शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंबेझरी जंगल बनले जनावर तस्करांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 20:45 IST

ट्रकमधील जनावर तस्करी नजरेत भरत असल्याने तस्करांनी नवा फंडा हाती घेतला आहे. मारेगाव तालुक्यातील आंबेझरीच्या जंगलात जनावरे उतरवायची व तेथून पायवाटेने ती जंगलमार्गे तेलंगणात पोहोचवायची. असा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

ठळक मुद्देपोलिसांपुढे आव्हान : हिंगणघाटवरून हलतात तस्करीची सूत्रे, पिक-अप वाहनांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ट्रकमधील जनावर तस्करी नजरेत भरत असल्याने तस्करांनी नवा फंडा हाती घेतला आहे. मारेगाव तालुक्यातील आंबेझरीच्या जंगलात जनावरे उतरवायची व तेथून पायवाटेने ती जंगलमार्गे तेलंगणात पोहोचवायची. असा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. या तस्करीचे मुख्य सूत्रधार हिंगणघाटमध्ये असून तेथूनच सर्व सूत्रे हलत असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.पाणी व चारा टंचाईमुळे गोपालक अल्प किमतीत आपली जनावरे तस्करांच्या हवाली करत आहेत. हिंगणघाट तालुक्यात हा व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती आहे. खरेदी केलेली जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा व आंध्रप्रदेशात नेली जात आहे. त्यासाठी तस्करांनी आंबेझरीच्या जंगलाची निवड केली आहे. वणी उपविभागासह हिंगणघाट परिसरातून आणलेली जनावरे सर्वप्रथम आंबेझरीच्या जंगलात उतरविली जातात. या तस्करीत हिंगणघाट येथील आठ तस्करांचा सहभाग असल्याची माहिती आहे.आंबेझरीच्या जंगलात जनावरे उतरविल्यानंतर ती जनावरे पायदळ जंगल मार्गाने निमणी, दाभाडी, मांडवा, माथार्जुन, दिग्रसमार्गे तेलंगणा, अदिलाबादकडे नेली जात आहे. यासोबतच पांढरकवडा तालुक्यातील बोरगाव जंगलाच्या पठारावरदेखिल दर रविवारी ही जनावरे उतरविली जात असल्याची माहिती सदर जाणकाराने दिली. तेथून ही जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा, अदिलाबादकडे रवाना करण्यात येत आहे. तसेच जनावरांची निर्यात करण्यासाठी पिक-अप वाहनांचाही वापर करण्यात येत आहे. जवळपास १० पिक-अप वाहनातूनदेखिल जनावरांची तस्करी केली जात आहे.या तस्करीत मारेगाव येथील आसिफ, तस्लीम, पाटणबोरीतील शागीर, पांढरकवडातील कलीम, कळंब येथील आरिफ, शकीर, तस्लीम यांचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे सोमवार आणि मंगळवारी तस्करीवर अधिक जोर असतो. या तस्करीत दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी आंध्रात जात असले तरी पोलिसांच्या कारवाया मात्र शून्य असल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने तस्करीवर टाच आली होती. परंतु अलिकडील काही दिवसात तस्करांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. केवळ ट्रकने जाणाऱ्या जनावरांवरच पोलिसांची नजर असते. नेमका या गोष्टीचा फायदा घेऊनच तस्करांनी जंगल मार्गाने पायदळ जनावरे नेण्याचा फंडा अवलंबला आहे.वन कर्मचारीच बनले खबरेया तस्करांनी काही वन कर्मचाऱ्यांना चिरीमीरी देऊन आपले खबरे बनविल्याची चर्चा आहे. जनावरे कोणत्याही मार्गाने सुरक्षित पोहोचतील, याबाबत हे कर्मचारीच या तस्करांना मार्गदर्शन करीत असल्याने तस्करांचा मार्ग सुकर बनला आहे. सहकार्य करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना तस्करांकडून मोठी बिदागी दिली जात असल्याचे बोलले जात आहे.