शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

सात लाख मतदारांची मतदानाकडे पाठ

By admin | Updated: October 18, 2014 23:00 IST

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते टाळू नये, अशी जनजागृती प्रशासनाने करूनही त्याचा मतदारांवर तेवढा प्रभाव पडला नाही. कारण ६ लाख ९२ हजार ६२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.

यवतमाळ : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते टाळू नये, अशी जनजागृती प्रशासनाने करूनही त्याचा मतदारांवर तेवढा प्रभाव पडला नाही. कारण ६ लाख ९२ हजार ६२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. मतदान सक्तीचे करण्याबाबत सर्वच स्तरातून मागणी होत आहे. त्यासाठी सरकारवर जनतेतून दबाव वाढविला जात आहे. मतदान केल्याशिवाय शासनाच्या कोणत्याही सोईसुविधा दिल्या जाऊ नये, अशीही मागणी आहे. मतदानाच्या सक्तीचा सरकारने अद्याप विचार केला नसला तरी मतदारांमध्ये मतदानाबाबतची जनजागृती करण्याचा पुरेपूर प्रयत्न सरकार आणि प्रशासनाकडून या निवडणुकीत केला गेला. विविध वाहिन्या आणि माध्यमांद्वारे आपले मत कसे अमूल्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न झाला. प्रत्येक जिल्ह्यात मतदारसंघ आणि गावागावात निवडणूक विभागाने मतदानाबाबत जनजागृती केली. त्यासाठी पथनाट्य, लोकगीतांचा आधार घेतला गेला. त्यामुळे गतवेळेपेक्षा मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढली. मात्र अपेक्षेनुसार त्यात यश आले नाही. मतदारांमधील निरुत्साह कायम दिसला. त्यातही शहरी मतदारांची भूमिका ‘आम्हाला त्याचे काय’ अशीच पहायला मिळाली. त्यामुळेच यवतमाळ शहरातील मतदानाची टक्केवारी अवघी ५८.६७ एवढी नोंदविली गेली. या उलट जिल्ह्यात सर्वाधिक मतदान हे वणी मतदारसंघात ७२.६७ टक्के एवढे नोंदविले गेले. अन्य मतदारसंघात ६७ ते ६९ टक्के मतदान झाले. पुसदमध्ये ही टक्केवारी ६१.२३ अशी नोंद झाली. संपूर्ण जिल्ह्याचा विचार केल्यास सुमारे २० लाख मतदारांपैकी तब्बल सात लाख मतदारांनी मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळाले. यवतमाळात सर्वाधिक १ लाख ४५ हजार, पुसद १ लाख नऊ हजार, दिग्रस ९५ हजार, उमरखेड ९१ हजार, आर्णी ८८ हजार, राळेगाव ८७ हजार तर वणीत ७३ हजार मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. शासनाने मतदानासाठी घोषित केलेल्या सुटीचा वापर मतदारांनी एन्जॉयसाठी केला. २५ वर्षानंतर पहिल्यांदा यावेळी निवडणुकीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाले होते. त्यानंतरही मतदान टाळले गेले. यावेळची टक्केवारी पाहता मतदानाच्या सक्तीची मागणी पुन्हा जोर धरत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)