शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस येथील सहकारी संस्थांना अखेरची घरघर

By admin | Updated: April 20, 2015 00:07 IST

‘विनासहकार नही उद्धार’ या उक्तीप्रमाणे दिग्रस तालुक्यात काही वर्षांपूर्वी सहकारी संस्था भरभराटीस आल्या होत्या.

अनेक बेरोजगार : सहकार क्षेत्र झाले भ्रष्टाचाराचे कुरणप्रकाश सातघरे  दिग्रस‘विनासहकार नही उद्धार’ या उक्तीप्रमाणे दिग्रस तालुक्यात काही वर्षांपूर्वी सहकारी संस्था भरभराटीस आल्या होत्या. शेकडो हातांना काम मिळाले होते. परंतु काही दिवसातच या संस्था भ्रष्टाचाराचे कुरण ठरल्या. आज सहकारातील अनेक संस्थांना अखेरची घरघर लागली आहे. सहकारी संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे.सहकारी संस्थांच्या माध्यमातून विकासाचे स्वप्न पाहिले गेले. दिग्रस तालुक्यात अनेक सहाकरी संस्था तत्कालिन नेत्यांनी मोठ्या कष्ठाने उभ्या केल्या. जिल्ह्यातील नामवंत प्रथम क्रमांक असलेली खरेदी-विक्री संस्था अनेक शेतकऱ्यांच्या आशेचे स्थान झाली होती. त्यासोबतच जिनिंग, सहकारी बँका, सोसायट्याही भरभराटीस आल्या होत्या. शेतकरी आपल्या हक्काच्या संस्था म्हणून विकासासाठी धडपडत होते. परंतु काही महाभागांनी या सहकारी क्षेत्राला आपली खासगी मालमत्ता केली. शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खावून अनेकजण गब्बर झाले. शेतकरी मात्र आहे त्याच स्थितीत आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आपले खिसे कसे भरता येईल, यावरच सर्वांचा भर दिसतो आहे.तालुक्यातील सहकारी संस्था व सहकारी उद्योगांना घरघर लागली आहे. खरेदी-विक्री संस्था आज भ्रष्टाचाराच्या खाईत गेली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार कसे द्यायचे, या विवंचनेत आहे. जिनिंग संस्था तीन वर्षांपासून बंद आहे. तिला लिजधारकांनीच कुलूप लावले आहे. आता जिनिंग फॅक्टरीच्या आवारातील गवत विकण्याशिवाय कोणतेच काम नाही. बाजार समितीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोपावर आरोप होत आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी कोणतीही योजना राबविली जात नाही. तालुक्याची संजीवनी म्हणून नावलौकिक जिनिंग संस्था अवसायनात काढण्यात आली आहे. सहकारी सोसायट्या व बँकेची अवस्था दयनीय झाली आहे. सहकाराला लागलेल्या ग्रहणाचा परिणाम तालुक्याच्या बाजारपेठेवर होत आहे.कधी काळी कापसासाठी दिग्रसची बाजारपेठ प्रसिद्ध होती. दूरवरून व्यापारी कापूस खरेदीसाठी येत होते. सहकाराच्या माध्यमातून जिनिंग केले जात होते. परंतु आता या संस्थांना अवकळा आल्याने तेथील कामगारांनाही काम मिळत नाही. कामाच्या शोधात शेकडो मजूर परप्रांतात स्थलांतरित होत आहे. तर दुसरीकडे खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. यातून शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत असल्याचा आरोप होत आहे.व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूटसहकारी संस्थेत शेतकरीच मालक असल्याने शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव मिळत होता. शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास आवाज उठविला जात होता. परंतु आता सहकारी संस्था मोडकळीस आल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान्य खुल्या बाजारात विकावे लागते. यातून शेतकऱ्यांची प्रचंड लूट होत आहे. कुणी आवाजही उठवायला तयार नसतो. रोख पैसे हवे असल्यास कट्टी कापली जाते. खेडा खरेदीत दांड मारण्याचे प्रमाणही वाढले आहे.