शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

लावणीच माझा श्वास - सुरेखा पुणेकर : रसिकांनी दृष्टिकोन बदलणे आवश्यक

By admin | Updated: January 17, 2015 00:17 IST

वयाच्या आठव्या वर्षापासून तमाशाचा फडात नाचू लागले. निसर्गाने दिलेला गोड आवाज आणि तमाशाच्या फडाच्या शाळेतच आलेलं पदलालित्य ...

यवतमाळ : वयाच्या आठव्या वर्षापासून तमाशाचा फडात नाचू लागले. निसर्गाने दिलेला गोड आवाज आणि तमाशाच्या फडाच्या शाळेतच आलेलं पदलालित्य यामुळे मला शाळेची पायरी चढता आली नाही. लावणी हाच माझा अभ्यासक्र म तर फड हिच शाळा झाली. लावणीने मला भरभरून दिले. लावणी हाच माझा श्वास आहे. लावणीशिवाय मी दुसरा विचारच करू शकत नाही अशी भावना लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना व्यक्त केली.नेर येथील न्यू आझाद दुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी आयोजित कार्यक्रमासाठी आल्या असता त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या. यावेळी सुरेखा पुणेकर यांनी आपला खडतर जीवनप्रवास उलगडला. लहानपणापासूनच मला लावणीचे वेड होते. परंपरेने तमाशाचा व्यवसाय चालून आला होता. आई-वडिलांचा तमाशाचा फड होता. दसऱ्यापासून घराबाहेर पडावे लागायचे. त्यामुळे शाळेचा आणि माझा अजिबात संबंध आला नाही. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी सुरूवातीला केवळ पोटाची भूक भागावी म्हणून भाकरीवर लावण्यांचे कार्यक्रम सादर केले. लावणी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक अलंकार आहे. त्याला राजाश्रय आणि लोकाश्रय मिळावा असे स्वप्न मला पडायचे असे त्या म्हणाल्या.१९९८ ला मुंबई येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्योग व सिनेजगतातील अनेक नामवंत हजर होते. यावेळी मी दिलखेचक लावणी सादर केली.‘ तुम्हा बघूनी डावा डोळा’ या दिलखेचक अदाकारीने साऱ्या मुंबईला वेड लावले होते. त्या दिवसापासूूनच मला लावणीची नाट्यपूर्ण बांधणी व्हावी असे वाटत होते. अकलूज मराठा सेवा संघाने प्रथम कार्यक्रम घेतला. तेव्हापासून ही घोडदौड सुरू झाली. बैलगाडीतून गावोगाव सुरू झालेल्या भटकंतीला आशेची नवी पालवी फुटू लागली. बैलगाडी ते विमान आणि नारायणगांव ते न्यूयार्कच्या मेडिसन स्क्वेअर हा माझा लावणीचा प्रवास अत्यंत खडतर असल्याचे सांगतांना नकळत त्यांचे डोळे पाणावले होते. लावणीकडे अश्लिल नजरेतून पाहिले जाते. रसिकांनी आपला हा दृष्टीकोन बदलविणे आवश्यक आहे. गरबा, भांगडा, कथ्थक या लोककलांचे जर ते राज्य संवर्धन करीत असेल तर लावणी या सभ्य प्रकाराचे संवर्धन का करू नये? असा सवालही सुरेखा पुणेकर यांनी यावेळी उपस्थित केला. पिकल्या पानाचा देठ कसा हिरवा, या रावजी बसा भावजी, कारभारी दमान या गाण्यांनी मला भरभरून दिलं आहे. आज जीवनांत जी काही समृध्दी आली आहे ती लावणीमुळेच. आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत मी लावणीसाठीच जगेन कारण लावणी नसती तर सुरेखा पुणेकर जगाला माहित झाली नसती, असे त्यांनी शेवटी सांगितले. (नगर प्रतिनिधी)