शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले, तरीही ‘वसंत’ अवसायनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST

१९ हजार उस उत्पादक सभासदाना पडलेला प्रश्न. उमरखेड : पुसद उमरखेड महागाव हदगाव हिमायतनगर या पाच तालुक्यांतील ...

१९ हजार उस उत्पादक सभासदाना पडलेला प्रश्न.

उमरखेड : पुसद उमरखेड महागाव हदगाव हिमायतनगर या पाच तालुक्यांतील १९ हजार ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसह ६०० कामगारांची कामधेनू विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावरील "वसंत" सहकारी कारखान्यांवर आर्थिक बोजा वाढतच गेल्यामुळे तो अखेर ''अवसायनात'' गेला. सर्व पक्षीय राजकारणी लोकांच्या स्वार्थी पणामुळे कारखाना अधोगतीला गेला आणि यामुळे पाच तालुक्यांतील सभासद शेतकरी, मजूर, छोटे मोठे व्यापारी देशोधडीला लागले.

सर्व पक्षीय राजकारणी नेत्यांनी वसंत कारखाना सुरू करण्यासाठी मोठा गाजावाजा केला होता. मग ही वेळ कारखान्यांवर का ओढवली ? असा प्रश्न सभासद शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. वसंतच्या भरवशावर राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी याचे उत्तर देणे गरजेचं आहे. एकेकाळी पाच-सहा महिने कार्यरत राहून तीन लाखांवर गाळप करणाऱ्या कारखान्याची सन २०१६ -१७ मध्ये आर्थिक परिस्थिती डबघाईस येऊन ठप्प झाला. २०१७ -१८ च्या हंगामात कारखाना पूर्णतः बंद पडला. संचित तोटा वाढल्याचे प्राधिकृत अधिकाऱ्यांने आपल्या अहवालात नमूद केले होते. अखेर प्रादेशिक सहसंचालक अमरावती (साखर) यांनी हा कारखाना अवसायनात काढला. याला जबाबदार कोण? असा प्रश्न सभासद शेतकरी आणि नागरिकांच्या मनात आहे.

कारखान्याला शासन आर्थिक मदत करीत नाही म्हणून २०१९ मध्ये ॲड. माधवराव माने यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाने राजीनामे दिले होते. त्यामुळे कारखान्यावर प्रशासक नेमले गेले. दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकीत कर्ज वसुली करण्यासाठी सरकारच्या विरोधात जात कारखाना विकून थकीत रक्कम मिळावी म्हणून नागपूर न्यायालयात दाद मागितली. त्यावेळी बँकेचे या भागातील काही संचालक गप्प का बसले होते ? दुसरीकडे वसंत बचाव समिती कारखाना भाडे तत्त्वावर देण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. परंतु त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी आतापर्यंत दोन वेळेस निविदाप्रक्रियाही पार पडली. परंतु कारखाना अद्याप भाडेतत्त्वावर गेला नाही. सध्या नेमकी काय प्रक्रिया सुरू आहे. राजकीय नेत्यांनी समोर येऊन याबाबतची माहिती दिली पाहिजे. सर्व पक्षीय कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत असतील तर मग विरोध कोणाचा हे पण समजले पाहिजे.