शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

सात लाख मतदारांची मतदानाकडे पाठ

By admin | Updated: October 18, 2014 23:00 IST

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते टाळू नये, अशी जनजागृती प्रशासनाने करूनही त्याचा मतदारांवर तेवढा प्रभाव पडला नाही. कारण ६ लाख ९२ हजार ६२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.

यवतमाळ : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते टाळू नये, अशी जनजागृती प्रशासनाने करूनही त्याचा मतदारांवर तेवढा प्रभाव पडला नाही. कारण ६ लाख ९२ हजार ६२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. मतदान सक्तीचे करण्याबाबत सर्वच स्तरातून मागणी होत आहे. त्यासाठी सरकारवर जनतेतून दबाव वाढविला जात आहे. मतदान केल्याशिवाय शासनाच्या कोणत्याही सोईसुविधा दिल्या जाऊ नये, अशीही मागणी आहे. मतदानाच्या सक्तीचा सरकारने अद्याप विचार केला नसला तरी मतदारांमध्ये मतदानाबाबतची जनजागृती करण्याचा पुरेपूर प्रयत्न सरकार आणि प्रशासनाकडून या निवडणुकीत केला गेला. विविध वाहिन्या आणि माध्यमांद्वारे आपले मत कसे अमूल्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न झाला. प्रत्येक जिल्ह्यात मतदारसंघ आणि गावागावात निवडणूक विभागाने मतदानाबाबत जनजागृती केली. त्यासाठी पथनाट्य, लोकगीतांचा आधार घेतला गेला. त्यामुळे गतवेळेपेक्षा मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढली. मात्र अपेक्षेनुसार त्यात यश आले नाही. मतदारांमधील निरुत्साह कायम दिसला. त्यातही शहरी मतदारांची भूमिका ‘आम्हाला त्याचे काय’ अशीच पहायला मिळाली. त्यामुळेच यवतमाळ शहरातील मतदानाची टक्केवारी अवघी ५८.६७ एवढी नोंदविली गेली. या उलट जिल्ह्यात सर्वाधिक मतदान हे वणी मतदारसंघात ७२.६७ टक्के एवढे नोंदविले गेले. अन्य मतदारसंघात ६७ ते ६९ टक्के मतदान झाले. पुसदमध्ये ही टक्केवारी ६१.२३ अशी नोंद झाली. संपूर्ण जिल्ह्याचा विचार केल्यास सुमारे २० लाख मतदारांपैकी तब्बल सात लाख मतदारांनी मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळाले. यवतमाळात सर्वाधिक १ लाख ४५ हजार, पुसद १ लाख नऊ हजार, दिग्रस ९५ हजार, उमरखेड ९१ हजार, आर्णी ८८ हजार, राळेगाव ८७ हजार तर वणीत ७३ हजार मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. शासनाने मतदानासाठी घोषित केलेल्या सुटीचा वापर मतदारांनी एन्जॉयसाठी केला. २५ वर्षानंतर पहिल्यांदा यावेळी निवडणुकीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाले होते. त्यानंतरही मतदान टाळले गेले. यावेळची टक्केवारी पाहता मतदानाच्या सक्तीची मागणी पुन्हा जोर धरत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)