शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘एलसीबी’त अधिकारावरून रस्सीखेच

By admin | Updated: July 15, 2014 00:13 IST

स्थानिक गुन्हे शाखेत पहिल्यांदाच दोन पोलीस निरीक्षक नियुक्त केले गेले आणि अपेक्षेनुसार चारच दिवसात त्यांच्यात अधिकारावरून वादंग वाजले. अखेर प्रमुख निरीक्षक वैद्यकीय रजेवर निघून गेले.

अखेर वादंग वाजलेच : पोलीस निरीक्षक वैद्यकीय रजेवरयवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखेत पहिल्यांदाच दोन पोलीस निरीक्षक नियुक्त केले गेले आणि अपेक्षेनुसार चारच दिवसात त्यांच्यात अधिकारावरून वादंग वाजले. अखेर प्रमुख निरीक्षक वैद्यकीय रजेवर निघून गेले. स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) दोन पोलीस निरीक्षक दिले गेले. संजय गुज्जलवार हे प्रमुख तर त्यांच्या दिमतीला शिवाजी बचाटे यांना नेमले गेले. दोघेही आपली वर्णी लावून घेण्यात राजकीय मार्गाने यशस्वी झालेले. एकाने काँग्रेसची तर दुसऱ्याने राष्ट्रवादीची वाट निवडली. एलसीबीचे प्रमुख पद पटकाविण्यात राष्ट्रवादीने यश मिळविले असले तरी प्रत्यक्ष अधिकार खेचून घेण्यात मात्र काँग्रेस वरचढ ठरली. राष्ट्रवादीच्या कोट्यातून आलेल्या पीआयला यवतमाळ किंवा अमरावती या दोनही ठिकाणी स्वत:साठी ‘सॉफ्ट कॉर्नर’ निर्माण करता आला नाही. त्यात काँग्रेसच्या कोट्यातील पीआय मात्र काहीसे यशस्वी ठरले. त्यांच्यावरही अमरावतीचे प्रशासन अद्याप मेहेरबान झालेले नाही. त्यासाठी त्यांनी प्रयत्न मात्र कायम ठेवले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादावर काँग्रेसच्या कोट्यातील पीआयने बहुतांश अधिकार आपणाकडे खेचण्यात यश मिळविले. अखेर याच मुद्यावर राष्ट्रवादीच्या कोट्यातील पीआयचे प्रशासनाशी ‘वाजले’. त्यानंतर हे पीआय ‘आजारी’ रजेवर निघून गेले. ते मुंबईत तळ ठोकणार असल्याची चर्चा आहे. ‘सेकंड’मधील नियुक्तीनंतरही सर्व काही मनासारखे घडल्याने काँग्रेसच्या कोट्यातील पीआय जाम खूश आहेत. आजारी रजेवरील पीआयचे परस्परच इतरत्र कुठे तरी पुनर्वसन व्हावे आणि एलसीबीच्या ‘वाट्या’तील अडसर दूर व्हावा ही सुप्त इच्छा ते बाळगून आहेत. त्यासाठी काँग्रेसमधील पोलिसांच्या गॉडफादरला पुन्हा कामालाही लावले गेले आहे. इकडे आजारी रजेवरील पीआयने १८ जुलै ही ‘डेडलाईन’ ठेवली आहे. १८ ला वरिष्ठांच्या बदल्यांची यादी जारी होण्याची शक्यता आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यात काही ‘चेंज’ झाल्यास ते पीआय पुन्हा ‘तंदुरुस्त’ होऊन एलसीबीत परतणार आहेत. चेंज न झाल्यास ‘आजारी’ रजा विधानसभेतील बदल्यांपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. या मोठ्या ‘चेंज’साठी राष्ट्रवादीचे अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. तर चेंज होऊ नये, किमान विधानसभा निघावी म्हणून काँग्रेसची नेते मंडळी मुंबईच्या टिळक भवनातून सूत्रे हलवित असल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)