शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी बेंबळाचे पाणी सोडणार

By admin | Updated: November 15, 2014 02:12 IST

खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता बेंबळेच्या पाण्याची प्रतीक्षा असून, पाटबंधारे विभागाने बेंबळेच्या पाण्यावर आठ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे.

यवतमाळ : खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता बेंबळेच्या पाण्याची प्रतीक्षा असून, पाटबंधारे विभागाने बेंबळेच्या पाण्यावर आठ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे. मात्र कालवे आणि पटचऱ्यांच्या दुरावस्थेने पूर्ण क्षमतेने सिंचनावर प्रश्नचिन्ह लागण्याची शक्यता आहे. सुरूवातीला पावसाने संपूर्ण जिल्ह्यातच दडी मारली. त्यामुळे दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर वातावरणातील बदलाने सोयाबीन आणि कपाशीचे पीक हातून गेले. हिच परिस्थिती बाभूळगाव तालुक्याचीही आहे. खरीप हातून गेल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने यंदा बेंबळा प्रकल्पावरून रब्बी हंगामासाठी आठ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. सहा टप्प्यांमध्ये ६८ किलोमीटर पर्यंत सिंचनासाठी पाणी पोहोचविले जाणार आहे. १ डिसेंबर ते ३१ मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने कालव्यांमधून सिंचनासाठी पाणी सोडले जाणार आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी स्थानिक बेंबळा उपविभागीय कार्यालयात शेतकऱ्यांनी कार्यक्रमाची पाहणी करून पाण्याची मागणी नोंदवायची आहे. त्यासाठी ३० नोव्हेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तिथी ठेवण्यात आली आहे. मुदत संपल्यानंतर कुठल्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही. उपविभागाला अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाला किंवा नाही याची खात्रीही शेतकऱ्यांनी करावयाची आहे. पाणी घेण्यासाठी उपविभागाकडूनच शेतकऱ्यांना पासेस दिल्या जाणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत पाणीपट्टी थकबाकीच्या रकमेचा भरणा केला नाही, असे शेतकरी सिंचनासाठी पाणी घेण्यास पात्र ठरणार नाही. त्यामुळे या थकबाकीचा भरणा करावा असे बेंबळा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता दे.जो. राठोड यांनी सांगितले.