शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

विधानसभेचे बिग बजेट

By admin | Updated: October 8, 2014 23:31 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना हे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर विधानसभा लढवित असल्याने पहिल्यांदाच ही निवडणूक बिग बजेट झाली आहे. या निवडणुकीत राजकारणासह विविध

सर्व काही पैसाच : समस्या बाद, कुणालाच सोयरसूतक नाही यवतमाळ : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना हे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर विधानसभा लढवित असल्याने पहिल्यांदाच ही निवडणूक बिग बजेट झाली आहे. या निवडणुकीत राजकारणासह विविध क्षेत्रातील ब्लॅक मनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्हाईट होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणातील सर्वच प्रमुख उमेदवार ‘गब्बर’ असल्याची जाणीव मतदारांना आहे. त्यांनी नामांकनाच्या शपथपत्रात दाखविलेल्या मालमत्तेपेक्षा प्रत्यक्षात किती तरी पट अधिक मालमत्ता अनेक उमेदवारांकडे असेल याची खात्री मतदारांना आहे. ही निवडणूक म्हणजे यंदाची दिवाळी अशी मानसिकता आता मतदारांची झाली आहे. म्हणूनच त्यांनी ही निवडणूक ‘कॅश’ करण्यासाठी कोणतीही संधी सोडायची नाही, असा चंगच जणू बांधल्याचे दिसून येते. पूर्वी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा भरणा होता. मात्र आता या निष्ठेचा प्रचंड अभाव पहायला मिळत आहे. निवडणुकीत सर्व काही ‘कमर्शियल’ झाले आहे. पैशाशिवाय काहीच नाही हे वास्तव आहे. याची जाणीव उमेदवाराप्रमाणेच कार्यकर्त्यांनाही आहे. पूर्वी गावात उमेदवार आल्यानंतर विकास, समस्या याबाबत जाब विचारला जायचा. परंतु आता हे मुद्दे बाजूला पडले आहेत. त्याची जागा पैशांनी घेतली आहे. विकास व समस्यांचा पाढा वाचल्यास उमेदवार केवळ आश्वासन देतो, मत घेतो आणि पुन्हा पाच वर्ष तोंड दाखवित नाही. त्यात उमेदवाराला ‘कॅश’ करता येत नसल्याने नुकसान आपलेच होते, याची जाणीव मतदाराला झाली आहे. त्यामुळे पैसा हा मतदारांचा बेस झाला आहे. आपले मत विकू नका याबाबत प्रशासन व सामाजिक संस्थांकडून जनजागृती केली जाते. मात्र त्याचा काही एक फरक मतदारांवर पडताना दिसत नाही. पैसा हाच मार्ग असल्याने उमेदवारही थेट मतदारांकडे जाण्याऐवजी गठ्ठा मतांच्या एजंटांमार्फत जाणे पसंत करतो. अनेक ठिकाणी अर्धवट मंदिराचे बांधकाम, साहित्य पुरवठा, क्रीडा साहित्य, भजनी साहित्य अशा सामूहिक हिताच्या वस्तूंची मागणी केली जाते. त्याची तत्काळ अंमलबजावणीही उमेदवाराकडून होते. मात्र बहुतांश वेळा संधी वैयक्तिक स्तरावर कॅश करणे एवढाच उद्देश असतो. याचा प्रत्यय ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात येतो आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक उमेदवार पैसे देतानाच वसुलीची भाषा आक्रमकपणे वापरत असल्याने या उमेदवाराचे पैसे घेण्यासही अनेक जण धजावत नसल्याचे सांगितले जाते. याच उमेदवाराच्या एका निष्ठावंत पदाधिकाऱ्याने मंदिर बांधकामासाठी निधी मागून नंतर दुसऱ्याचाच निधी स्वीकारणाऱ्या एका गावपुढाऱ्याच्या कानशिलात हाणल्याचा प्रकारही पुढे आला. पैशासाठी एका पेक्षा अनेक पर्याय उपलब्ध असल्याने मतांची एजंटांमार्फत जणू बोली लावली जात आहे. मनी बेस निवडणुकांमुळे सर्वच उमेदवारांचे बजेट वाढले. ही निवडणूक विविध अर्थांनी बिग बजेट झाली आहे. निवडणुकीतील खरी आर्थिक उलाढाल पुढील आठवड्यात पहायला मिळण्याची शक्यता आहे. दारू, पार्ट्या याचा तर जणू महापूर सर्वत्र आला आहे. निवडणूक काळात परवाना प्राप्त देशी-विदेशी दारूच्या झालेल्या विक्रीतून उमेदवारांच्या पार्ट्यांवरील खर्चाचा सहज अंदाज येतो. निवडणुकीमुळे गोरगरिबांची दिवाळी १५ दिवस आधीच साजरी होत आहे, एवढे मात्र निश्चित. उमेदवारच निष्ठावंत नाहीत तर कार्यकर्ते आणि मतदारांकडून अपेक्षा कशी करता असा प्रश्नसुद्धा उपस्थित केला जात आहे. अंगावरील कपड्याप्रमाणे पक्ष बदलविणाऱ्या उमेदवारांना मतदारही चांगले ओळखून आहेत. त्यांच्याकडील काळा पैसा बाजारात आणणे हा प्रामाणिक हेतू असल्याची प्रतिक्रियाही ग्रामीण भागातील काही मतदारांनी ‘लोकमत’कडे नोंदविली. (जिल्हा प्रतिनिधी )