शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
3
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
4
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
5
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
6
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
7
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
9
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
10
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
11
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
12
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
13
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
14
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
15
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
16
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
17
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
19
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
20
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

जमिनीचा तुकडे बंदी कायदा अन्यायकारक

By admin | Updated: August 8, 2014 00:13 IST

वणी, झरी, मारेगाव या तिनही तालुक्यात सध्या अस्तित्वात असलेला जमिनीचा तुकडे बंदी कायदा अन्यायकारक असून त्यात दुरूस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

संजय खाडे - उकणीवणी, झरी, मारेगाव या तिनही तालुक्यात सध्या अस्तित्वात असलेला जमिनीचा तुकडे बंदी कायदा अन्यायकारक असून त्यात दुरूस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जमिनीचे तुकडे करण्यासाठी नवीन कायदा करावा, अशी त्यांची मागणी आहे.वणी, मारेगाव आणि झरीजामणी या तिही तालुक्यात मोठ्या प्रमाणात वेकोलिच्या भूमिगत आणि खुल्या कोळसा खाणी आहे़ भविष्यात अनेक खाणी प्रस्तावीत आहे़ त्यासाठी या तिनही तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन संपादीत होणार आहे. खाणीसाठी शेती संपादीत करताना सध्या १़२१ आर. क्षेत्रफळानुसार प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जाते. १़२१ आर. म्हणजे जवळपास तीन एकर जमीन होते. त्यात वेकोलि पाच किंवा सहा एकराला, दोन आर. जरी जमीन कमी असेल, तर एकच नोकरी देते. त्या जमिनीचा तुकडा पडत नाही.दुसरा तुकडा पडण्यासाठी शेतकऱ्याकडे जमीन नसते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सध्या अस्तित्वात असलेला कायदा, हा तीन एकराचा आहे़ त्यामुळे सहा एकर जमिनीचे तीन तुकडे पाडायचे असतील, तरीही एकच मालक राहतो़ एकालाच नोकरी मिळते. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. वेकोलिने नवीन आऱआऱपॉलिसीनुसार प्रत्येक दोन एकरावर नोकरी व पडित जमीन एकरी सहा लाख, कोरडवाहू आठ लाख व बागायती १० लाख रूपये दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्यांना नोकरी हवी नसेल, त्यांना एकरी १० लाख रूपये अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.या नवीन धोरणानुसार दोन एकरांचे तुकडे पाडण्याची परवानगी मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. सध्या जर ५०० शेतकऱ्यांना नोकऱ्या मिळत असतील, तर नवीन कायदा लागू झाल्यास एक हजार ते बाराशे नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. त्याचा लाभ सर्व शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना होईल. यामुळे नवीन कायद्याची प्रतीक्षा आहे.