शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

आरक्षणावर अखेरच्या दिवशी दीडशे आक्षेप

By admin | Updated: February 5, 2015 23:15 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतोच ग्रामीण भाग ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेमुळे राजकीयदृष्ट्या तापलेला आहे. पहिल्या टप्प्यातील

५२० ग्रामपंचायती : पहिल्या टप्प्यातील ४६८ ग्रामपंचायतींचे वॉर्ड फॉर्मेशन पूर्णयवतमाळ : लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतोच ग्रामीण भाग ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेमुळे राजकीयदृष्ट्या तापलेला आहे. पहिल्या टप्प्यातील ४६८ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत झाली असून दुसऱ्या टप्प्यातील ५२० ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीवर गुरुवार या अखेरच्या दिवसापर्यंत २५० आक्षेप घेण्यात आले. ग्रामीण भागातील राजकीय घडामोडींनी खऱ्या अर्थाने वेग घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील म्हणजे मार्च महिन्यात ४६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. त्यासाठी वॉर्ड फॉर्मेशन आणि सदस्यांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच अशा गावात मतदारयादीचा कार्यक्रम लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील ५२० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जुलै ते डिसेंबर महिन्यात होवू घातल्या आहे. त्यासाठी आतापासूनच प्रत्येक गावात वॉर्ड फॉर्मेशनची प्रक्रिया राबविण्यात आली. तालुक्याच्या ठिकाणावरून महिला व पुरुषांच्या आरक्षणाची सोडतही झाली. या आरक्षणावर आक्षेप घेण्यासाठी प्रशासनाकडून गुरुवार ५ जानेवारीची मुदत देण्यात आली होती. शेवटच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागात आक्षेप घेणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. शेवटच्या दिवशी तब्बल १०० जणांनी आरक्षणाच्या सोडतीवर आक्षेप नोंदविला होता. यापूर्वी १५० आक्षेप आले होते. शेवटच्या काही तासात आक्षेप घेणाऱ्यांची एकच झुंबड केल्याने कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली होती. गावातील राजकीय समीकरण वॉर्ड आणि त्यातील महिला पुरुषांचे आरक्षण या भोवती गुरफटलेले असते. बऱ्याच ठिकाणी एका वॉर्डात सर्वच महिलांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पुरुषांनी अन्याय झाल्याच्या भावनेतून किमान एका वॉर्डात एक जागा मिळावी, अशा स्वरूपाचेही आक्षेप नोंदविले आहे. काही ठिकाणी लोकसंख्येच्या आधारानुसार जातीचे आरक्षण देण्यात आले नाही. अशा काही तांत्रिक स्वरूपाच्या चुका हेरून आक्षेप घेतले जात आहे. मात्र ज्या आक्षेपांमध्ये कायदेशीर तथ्य आहे अशाच आक्षेपांना ग्राह्य धरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एकंदर आता ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले असून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत गावपातळीवरच्या घडामोडींना वेग येणार आहे. आता सध्या गावपुढारी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारतानाच दिसतात. लवकरच हे चित्र पालटणार असून गावागावातील समीकरणाची जुळवाजुळव करण्यात ही पुढारी मंडळी व्यस्त होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)