शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

नेरमधील २२ गावांत पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:24 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठीचे विविध प्रकल्प राबविल्यानंतरही तालुक्याच्या अनेक गावातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो सुरू आहे. तब्बल २२ गावांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी होरपळ होत आहे. सात गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नळ योजनांच्या कामांमधील दोषामुळे पाणीप्रश्न गंभीर झाला असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देसात ठिकाणी टँकर : प्रशासनाच्या कृती आराखड्यात दहा लाखांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठीचे विविध प्रकल्प राबविल्यानंतरही तालुक्याच्या अनेक गावातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो सुरू आहे. तब्बल २२ गावांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी होरपळ होत आहे. सात गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नळ योजनांच्या कामांमधील दोषामुळे पाणीप्रश्न गंभीर झाला असल्याचे सांगितले जाते.तालुका प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दहा लाख ४० हजारांचा कृती आराखडा मंजूर केला आहे. यातून टँकरने पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण आदी उपायांना प्राधान्य दिले जाणार आहे. तालुक्याच्या काही गावात एप्रिलपासूनच पाण्यासाठी मारामार सुरू आहे. मे महिन्यात याची तीव्रता आणखी वाढली आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपाच्या पाण्याची पातळी कमालीची खोल गेली आहे. २२ गावे पाणीटंचाईग्रस्त आहे. सात गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.खरडगाव, सातेफळ, आजंती, चिखली(कान्होबा), दहीफळ, जवळगाव, पेंढारा, मालखेड(खु), बोरगाव, घारेफळ, घुई, वाळकी, सावंगा, चिकणी(डोमगा), चिचगाव, झोंबाडी, पेंढारा, मालखेड(बु), सावरगाव(काळे), सोनखास, सोनवाढोणा, उत्तरवाढोणा आदी गावांमध्ये पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. टंचाईग्रस्त गावातील प्रश्न निकाली काढण्याच्यादृष्टीने प्रयत्न होत असल्याचे गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे यांनी सांगितले. नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.योजनांची कामे तकलादूतालुक्याच्या ग्रामीण भागात झालेली पाणीपुरवठा योजनांची कामे तकलादू आहेत. पाईपलाईन योग्यरित्या टाकली गेली नाही. निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आलेला आहे. जागोजागी फुटलेले पाईप दूषित पाणीपुरवठ्यासाठी कारणीभूत ठरत आहे. या व इतर कारणांमुळे पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.