शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

नेरमधील २२ गावांत पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:24 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठीचे विविध प्रकल्प राबविल्यानंतरही तालुक्याच्या अनेक गावातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो सुरू आहे. तब्बल २२ गावांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी होरपळ होत आहे. सात गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नळ योजनांच्या कामांमधील दोषामुळे पाणीप्रश्न गंभीर झाला असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देसात ठिकाणी टँकर : प्रशासनाच्या कृती आराखड्यात दहा लाखांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठीचे विविध प्रकल्प राबविल्यानंतरही तालुक्याच्या अनेक गावातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो सुरू आहे. तब्बल २२ गावांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी होरपळ होत आहे. सात गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नळ योजनांच्या कामांमधील दोषामुळे पाणीप्रश्न गंभीर झाला असल्याचे सांगितले जाते.तालुका प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दहा लाख ४० हजारांचा कृती आराखडा मंजूर केला आहे. यातून टँकरने पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण आदी उपायांना प्राधान्य दिले जाणार आहे. तालुक्याच्या काही गावात एप्रिलपासूनच पाण्यासाठी मारामार सुरू आहे. मे महिन्यात याची तीव्रता आणखी वाढली आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपाच्या पाण्याची पातळी कमालीची खोल गेली आहे. २२ गावे पाणीटंचाईग्रस्त आहे. सात गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.खरडगाव, सातेफळ, आजंती, चिखली(कान्होबा), दहीफळ, जवळगाव, पेंढारा, मालखेड(खु), बोरगाव, घारेफळ, घुई, वाळकी, सावंगा, चिकणी(डोमगा), चिचगाव, झोंबाडी, पेंढारा, मालखेड(बु), सावरगाव(काळे), सोनखास, सोनवाढोणा, उत्तरवाढोणा आदी गावांमध्ये पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. टंचाईग्रस्त गावातील प्रश्न निकाली काढण्याच्यादृष्टीने प्रयत्न होत असल्याचे गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे यांनी सांगितले. नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.योजनांची कामे तकलादूतालुक्याच्या ग्रामीण भागात झालेली पाणीपुरवठा योजनांची कामे तकलादू आहेत. पाईपलाईन योग्यरित्या टाकली गेली नाही. निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आलेला आहे. जागोजागी फुटलेले पाईप दूषित पाणीपुरवठ्यासाठी कारणीभूत ठरत आहे. या व इतर कारणांमुळे पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.