शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

बंदीभागातील समस्यांकडे आमदारांची पाठ

By admin | Updated: January 17, 2017 01:25 IST

रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मुलभूत सुविधांसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या बंदीभागातील नागरिकांच्या समस्या आमदारांच्या लेखी नगण्य आहेत.

नागरिक रस्त्यावर : भाजपाच्या राजेंद्र नजरधनेंना आंदोलनाला भेट द्यायलाही वेळ नाही संजय भगत महागावरस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मुलभूत सुविधांसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या बंदीभागातील नागरिकांच्या समस्या आमदारांच्या लेखी नगण्य आहेत. सतत पाच दिवस मोरचंडीच्या जंगलात आंदोलन करूनही आमदाराला आंदोलनस्थळी जाण्यास वेळ मिळाला नाही. उलट परतवाड्याचे आमदार बच्च कडू येतात आणि समस्या मार्गी लावून जातात. त्यामुळे उमरखेडच्या आमदारांना येथील नागरिकांच्या समस्यांचे काही देणेघेणे नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. बंदी भागातील नागरिक कित्येक दशकांपासून समस्यांनी ग्रस्त आहेत. मूलभूत सुविधाही येथे मिळत नाही. दूषित पाणी प्राशनाने किडणीचे आजार होत आहेत. अनेकदा आंदोलने करूनही पदरी काहीच पडले नाही. परंतु येथील नागरिकांनी पाठपुरावा सोडला नाही. गत आठवड्यात मोरचंडीच्या जंगलात शेकडो नागरिकांनी आंदोलन सुरू केले. पाच दिवस उपोषण सुरू होते. परंतु या पाच दिवसाच्या काळात स्थानिक आमदार राजेंद्र नजरधने यांनी आंदोलनस्थळाला भेटही दिली नाही. त्यामुळे नागरिकांत चांगलाच रोष दिसत आहे. बंदीभागात किडणीच्या आजाराने किमान ४०० ते ५०० लोक प्रभावित झालेल आहेत. त्यातील अनेकांचा मृत्यू झाला आहे. टाकळीपासून थेट मोरचंडी, थेरडी, बोरगाव, डोंगरगाव, जवराळा, एकांबा, कुरळी, कोरटा, दराटी, मन्याळी ते खरबी नाक्यापर्यंत रस्ताच नाही. बंदीभागातील लोकांना आरोग्य सुविधा म्हणजे एक तर नांदेड नाही तर पुसद महागावलाच जावे लागते. आजपर्यंत सर्वच पक्षांनी येथील नागरिकांची उपेक्षा केली. गत निवडणुकीत भाजपाने विकासाचे स्वप्न दाखविले. अच्छ दिन येणार म्हणून बंदीभागातील नागरिकांनी कमळाला मदत केली. आमदार नजरधने निवडून आले परंतु त्यांनी निवडून आल्यानंतर या भागाच्या समस्या जाणून घेतल्या नाही. गत आठवड्यात झालेल्या आंदोलनाचीही त्यांनी दखल घेतली नाही. निवडणुकीत विजय मिळाला की, जनतेशी नाळ तुटते असाच अनुभव त्यांच्याहीबाबतीत येथील नागरिकांना आला. स्थानिक आमदार दखल घेत नाहीत परंतु अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार जंगल तुडवत मोरचंडीत येतात. प्रशासनाला जाब विचारतात. प्रशासन त्यांच्यापुढे नमते, नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन मिळते. जे आमदार बच्चू कडुंना जमले ते आमदार नजरधनेनां का जमु नये, असा प्रश्न बंदीभागातील नागरिक विचारत आहेत.