शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

आंबेझरी जंगल बनले जनावर तस्करांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 20:45 IST

ट्रकमधील जनावर तस्करी नजरेत भरत असल्याने तस्करांनी नवा फंडा हाती घेतला आहे. मारेगाव तालुक्यातील आंबेझरीच्या जंगलात जनावरे उतरवायची व तेथून पायवाटेने ती जंगलमार्गे तेलंगणात पोहोचवायची. असा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

ठळक मुद्देपोलिसांपुढे आव्हान : हिंगणघाटवरून हलतात तस्करीची सूत्रे, पिक-अप वाहनांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ट्रकमधील जनावर तस्करी नजरेत भरत असल्याने तस्करांनी नवा फंडा हाती घेतला आहे. मारेगाव तालुक्यातील आंबेझरीच्या जंगलात जनावरे उतरवायची व तेथून पायवाटेने ती जंगलमार्गे तेलंगणात पोहोचवायची. असा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. या तस्करीचे मुख्य सूत्रधार हिंगणघाटमध्ये असून तेथूनच सर्व सूत्रे हलत असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.पाणी व चारा टंचाईमुळे गोपालक अल्प किमतीत आपली जनावरे तस्करांच्या हवाली करत आहेत. हिंगणघाट तालुक्यात हा व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती आहे. खरेदी केलेली जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा व आंध्रप्रदेशात नेली जात आहे. त्यासाठी तस्करांनी आंबेझरीच्या जंगलाची निवड केली आहे. वणी उपविभागासह हिंगणघाट परिसरातून आणलेली जनावरे सर्वप्रथम आंबेझरीच्या जंगलात उतरविली जातात. या तस्करीत हिंगणघाट येथील आठ तस्करांचा सहभाग असल्याची माहिती आहे.आंबेझरीच्या जंगलात जनावरे उतरविल्यानंतर ती जनावरे पायदळ जंगल मार्गाने निमणी, दाभाडी, मांडवा, माथार्जुन, दिग्रसमार्गे तेलंगणा, अदिलाबादकडे नेली जात आहे. यासोबतच पांढरकवडा तालुक्यातील बोरगाव जंगलाच्या पठारावरदेखिल दर रविवारी ही जनावरे उतरविली जात असल्याची माहिती सदर जाणकाराने दिली. तेथून ही जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा, अदिलाबादकडे रवाना करण्यात येत आहे. तसेच जनावरांची निर्यात करण्यासाठी पिक-अप वाहनांचाही वापर करण्यात येत आहे. जवळपास १० पिक-अप वाहनातूनदेखिल जनावरांची तस्करी केली जात आहे.या तस्करीत मारेगाव येथील आसिफ, तस्लीम, पाटणबोरीतील शागीर, पांढरकवडातील कलीम, कळंब येथील आरिफ, शकीर, तस्लीम यांचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे सोमवार आणि मंगळवारी तस्करीवर अधिक जोर असतो. या तस्करीत दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी आंध्रात जात असले तरी पोलिसांच्या कारवाया मात्र शून्य असल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने तस्करीवर टाच आली होती. परंतु अलिकडील काही दिवसात तस्करांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. केवळ ट्रकने जाणाऱ्या जनावरांवरच पोलिसांची नजर असते. नेमका या गोष्टीचा फायदा घेऊनच तस्करांनी जंगल मार्गाने पायदळ जनावरे नेण्याचा फंडा अवलंबला आहे.वन कर्मचारीच बनले खबरेया तस्करांनी काही वन कर्मचाऱ्यांना चिरीमीरी देऊन आपले खबरे बनविल्याची चर्चा आहे. जनावरे कोणत्याही मार्गाने सुरक्षित पोहोचतील, याबाबत हे कर्मचारीच या तस्करांना मार्गदर्शन करीत असल्याने तस्करांचा मार्ग सुकर बनला आहे. सहकार्य करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना तस्करांकडून मोठी बिदागी दिली जात असल्याचे बोलले जात आहे.