शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

सात लाख मतदारांची मतदानाकडे पाठ

By admin | Updated: October 18, 2014 23:00 IST

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते टाळू नये, अशी जनजागृती प्रशासनाने करूनही त्याचा मतदारांवर तेवढा प्रभाव पडला नाही. कारण ६ लाख ९२ हजार ६२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.

यवतमाळ : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते टाळू नये, अशी जनजागृती प्रशासनाने करूनही त्याचा मतदारांवर तेवढा प्रभाव पडला नाही. कारण ६ लाख ९२ हजार ६२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. मतदान सक्तीचे करण्याबाबत सर्वच स्तरातून मागणी होत आहे. त्यासाठी सरकारवर जनतेतून दबाव वाढविला जात आहे. मतदान केल्याशिवाय शासनाच्या कोणत्याही सोईसुविधा दिल्या जाऊ नये, अशीही मागणी आहे. मतदानाच्या सक्तीचा सरकारने अद्याप विचार केला नसला तरी मतदारांमध्ये मतदानाबाबतची जनजागृती करण्याचा पुरेपूर प्रयत्न सरकार आणि प्रशासनाकडून या निवडणुकीत केला गेला. विविध वाहिन्या आणि माध्यमांद्वारे आपले मत कसे अमूल्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न झाला. प्रत्येक जिल्ह्यात मतदारसंघ आणि गावागावात निवडणूक विभागाने मतदानाबाबत जनजागृती केली. त्यासाठी पथनाट्य, लोकगीतांचा आधार घेतला गेला. त्यामुळे गतवेळेपेक्षा मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढली. मात्र अपेक्षेनुसार त्यात यश आले नाही. मतदारांमधील निरुत्साह कायम दिसला. त्यातही शहरी मतदारांची भूमिका ‘आम्हाला त्याचे काय’ अशीच पहायला मिळाली. त्यामुळेच यवतमाळ शहरातील मतदानाची टक्केवारी अवघी ५८.६७ एवढी नोंदविली गेली. या उलट जिल्ह्यात सर्वाधिक मतदान हे वणी मतदारसंघात ७२.६७ टक्के एवढे नोंदविले गेले. अन्य मतदारसंघात ६७ ते ६९ टक्के मतदान झाले. पुसदमध्ये ही टक्केवारी ६१.२३ अशी नोंद झाली. संपूर्ण जिल्ह्याचा विचार केल्यास सुमारे २० लाख मतदारांपैकी तब्बल सात लाख मतदारांनी मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळाले. यवतमाळात सर्वाधिक १ लाख ४५ हजार, पुसद १ लाख नऊ हजार, दिग्रस ९५ हजार, उमरखेड ९१ हजार, आर्णी ८८ हजार, राळेगाव ८७ हजार तर वणीत ७३ हजार मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. शासनाने मतदानासाठी घोषित केलेल्या सुटीचा वापर मतदारांनी एन्जॉयसाठी केला. २५ वर्षानंतर पहिल्यांदा यावेळी निवडणुकीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाले होते. त्यानंतरही मतदान टाळले गेले. यावेळची टक्केवारी पाहता मतदानाच्या सक्तीची मागणी पुन्हा जोर धरत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)