शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

सिंचनासाठी बेंबळाचे पाणी सोडणार

By admin | Updated: November 15, 2014 02:12 IST

खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता बेंबळेच्या पाण्याची प्रतीक्षा असून, पाटबंधारे विभागाने बेंबळेच्या पाण्यावर आठ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे.

यवतमाळ : खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता बेंबळेच्या पाण्याची प्रतीक्षा असून, पाटबंधारे विभागाने बेंबळेच्या पाण्यावर आठ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे. मात्र कालवे आणि पटचऱ्यांच्या दुरावस्थेने पूर्ण क्षमतेने सिंचनावर प्रश्नचिन्ह लागण्याची शक्यता आहे. सुरूवातीला पावसाने संपूर्ण जिल्ह्यातच दडी मारली. त्यामुळे दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर वातावरणातील बदलाने सोयाबीन आणि कपाशीचे पीक हातून गेले. हिच परिस्थिती बाभूळगाव तालुक्याचीही आहे. खरीप हातून गेल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने यंदा बेंबळा प्रकल्पावरून रब्बी हंगामासाठी आठ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. सहा टप्प्यांमध्ये ६८ किलोमीटर पर्यंत सिंचनासाठी पाणी पोहोचविले जाणार आहे. १ डिसेंबर ते ३१ मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने कालव्यांमधून सिंचनासाठी पाणी सोडले जाणार आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी स्थानिक बेंबळा उपविभागीय कार्यालयात शेतकऱ्यांनी कार्यक्रमाची पाहणी करून पाण्याची मागणी नोंदवायची आहे. त्यासाठी ३० नोव्हेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तिथी ठेवण्यात आली आहे. मुदत संपल्यानंतर कुठल्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही. उपविभागाला अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाला किंवा नाही याची खात्रीही शेतकऱ्यांनी करावयाची आहे. पाणी घेण्यासाठी उपविभागाकडूनच शेतकऱ्यांना पासेस दिल्या जाणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत पाणीपट्टी थकबाकीच्या रकमेचा भरणा केला नाही, असे शेतकरी सिंचनासाठी पाणी घेण्यास पात्र ठरणार नाही. त्यामुळे या थकबाकीचा भरणा करावा असे बेंबळा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता दे.जो. राठोड यांनी सांगितले.