शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

देऊरवाडीच्या नागरिकांना मिळणार जागेचे लीजपट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:30 IST

तालुक्यातील देऊरवाडी येथे वाढीव गावठाणला अखेर मंजुरी मिळाली. यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या जागेचा प्रश्न सुटला असून या कुटुंबांना लवकरच लीजपट्टे वाटप केले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देऊरवाडी येथे ७० च्यावर कुटुंबे वास्तव्य करीत आहे.

ठळक मुद्देगावठाण मंजूर : अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर आले यश

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील देऊरवाडी येथे वाढीव गावठाणला अखेर मंजुरी मिळाली. यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या जागेचा प्रश्न सुटला असून या कुटुंबांना लवकरच लीजपट्टे वाटप केले जाणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून देऊरवाडी येथे ७० च्यावर कुटुंबे वास्तव्य करीत आहे. मात्र जागेच्या मालकी हक्काअभावी त्यांना मूलभूत सुविधा व वैयक्तिक लाभ मिळत नव्हता. याकरिता त्यांचे सतत प्रयत्न सुरू होते. आता गावठाणला मंजुरी मिळाल्यामुळे गावकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश आले. तेथे अनेक कुटुंबांना स्वत:चे घर नसल्यामुळे गावातील झोपडपट्टीत कुडाच्या घरात अनेक वर्षांपासून वास्तव्य करावे लागत होते. गावठाण मंजूर नसल्यामुळे या कुटुंबांना शासनाच्या कोणत्याही सुविधा मिळत नव्हत्या. जागेच्या मालकी हक्काची नोंद नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून त्यांना वंचित राहावे लागत होते.गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे याबाबत समस्या मांडल्या. मात्र कुणीही दखल घेतली नाही. अखेर गावातील सचिन ठाकरे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर स्थानिक पातळीवर पाठपुरावा केला. नंतर गावकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. अखेर तहसीलदार अरुण शेलार यांनी त्यांची दखल घेऊन तलाठी, ग्रामपंचायत सचिव अहवाल, ग्रामपंचायत ठराव व इतर प्रक्रिया पूर्ण करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वाढीव गावठाण मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला. त्यानंतर ३.६ हेक्टर जागेला मंजुरी देण्यात आली.आता या जागेवर प्लॉट पाडून येथील रहिवाशांना लवकरच जागेचे लीजपट्टे वाटप केले जाणार आहे.ही समस्या सोडविण्यासाठी सचिन ठाकरे, सरपंच चैताली चौधरी, उपसरपंच गौतम वासनिक, ग्रामपंचायत सदस्य सुनील टेकाम तसेच वसंत कुरशिंगे, बबन राऊत, मारुती आत्राम यांच्यासह गावकऱ्यांनी पाठपुरावा केला.नागरिकांमध्ये समाधानगेल्या अनेक वर्षांपासून कुडाच्या घरात दिवस काढून अनेक यातना भोगलेल्या झोपडपट्टीवासीयांनी मालकीचे घर मिळणार असल्यामुळे समाधान व्यक्त केले. आता घरकूल, शौचालय यासारख्या वैयक्तिक शासकीय योजनांचा त्यांना लाभ घेता येईल. तसेच ग्रामपंचायत व इतर यंत्रणेतर्फे सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.