आणून ठेवले होते. आपल्या गावात तालुकास्तरीय स्पर्धा होणार असल्याचा आनंद त्यांना झाला होता. मात्र या महोत्सवात संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांनी विजयी संघ आणलाच नाही. त्यामुळे हा सर्व खर्च व्यर्थ गेला. या महोत्सवासाठी गावातील चिमुकले व महिलांनी ग्रामसफाई तसेच शाळा परिसर सुशोभीत केला होता. त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. गावात एकही संघ न पोहोचल्यामुळे ग्रामस्थ निराश झाले. त्यांचा संताप अनावर झाला. शेवटी शुक्रवारी दुपारी सरपंच दिलीप परचाके यांच्या नेतृत्वात ग्रामस्थ, शाळा समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समितीवर धडक दिली. त्यावेळी गटविकास अधिकारी त्यांच्या कक्षात नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांचा पारा पुन्हा भडकला. जोपर्यंत बिडीओ येणार नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही, असा पावित्रा त्यांनी घेतला. यावेळी पंचायत समिती सदस्य मिलींद पाटील व शरद ठाकरे यांनीही याबाबत प्रचंड चिड व्यक्त करीत संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांविरूद्ध कारवाईची मागणी केली. शेवटी तेथे गटशिक्षणाधिकारी वामन मेश्राम यांना बोलाविण्यात आले. सरपंच परचाके व ग्रामस्थांनी हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सरपंच परचाके यांना लेखी पत्र दिले. त्यात ज्या शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख तेथे पोहोचले नाही, त्यांच्याविरूद्ध शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे नमूद केले. त्यानंतर रोष कमी झाला. (कार्यालय प्रतिनिधी)