शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेचे बिग बजेट

By admin | Updated: October 8, 2014 23:31 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना हे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर विधानसभा लढवित असल्याने पहिल्यांदाच ही निवडणूक बिग बजेट झाली आहे. या निवडणुकीत राजकारणासह विविध

सर्व काही पैसाच : समस्या बाद, कुणालाच सोयरसूतक नाही यवतमाळ : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना हे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर विधानसभा लढवित असल्याने पहिल्यांदाच ही निवडणूक बिग बजेट झाली आहे. या निवडणुकीत राजकारणासह विविध क्षेत्रातील ब्लॅक मनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्हाईट होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणातील सर्वच प्रमुख उमेदवार ‘गब्बर’ असल्याची जाणीव मतदारांना आहे. त्यांनी नामांकनाच्या शपथपत्रात दाखविलेल्या मालमत्तेपेक्षा प्रत्यक्षात किती तरी पट अधिक मालमत्ता अनेक उमेदवारांकडे असेल याची खात्री मतदारांना आहे. ही निवडणूक म्हणजे यंदाची दिवाळी अशी मानसिकता आता मतदारांची झाली आहे. म्हणूनच त्यांनी ही निवडणूक ‘कॅश’ करण्यासाठी कोणतीही संधी सोडायची नाही, असा चंगच जणू बांधल्याचे दिसून येते. पूर्वी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा भरणा होता. मात्र आता या निष्ठेचा प्रचंड अभाव पहायला मिळत आहे. निवडणुकीत सर्व काही ‘कमर्शियल’ झाले आहे. पैशाशिवाय काहीच नाही हे वास्तव आहे. याची जाणीव उमेदवाराप्रमाणेच कार्यकर्त्यांनाही आहे. पूर्वी गावात उमेदवार आल्यानंतर विकास, समस्या याबाबत जाब विचारला जायचा. परंतु आता हे मुद्दे बाजूला पडले आहेत. त्याची जागा पैशांनी घेतली आहे. विकास व समस्यांचा पाढा वाचल्यास उमेदवार केवळ आश्वासन देतो, मत घेतो आणि पुन्हा पाच वर्ष तोंड दाखवित नाही. त्यात उमेदवाराला ‘कॅश’ करता येत नसल्याने नुकसान आपलेच होते, याची जाणीव मतदाराला झाली आहे. त्यामुळे पैसा हा मतदारांचा बेस झाला आहे. आपले मत विकू नका याबाबत प्रशासन व सामाजिक संस्थांकडून जनजागृती केली जाते. मात्र त्याचा काही एक फरक मतदारांवर पडताना दिसत नाही. पैसा हाच मार्ग असल्याने उमेदवारही थेट मतदारांकडे जाण्याऐवजी गठ्ठा मतांच्या एजंटांमार्फत जाणे पसंत करतो. अनेक ठिकाणी अर्धवट मंदिराचे बांधकाम, साहित्य पुरवठा, क्रीडा साहित्य, भजनी साहित्य अशा सामूहिक हिताच्या वस्तूंची मागणी केली जाते. त्याची तत्काळ अंमलबजावणीही उमेदवाराकडून होते. मात्र बहुतांश वेळा संधी वैयक्तिक स्तरावर कॅश करणे एवढाच उद्देश असतो. याचा प्रत्यय ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात येतो आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक उमेदवार पैसे देतानाच वसुलीची भाषा आक्रमकपणे वापरत असल्याने या उमेदवाराचे पैसे घेण्यासही अनेक जण धजावत नसल्याचे सांगितले जाते. याच उमेदवाराच्या एका निष्ठावंत पदाधिकाऱ्याने मंदिर बांधकामासाठी निधी मागून नंतर दुसऱ्याचाच निधी स्वीकारणाऱ्या एका गावपुढाऱ्याच्या कानशिलात हाणल्याचा प्रकारही पुढे आला. पैशासाठी एका पेक्षा अनेक पर्याय उपलब्ध असल्याने मतांची एजंटांमार्फत जणू बोली लावली जात आहे. मनी बेस निवडणुकांमुळे सर्वच उमेदवारांचे बजेट वाढले. ही निवडणूक विविध अर्थांनी बिग बजेट झाली आहे. निवडणुकीतील खरी आर्थिक उलाढाल पुढील आठवड्यात पहायला मिळण्याची शक्यता आहे. दारू, पार्ट्या याचा तर जणू महापूर सर्वत्र आला आहे. निवडणूक काळात परवाना प्राप्त देशी-विदेशी दारूच्या झालेल्या विक्रीतून उमेदवारांच्या पार्ट्यांवरील खर्चाचा सहज अंदाज येतो. निवडणुकीमुळे गोरगरिबांची दिवाळी १५ दिवस आधीच साजरी होत आहे, एवढे मात्र निश्चित. उमेदवारच निष्ठावंत नाहीत तर कार्यकर्ते आणि मतदारांकडून अपेक्षा कशी करता असा प्रश्नसुद्धा उपस्थित केला जात आहे. अंगावरील कपड्याप्रमाणे पक्ष बदलविणाऱ्या उमेदवारांना मतदारही चांगले ओळखून आहेत. त्यांच्याकडील काळा पैसा बाजारात आणणे हा प्रामाणिक हेतू असल्याची प्रतिक्रियाही ग्रामीण भागातील काही मतदारांनी ‘लोकमत’कडे नोंदविली. (जिल्हा प्रतिनिधी )