शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

कार्यकर्त्यांच्या भूमिकेने नेते अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 21:45 IST

अंतर्गत मतभेदातून कार्यकर्त्यांनी बंडाची भूमिका स्विकारल्याने भाजपा, सेना व कॉंग्रेसमधील प्रस्थापित नेते सध्या अस्वस्थ आहेत. कधी नव्हे ते यावेळी एकाच पक्षातून अनेक कार्यकर्ते तिकीट मागण्यासाठी पुढे आले आहेत. त्यात कॉंग्रेस पक्षातील इच्छुकांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : कॉंग्रेस, भाजपा, शिवसेनेत इच्छुकांची संख्या अधिक

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : अंतर्गत मतभेदातून कार्यकर्त्यांनी बंडाची भूमिका स्विकारल्याने भाजपा, सेना व कॉंग्रेसमधील प्रस्थापित नेते सध्या अस्वस्थ आहेत. कधी नव्हे ते यावेळी एकाच पक्षातून अनेक कार्यकर्ते तिकीट मागण्यासाठी पुढे आले आहेत. त्यात कॉंग्रेस पक्षातील इच्छुकांची संख्या अधिक आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांच्या या भूमिकेने नेते चिंतेत पडले आहेत.कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना आता चेहरा बदल हवा आहे. त्यामुळे तब्बल १७ जणांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितले आहे. त्यात कॉंग्रेसशी संलग्नित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, राजूर कॉलरी येथील पंचायत समितीचे माजी सभापती, जिल्हा परिषदेचे माजी सभापती, जिल्हा परिषदेच्या विद्यमान महिला सभापती, बँक उपाध्यक्षाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण प्रस्थापित नेत्याच्या अगदी निकटस्थ मानले जातात. या ईच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने या मागे मोठा राजकीय ‘गेम’ असल्याचीही चर्चा रंगत आहे.दुसरीकडे भाजपामध्ये दोन युवा कार्यकर्त्यांनीदेखील तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यातील एक भाजपाच्या युवा चळवळीशी संबंधित संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे, तर दुसरा ईच्छुक उमेदवार ‘संघ’ परिवाराशी कनेक्शन ठेऊन आहे. हे दोघे विद्यमान आमदारांना तिकीटासाठी कसा शह देतील, यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.शिवसेनेत उघडपणे पडलेले दोन गट, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दोन वर्षांपूर्वी कॉंग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या एका नेत्याने पक्षातच वेगळी चूल मांडली आहे. याही पक्षात चेहरा बदल करण्याची भाषा बोलली जात आहे.सेनेतील काही नाराज कार्यकर्ते सध्या या नेत्यासोबत आहेत. मात्र वणीतील प्रस्थापित शिवसेना नेत्याला शिवसेनेतील हा नाराज गट शह देऊ शकेल काय, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मनसे आणि राष्टÑवादी कॉंग्रेसमध्ये मात्र सध्या तरी कलह पुढे आलेला नाही. या दोनही पक्षातील संभावित उमेदवार निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.राजकीय पक्षांच्या युतीकडे सर्वांच्या नजरावणी विधानसभा मतदार संघातील सर्वच प्रस्थापित नेते आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले असले तरी कोणत्या राजकीय पक्षाशी कुण्या पक्षाशी युती होते, हे अद्याप ठरले नाही. युती झाल्यास या पक्षांमध्ये बंडाळी वाढण्याची चिन्हे आहेत. आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी सामंजस्याने दूर करून त्यांना राजकीय प्रवाहात आणण्याची मोठी जबाबदारी विविध पक्षातील नेत्यांना पार पाडावी लागणार आहे. अन्यथा उमेदवारांना त्यांच्याच पक्षातून फटाके लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा