शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

काँग्रेसचे नेतृत्त्व पुन्हा पराभुताकडेच !

By admin | Updated: November 6, 2014 23:02 IST

ज्या नेत्याच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात काँग्रेस लोकसभेत आणि पाठोपाठ विधानसभेत पराभूत झाली त्याच नेत्याकडे पुन्हा जिल्हा काँग्रेसचे नेतृत्त्व ठेवण्याची तयारी पक्षस्तरावर सुरू आहे.

यवतमाळ : ज्या नेत्याच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात काँग्रेस लोकसभेत आणि पाठोपाठ विधानसभेत पराभूत झाली त्याच नेत्याकडे पुन्हा जिल्हा काँग्रेसचे नेतृत्त्व ठेवण्याची तयारी पक्षस्तरावर सुरू आहे. या पराभूत नेत्याच्या नेतृत्त्वात पुन्हा काँग्रेसच्या नव्या टीमची जुळवाजुळव केली जात आहे.जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दोन मंत्री पराभूत झाले. त्यावेळी वामनराव कासावार हे जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर राजीनाम नाट्य रंगले. त्यातून वामनरावांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाला जीवदान मिळविले. वामनरावांच्याच नेतृत्त्वात काँग्रेस विधानसभा निवडणुकीला सामोरे गेली. जिल्हाध्यक्ष स्वत: वणी विधानसभेच्या आखाड्यात उतरल्याने त्यांना पक्षाच्या अन्य उमेदवारांसाठी काहीही योगदान देता आले नाही. निवडणूक काळात काँग्रेसची कार्यकारिणीही अस्तित्वात नव्हती. केवळ जिल्हाध्यक्ष होते. तेही स्वत:च्या निवडणुकीत गुंतले होते. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा जिल्हा कार्यकारिणीशिवाय काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकांना सामोरे गेला. त्यामुळे व्हायचे तेच झाले. काँग्रेसचा पूर्णत: सफाया झाला. वणी, राळेगाव, आर्णी, यवतमाळ, उमरखेड हा काँग्रेसचा गड भाजपमय झाला. नवख्या उमेदवारांनी काँग्रेसच्या दीर्घ अनुभवी नेत्यांना पराभवाची धूळ चारली. काँग्रेसचे नेते आता मोदी लाटेआड स्वत:चा पराभव लपवित असले तरी या निवडणुकीने काँग्रेस व कार्यकर्ते, काँग्रेस व मतदार यांच्यात वाढलेली दरी अधोरेखित केली. विधानसभेतील पराभवाचे चिंतन करण्याची गरज अद्याप जिल्ह्यातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला वाटलेली नाही. उलट प्रमुख नेत्यांनी विद्यमान जिल्हाध्यक्षाकडेच पद कसे कायम राहील, यासाठी पुन्हा प्रयत्न चालविले आहे. पुन्हा जिल्हा काँग्रेसची वाटचाल पराभूताच्या नेतृत्त्वातच होण्याची चिन्हे आहेत. वास्तविक नव्या दमाच्या तरुणाकडे जिल्हा काँग्रेसची धुरा सोपविणे अपेक्षित होते. मात्र जिल्हा कार्यकारिणीत कुणाला घ्यावे, यासाठी प्रमुख पराभूत उमेदवारांची छुपी बैठक पार पडली. यावरून नव्या कार्यकारिणीत पुन्हा जुने चेहरे दिसणार हे स्पष्ट होते. (जिल्हा प्रतिनिधी)