शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अंत्यविधीनंतर आंघाेळीसाठी नदीत मारलेली उडी ठरली शेवटचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:48 IST

मार्डी : मित्राच्या मृत्यूचे वृत्त कळल्यानंतर त्याने अंत्यविधीसाठी धाव घेतली. अत्यंत शोकाकुल वातावरणात हा अंत्यविधी पार पडला. त्यानंतर आंघोळीसाठी ...

मार्डी : मित्राच्या मृत्यूचे वृत्त कळल्यानंतर त्याने अंत्यविधीसाठी धाव घेतली. अत्यंत शोकाकुल वातावरणात हा अंत्यविधी पार पडला. त्यानंतर आंघोळीसाठी दांडगाव लगतच्या वर्धा नदीत आंघोळीसाठी त्याने उडी मारली. मात्र, ही उडी शेवटचीच ठरली. खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दांडगाव येथे घडली. प्रवीण ऊर्फ पंढरी भाऊराव चिंचोलकर (वय ३८) असे मृताचे नाव आहे. दांडगाव येथे एकापाठोपाठ आणखी एक मृत्यू पाण्यात बुडून झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

१३ ऑगस्टला दांडगाव येथील प्रफुल्ल मते या युवकाने वर्धा नदीवरील मारडा बंधाऱ्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. त्याचा अंत्यविधी १४ ऑगस्टला सायंकाळी ५ च्या सुमारास दांडगाव लगतच्या वर्धा नदीकिनारी पार पडला. या अंत्यविधीसाठी मृत प्रफुल्लचा मित्र प्रवीण चिंचोलकर आला होता. अंत्यविधी पार पडल्यानंतर काहीजण आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले. त्यात प्रवीणसुद्धा होता. मात्र, प्रवीणला नदीतील खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे आंघोळीसाठी उतरल्यानंतर तो गटांगळ्या खाऊ लागला. तेथे उपस्थित ग्रामस्थांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. रात्री उशिरापर्यंत प्रवीणचा शोध घेण्यात आला. त्यानंतर अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. या घटनेची माहिती गोरजचे पोलीस पाटील प्रमोद ताजने यांनी पोलीस स्टेशन कळविली. प्रवीणच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.