शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वाघाडी प्रकल्पाचे पाणी सोडा

By admin | Updated: July 16, 2015 02:39 IST

पावसाची चांगली सुरुवात झाल्याने लगबगीने पेरणी झाली. पिकांची उगवणही बऱ्यापैकी झाली.

सुरेश लोणकर : २४ दिवसांपासून पाऊस नाहीघाटंजी : पावसाची चांगली सुरुवात झाल्याने लगबगीने पेरणी झाली. पिकांची उगवणही बऱ्यापैकी झाली. मात्र, हातात आलेल्या पिकाला दडी मारलेल्या पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी घाटंजी तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील वाघाडी प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे सोडावे, अशी मागणी सुरेश लोणकर यांनी केली आहे.घाटंजी तालुक्यात गेल्या २४ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शेतात उगवलेले पीक कोमेजून माना खाली टाकल्या आहे. तर काही शेतातील बिज जमिनीवर गुदमरत आहे. त्यामुळे घाटंजी तालुका दुष्काळाच्या छायेत दिसत आहे. या पिकांना वाचविण्यासाठी जलसंपदा विभागाने पुढाकार घेतल्याचे समजले. मात्र, त्यांचा अध्यादेश निघेपर्यंत बहुतांश शेतातील पीक नेस्तनाबूत होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधितांनी विलंब न करता वाघाडी प्रकल्पाचे पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. वाघाडी प्रकल्पात आजमितीला ५१ टक्के पाणीसाठा असल्याचे अनुमान आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना देण्यास काहीही अडचण निर्माण होणार नसल्याचा अंदाज लोणकर यांनी वर्तविला आहे. कोरडवाहू शेतातील पीक शेवटच्या घटका मोजत आहेत. ही कोरडवाहू शेती बहुतांश प्रमाणात वाघाडी प्रकल्प लाभक्षेत्रात येते. प्रकल्पाचे पाणी सोडविण्याची मागणी लोणकर यांनी केली. (प्रतिनिधी)