शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले, तरीही ‘वसंत’ अवसायनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST

१९ हजार उस उत्पादक सभासदाना पडलेला प्रश्न. उमरखेड : पुसद उमरखेड महागाव हदगाव हिमायतनगर या पाच तालुक्यांतील ...

१९ हजार उस उत्पादक सभासदाना पडलेला प्रश्न.

उमरखेड : पुसद उमरखेड महागाव हदगाव हिमायतनगर या पाच तालुक्यांतील १९ हजार ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसह ६०० कामगारांची कामधेनू विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावरील "वसंत" सहकारी कारखान्यांवर आर्थिक बोजा वाढतच गेल्यामुळे तो अखेर ''अवसायनात'' गेला. सर्व पक्षीय राजकारणी लोकांच्या स्वार्थी पणामुळे कारखाना अधोगतीला गेला आणि यामुळे पाच तालुक्यांतील सभासद शेतकरी, मजूर, छोटे मोठे व्यापारी देशोधडीला लागले.

सर्व पक्षीय राजकारणी नेत्यांनी वसंत कारखाना सुरू करण्यासाठी मोठा गाजावाजा केला होता. मग ही वेळ कारखान्यांवर का ओढवली ? असा प्रश्न सभासद शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. वसंतच्या भरवशावर राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी याचे उत्तर देणे गरजेचं आहे. एकेकाळी पाच-सहा महिने कार्यरत राहून तीन लाखांवर गाळप करणाऱ्या कारखान्याची सन २०१६ -१७ मध्ये आर्थिक परिस्थिती डबघाईस येऊन ठप्प झाला. २०१७ -१८ च्या हंगामात कारखाना पूर्णतः बंद पडला. संचित तोटा वाढल्याचे प्राधिकृत अधिकाऱ्यांने आपल्या अहवालात नमूद केले होते. अखेर प्रादेशिक सहसंचालक अमरावती (साखर) यांनी हा कारखाना अवसायनात काढला. याला जबाबदार कोण? असा प्रश्न सभासद शेतकरी आणि नागरिकांच्या मनात आहे.

कारखान्याला शासन आर्थिक मदत करीत नाही म्हणून २०१९ मध्ये ॲड. माधवराव माने यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाने राजीनामे दिले होते. त्यामुळे कारखान्यावर प्रशासक नेमले गेले. दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकीत कर्ज वसुली करण्यासाठी सरकारच्या विरोधात जात कारखाना विकून थकीत रक्कम मिळावी म्हणून नागपूर न्यायालयात दाद मागितली. त्यावेळी बँकेचे या भागातील काही संचालक गप्प का बसले होते ? दुसरीकडे वसंत बचाव समिती कारखाना भाडे तत्त्वावर देण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. परंतु त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी आतापर्यंत दोन वेळेस निविदाप्रक्रियाही पार पडली. परंतु कारखाना अद्याप भाडेतत्त्वावर गेला नाही. सध्या नेमकी काय प्रक्रिया सुरू आहे. राजकीय नेत्यांनी समोर येऊन याबाबतची माहिती दिली पाहिजे. सर्व पक्षीय कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत असतील तर मग विरोध कोणाचा हे पण समजले पाहिजे.