शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावर अखेरच्या दिवशी दीडशे आक्षेप

By admin | Updated: February 5, 2015 23:15 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतोच ग्रामीण भाग ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेमुळे राजकीयदृष्ट्या तापलेला आहे. पहिल्या टप्प्यातील

५२० ग्रामपंचायती : पहिल्या टप्प्यातील ४६८ ग्रामपंचायतींचे वॉर्ड फॉर्मेशन पूर्णयवतमाळ : लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतोच ग्रामीण भाग ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेमुळे राजकीयदृष्ट्या तापलेला आहे. पहिल्या टप्प्यातील ४६८ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत झाली असून दुसऱ्या टप्प्यातील ५२० ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीवर गुरुवार या अखेरच्या दिवसापर्यंत २५० आक्षेप घेण्यात आले. ग्रामीण भागातील राजकीय घडामोडींनी खऱ्या अर्थाने वेग घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील म्हणजे मार्च महिन्यात ४६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. त्यासाठी वॉर्ड फॉर्मेशन आणि सदस्यांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच अशा गावात मतदारयादीचा कार्यक्रम लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील ५२० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जुलै ते डिसेंबर महिन्यात होवू घातल्या आहे. त्यासाठी आतापासूनच प्रत्येक गावात वॉर्ड फॉर्मेशनची प्रक्रिया राबविण्यात आली. तालुक्याच्या ठिकाणावरून महिला व पुरुषांच्या आरक्षणाची सोडतही झाली. या आरक्षणावर आक्षेप घेण्यासाठी प्रशासनाकडून गुरुवार ५ जानेवारीची मुदत देण्यात आली होती. शेवटच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागात आक्षेप घेणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. शेवटच्या दिवशी तब्बल १०० जणांनी आरक्षणाच्या सोडतीवर आक्षेप नोंदविला होता. यापूर्वी १५० आक्षेप आले होते. शेवटच्या काही तासात आक्षेप घेणाऱ्यांची एकच झुंबड केल्याने कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली होती. गावातील राजकीय समीकरण वॉर्ड आणि त्यातील महिला पुरुषांचे आरक्षण या भोवती गुरफटलेले असते. बऱ्याच ठिकाणी एका वॉर्डात सर्वच महिलांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पुरुषांनी अन्याय झाल्याच्या भावनेतून किमान एका वॉर्डात एक जागा मिळावी, अशा स्वरूपाचेही आक्षेप नोंदविले आहे. काही ठिकाणी लोकसंख्येच्या आधारानुसार जातीचे आरक्षण देण्यात आले नाही. अशा काही तांत्रिक स्वरूपाच्या चुका हेरून आक्षेप घेतले जात आहे. मात्र ज्या आक्षेपांमध्ये कायदेशीर तथ्य आहे अशाच आक्षेपांना ग्राह्य धरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एकंदर आता ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले असून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत गावपातळीवरच्या घडामोडींना वेग येणार आहे. आता सध्या गावपुढारी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारतानाच दिसतात. लवकरच हे चित्र पालटणार असून गावागावातील समीकरणाची जुळवाजुळव करण्यात ही पुढारी मंडळी व्यस्त होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)