शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

देऊरवाडीच्या नागरिकांना मिळणार जागेचे लीजपट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:30 IST

तालुक्यातील देऊरवाडी येथे वाढीव गावठाणला अखेर मंजुरी मिळाली. यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या जागेचा प्रश्न सुटला असून या कुटुंबांना लवकरच लीजपट्टे वाटप केले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देऊरवाडी येथे ७० च्यावर कुटुंबे वास्तव्य करीत आहे.

ठळक मुद्देगावठाण मंजूर : अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर आले यश

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील देऊरवाडी येथे वाढीव गावठाणला अखेर मंजुरी मिळाली. यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या जागेचा प्रश्न सुटला असून या कुटुंबांना लवकरच लीजपट्टे वाटप केले जाणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून देऊरवाडी येथे ७० च्यावर कुटुंबे वास्तव्य करीत आहे. मात्र जागेच्या मालकी हक्काअभावी त्यांना मूलभूत सुविधा व वैयक्तिक लाभ मिळत नव्हता. याकरिता त्यांचे सतत प्रयत्न सुरू होते. आता गावठाणला मंजुरी मिळाल्यामुळे गावकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश आले. तेथे अनेक कुटुंबांना स्वत:चे घर नसल्यामुळे गावातील झोपडपट्टीत कुडाच्या घरात अनेक वर्षांपासून वास्तव्य करावे लागत होते. गावठाण मंजूर नसल्यामुळे या कुटुंबांना शासनाच्या कोणत्याही सुविधा मिळत नव्हत्या. जागेच्या मालकी हक्काची नोंद नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून त्यांना वंचित राहावे लागत होते.गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे याबाबत समस्या मांडल्या. मात्र कुणीही दखल घेतली नाही. अखेर गावातील सचिन ठाकरे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर स्थानिक पातळीवर पाठपुरावा केला. नंतर गावकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. अखेर तहसीलदार अरुण शेलार यांनी त्यांची दखल घेऊन तलाठी, ग्रामपंचायत सचिव अहवाल, ग्रामपंचायत ठराव व इतर प्रक्रिया पूर्ण करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वाढीव गावठाण मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला. त्यानंतर ३.६ हेक्टर जागेला मंजुरी देण्यात आली.आता या जागेवर प्लॉट पाडून येथील रहिवाशांना लवकरच जागेचे लीजपट्टे वाटप केले जाणार आहे.ही समस्या सोडविण्यासाठी सचिन ठाकरे, सरपंच चैताली चौधरी, उपसरपंच गौतम वासनिक, ग्रामपंचायत सदस्य सुनील टेकाम तसेच वसंत कुरशिंगे, बबन राऊत, मारुती आत्राम यांच्यासह गावकऱ्यांनी पाठपुरावा केला.नागरिकांमध्ये समाधानगेल्या अनेक वर्षांपासून कुडाच्या घरात दिवस काढून अनेक यातना भोगलेल्या झोपडपट्टीवासीयांनी मालकीचे घर मिळणार असल्यामुळे समाधान व्यक्त केले. आता घरकूल, शौचालय यासारख्या वैयक्तिक शासकीय योजनांचा त्यांना लाभ घेता येईल. तसेच ग्रामपंचायत व इतर यंत्रणेतर्फे सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.