शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

घर सोडून गेला अन् कारागृहात अडकला

By admin | Updated: June 4, 2015 02:06 IST

यवतमाळातील तरुणाला केवळ वाईट संगतीने तरुणीच्या खुनात थेट जन्मठेपेची शिक्षा झाली आणि तो नागपूरच्या कारागृहात पोहोचला.

वाईट संगतीचा परिणाम : यवतमाळच्या भुऱ्याला नागपुरात जन्मठेपयवतमाळ : यवतमाळातील तरुणाला केवळ वाईट संगतीने तरुणीच्या खुनात थेट जन्मठेपेची शिक्षा झाली आणि तो नागपूरच्या कारागृहात पोहोचला. नागपूरातील बहुचर्चित मोनिका किरणापुरे या विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणात उमेश ऊर्फ भुऱ्या मोहन मराठे (२४) रा.रोहिदासनगर, यवतमाळ याचा सहभाग निष्पन्न झाला. मंगळवारी नागपूर सत्र न्यायालयाने त्याच्यासह चौघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि यवतमाळातील गुन्हेगारी वर्तुळ विदर्भात पुन्हा चर्चेत आले. त्या पार्श्वभूमीवर भुऱ्याच्या कुटुंबीयांशी चर्चा केली असता वाईट संगतीने त्याचा कसा घात केला, याचे वास्तव पुढे आले. कुटुंबीयांनी सांगितले की, भुऱ्या हा पाचवा वर्ग शिकला आहे. तो येथे कधी कॅन्टीनवर तर कधी मजुरीचे काम करायचा. सन २०१० मध्ये तो काकाशी भांडण झाल्याने घर सोडून तो नागपुरात गेला. तेथे त्याची भेट नातेवाईक असलेल्या श्रीकांत सोनेकर (२७) रा.हुडकेश्वर राजापेठ याच्याशी झाली. त्याच्याच माध्यमातून भुऱ्याने तेथे आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र श्रीकांतच्या या आश्रयानेच भुऱ्याचा घात केला. ११ मार्च २०११ रोजी नागपुरात मोनिका किरणापुरे हिचे खूनप्रकरण घडले. त्यानंतर भुऱ्या यवतमाळात आला. मात्र त्याने गुन्हा केल्याची साधी कुणकुणही कुणाला लागू दिली नाही. मात्र काही दिवसांनी त्याचे नाव मोनिकाच्या खूनप्रकरणात वृत्तपत्रातून झळकले. परंतु त्यानंतरही तो कुठे पळून गेला नाही. नागपूर पोलिसांनी यवतमाळात येऊन भुऱ्याला अटक केली. वास्तविक भुऱ्याची अथवा त्याच्या परिवाराची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो प्रचंड भित्रा असल्याचे व शेजारी भांडण झाल्यास तोच आधी घरात लपायचा, असे कुटुंबीयांनी सांगितले. नागपूरवरून परत आल्यानंतर मात्र भुऱ्या प्रचंड खूष दिसत होता. त्याच्या त्या खुषीमागे आर्थिक गणित असावे, असा कयास आता कुटुंबीय लावत आहे. विशेष असे, भुऱ्या नागपुरातील घटनेनंतर यवतमाळात आला असता त्याचा साखरपुडा केला गेला. मात्र त्यानंतर त्याचे नाव मोनिकाच्या खुनात पुढे येताच त्याचे हे नियोजित लग्न तुटले. नागपूर कारागृहात असताना परिवारातील सदस्य अनेकदा त्याच्या भेटीला गेले होते. मात्र मी लवकर परत येतो, चिंता करू नका, एवढेच तो कुटुंबीयांना सांगत होता. परंतु न्यायालयाने जन्मठेप सुनावल्याने कुटुंबीयांची भुऱ्या घरी येण्याची आशा मावळली आहे. वाईट संगतीनेच भुऱ्याचा घात केल्याची बाब त्याच्या कुटुंबीयांनीही कबूल केली. (जिल्हा प्रतिनिधी)