शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

बंदीभागातील समस्यांकडे आमदारांची पाठ

By admin | Updated: January 17, 2017 01:25 IST

रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मुलभूत सुविधांसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या बंदीभागातील नागरिकांच्या समस्या आमदारांच्या लेखी नगण्य आहेत.

नागरिक रस्त्यावर : भाजपाच्या राजेंद्र नजरधनेंना आंदोलनाला भेट द्यायलाही वेळ नाही संजय भगत महागावरस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मुलभूत सुविधांसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या बंदीभागातील नागरिकांच्या समस्या आमदारांच्या लेखी नगण्य आहेत. सतत पाच दिवस मोरचंडीच्या जंगलात आंदोलन करूनही आमदाराला आंदोलनस्थळी जाण्यास वेळ मिळाला नाही. उलट परतवाड्याचे आमदार बच्च कडू येतात आणि समस्या मार्गी लावून जातात. त्यामुळे उमरखेडच्या आमदारांना येथील नागरिकांच्या समस्यांचे काही देणेघेणे नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. बंदी भागातील नागरिक कित्येक दशकांपासून समस्यांनी ग्रस्त आहेत. मूलभूत सुविधाही येथे मिळत नाही. दूषित पाणी प्राशनाने किडणीचे आजार होत आहेत. अनेकदा आंदोलने करूनही पदरी काहीच पडले नाही. परंतु येथील नागरिकांनी पाठपुरावा सोडला नाही. गत आठवड्यात मोरचंडीच्या जंगलात शेकडो नागरिकांनी आंदोलन सुरू केले. पाच दिवस उपोषण सुरू होते. परंतु या पाच दिवसाच्या काळात स्थानिक आमदार राजेंद्र नजरधने यांनी आंदोलनस्थळाला भेटही दिली नाही. त्यामुळे नागरिकांत चांगलाच रोष दिसत आहे. बंदीभागात किडणीच्या आजाराने किमान ४०० ते ५०० लोक प्रभावित झालेल आहेत. त्यातील अनेकांचा मृत्यू झाला आहे. टाकळीपासून थेट मोरचंडी, थेरडी, बोरगाव, डोंगरगाव, जवराळा, एकांबा, कुरळी, कोरटा, दराटी, मन्याळी ते खरबी नाक्यापर्यंत रस्ताच नाही. बंदीभागातील लोकांना आरोग्य सुविधा म्हणजे एक तर नांदेड नाही तर पुसद महागावलाच जावे लागते. आजपर्यंत सर्वच पक्षांनी येथील नागरिकांची उपेक्षा केली. गत निवडणुकीत भाजपाने विकासाचे स्वप्न दाखविले. अच्छ दिन येणार म्हणून बंदीभागातील नागरिकांनी कमळाला मदत केली. आमदार नजरधने निवडून आले परंतु त्यांनी निवडून आल्यानंतर या भागाच्या समस्या जाणून घेतल्या नाही. गत आठवड्यात झालेल्या आंदोलनाचीही त्यांनी दखल घेतली नाही. निवडणुकीत विजय मिळाला की, जनतेशी नाळ तुटते असाच अनुभव त्यांच्याहीबाबतीत येथील नागरिकांना आला. स्थानिक आमदार दखल घेत नाहीत परंतु अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार जंगल तुडवत मोरचंडीत येतात. प्रशासनाला जाब विचारतात. प्रशासन त्यांच्यापुढे नमते, नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन मिळते. जे आमदार बच्चू कडुंना जमले ते आमदार नजरधनेनां का जमु नये, असा प्रश्न बंदीभागातील नागरिक विचारत आहेत.