शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

सिंचनासाठी बेंबळाचे पाणी सोडणार

By admin | Updated: November 15, 2014 02:12 IST

खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता बेंबळेच्या पाण्याची प्रतीक्षा असून, पाटबंधारे विभागाने बेंबळेच्या पाण्यावर आठ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे.

यवतमाळ : खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता बेंबळेच्या पाण्याची प्रतीक्षा असून, पाटबंधारे विभागाने बेंबळेच्या पाण्यावर आठ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे. मात्र कालवे आणि पटचऱ्यांच्या दुरावस्थेने पूर्ण क्षमतेने सिंचनावर प्रश्नचिन्ह लागण्याची शक्यता आहे. सुरूवातीला पावसाने संपूर्ण जिल्ह्यातच दडी मारली. त्यामुळे दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर वातावरणातील बदलाने सोयाबीन आणि कपाशीचे पीक हातून गेले. हिच परिस्थिती बाभूळगाव तालुक्याचीही आहे. खरीप हातून गेल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने यंदा बेंबळा प्रकल्पावरून रब्बी हंगामासाठी आठ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. सहा टप्प्यांमध्ये ६८ किलोमीटर पर्यंत सिंचनासाठी पाणी पोहोचविले जाणार आहे. १ डिसेंबर ते ३१ मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने कालव्यांमधून सिंचनासाठी पाणी सोडले जाणार आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी स्थानिक बेंबळा उपविभागीय कार्यालयात शेतकऱ्यांनी कार्यक्रमाची पाहणी करून पाण्याची मागणी नोंदवायची आहे. त्यासाठी ३० नोव्हेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तिथी ठेवण्यात आली आहे. मुदत संपल्यानंतर कुठल्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही. उपविभागाला अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाला किंवा नाही याची खात्रीही शेतकऱ्यांनी करावयाची आहे. पाणी घेण्यासाठी उपविभागाकडूनच शेतकऱ्यांना पासेस दिल्या जाणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत पाणीपट्टी थकबाकीच्या रकमेचा भरणा केला नाही, असे शेतकरी सिंचनासाठी पाणी घेण्यास पात्र ठरणार नाही. त्यामुळे या थकबाकीचा भरणा करावा असे बेंबळा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता दे.जो. राठोड यांनी सांगितले.