शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भूमिअभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण

By admin | Updated: March 31, 2016 03:01 IST

येथील भूमिअभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. या कार्यालयात नागरिकांची कुठलीही कामे ‘चिरीमिरी’ दिल्याशिवाय होत नाही.

पांढरकवडा : येथील भूमिअभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. या कार्यालयात नागरिकांची कुठलीही कामे ‘चिरीमिरी’ दिल्याशिवाय होत नाही. याचाच लाभ दलाल घेत असल्याने नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. या प्रकाराला पायबंद घालावा, अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे.या कार्यालयात कुठलेही काम तातडीने केले जात नाही. तत्काळ होऊ शकणाऱ्या कामासाठी दोन ते तीन महिने चकरा माराव्या लागतात. ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या मोजणीसंदर्भात या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरू केला आहे. शेतजमीन मोजणीचा अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत जमिनीची मोजणी करावी लागते. यासाठी वेगवेगळे शुल्क आकारण्यात येते. मात्र नियमानुसार शुल्क भरूनही अधिक रकमेची मागणी केली जाते, अशी ओरड सुरू आहे. रक्कम न भरल्यास ‘तारीख पे तारीख’, असा प्रवास करावा लागतो.शहरी भागातील नगरिकांना गृह बांधणी किंवा इतर कामासाठी बँंकेचे कर्ज घ्यावे लागते. यासाठी मालमत्तेवर बोजा नोंदवावा लागतो. यापूर्वी ही प्रक्रिया तलाठ्यांमार्फत होत होती. मात्र आता भूमिअभिलेख कार्यालयाकडे ही प्रक्रिया वर्ग करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आलेला हा बदल आता डोकेदुखी ठरत आहे. तलाठ्यांमार्फत बोजा चढविण्याची कारवाई शक्य तितक्या लवकर व्हायची. परंतु भूमिलेख कार्यालयात मात्र आता वारंवार चकरा माराव्या लागत आहे.भूमिअभिलेख कार्यालयात कुठलेही काम दलालामार्फत केल्यास तत्काळ होते, असा अनेक नागरिकांचा अनुभव आहे. या कार्यालयात आलेल्या नागरिकांना कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परत पाठविल्यानंतर त्यांना दलाल गाठतात. आपले काम तत्काळ करून दिले जाईल, असे सांगून जादा रकमेची मागणी करतात. त्यांची मागणी पूर्ण केल्यास कामही तत्काळ होते. नागरिकही येण्या-जाण्याचा खर्च आणि वेळ व्यर्थ जाऊ नये म्हणून याला बळी पडतात. जे काम दलालामार्फत होते, तेच काम थेट का केले जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकाराकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)