शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गीताई केंद्रावर भूमाफियांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:05 IST

वाशिम रोडवरील गीताई केंद्रावर भूमाफीयांनी हल्ला करून सेवकांना मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपुसदची घटना : पोलिसात तक्रार, हल्लेखोरांवर अद्याप कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : वाशिम रोडवरील गीताई केंद्रावर भूमाफीयांनी हल्ला करून सेवकांना मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.वाशिम मार्गावर शिवाजी शाळेलगत विठाबाई मारोतराव ट्रस्टतर्फे गीताई सेवा केंद्राच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य सुरू आहे. मातोश्री विठाबाई मारोतराव वानखेडे यांनी सदर १.४१ हेक्टर जागा आचार्य विनोबा भावे यांच्या गीताई केंद्राला १९७८ मध्ये दान दिली आहे. सध्या या परिसरात संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ म्हसकर, मॅनेजिंग ट्रस्टी नारायणराव सांगोलकर, वृंदाताई जाधव, संदीप जाधव वास्तव्याला आहे. या परिसरातील काही जमीन शेतीसाठी आरक्षित आहे. सोमवारी रामकृष्ण वानखेडे, राजेश मल्हारी साळुंखे व सुभाष बापुराव पाध्ये हे इतर ३० ते ४० जणांसह तेथे पोहोचले. त्यांनी ट्रॅक्टरमध्ये फावडे, सिमेंट खांब, दगड, लोखंडी रॉड आदी साहित्य आणून बळजबरीने परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला संदीप जाधव, रामभाऊ म्हसकर आणि अ‍ॅड.ज्ञानेंद्र कुशवाह यांनी विरोध केला. मात्र हल्लेखोरांनी संदीप जाधवला मारहाण करून गीताई केंद्रामध्ये स्वत:च्या मालकीचा फलक लावला. जवळपास दीड तास हा प्रकार सुरू होता. यावेळी काही पोलीसही तेथे उपस्थित होते. मात्र त्यांनी हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणी रामभाऊ म्हसकर यांनी त्याच दिवशी पोलिसात तक्रार दिली. मात्र वसंतनगर पोलिसांनी ती एनसीमध्ये ठेवली. संदीप जाधव यांची तक्रार दोन दिवस घेतलीच नाही. नंतर ती १० जानेवारीला स्वीकारण्यात आली. मात्र तीसुद्धा अदखलपात्र म्हणून नोंदविण्यात आली.गेल्या ४० वर्षांपासून ही जागा संस्थेच्या नावाने आहे. सरकारी दस्तवेजात ती संस्थेच्या मालकीची आहे. ट्रस्टकडे पुरावे असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप म्हसकर, कुशवाह, जाधव यांनी केला.गीताई परिसर हा समाजाची विरासत आहे. आमच्यावर अन्याय होत असून अतिक्रमण हटवावे. न्यायालयाचा आणि कोणताही आधार नसताना ट्रस्टच्या नावे मालकीच्या जागेत कुठेही पाटी लावून बळजबरीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.- रामभाऊ म्हसकरअध्यक्ष,विठाबाई मारोतराव ट्रस्ट पुसदगीताई केंद्रात घुसून हल्लेखोर जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकशाही जागृत न झाल्यास दहशत निर्माण करणाºयांची हिम्मत वाढेल.- नारायणराव सांगोलकरमॅनेजिंग डायरेक्टर,गीताई केंद्र, पुसद