शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

२० जिल्ह्यातील लाखो कापूस उत्पादक मदतीला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 13:11 IST

पाच वर्षांच्या सरासरी उत्पन्नाला केंद्रस्थानी मानून शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले तर मदत मिळणार आहे. ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले शेतकरी मदतीस अपात्र ठरणार आहे. यामुळे २० जिल्ह्यातील लाखो शेतकरी मदतीला मुकणार आहेत.

ठळक मुद्देबोंडअळीच्या मदतीत खोडापाच वर्षांचे सरासरी उत्पन्न ग्राह्य धरणारयवतमाळ जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकरी बाद राज्य शासनाच्या अफलातून अध्यादेशाने जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार शेतकरी मदतीला मुकणार आहे. ११९ कोटी ५१ लाख ६५ हजार रूपयाच्या मदतीला ते मुकणार आहे.

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुलाबी बोंडअळीची मदत देताना पाच वर्षाचे सरासरी उत्पादन ग्राह्य धरण्याच्या सूचना आहेत. पाच वर्षांच्या सरासरी उत्पन्नाला केंद्रस्थानी मानून शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले तर मदत मिळणार आहे. ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले शेतकरी मदतीस अपात्र ठरणार आहे. यामुळे २० जिल्ह्यातील लाखो शेतकरी मदतीला मुकणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात गुलाबी बोंडअळीसाठी हेक्टरी ३७ हजार ५०० रूपयांची मदत जाहीर केली. यासंदर्भात महसूल, वन विभागाने धक्कादायक अध्यादेश काढला. या अध्यादेशात हेक्टरी ६८०० रूपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. याकरिता पाच वर्षांचे सरासरी उत्पादन ग्राह्य धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निघालेल्या उत्पादनाच्या तुलनेत झालेले नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त राहिल्यास शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. नुकसानीचे प्रमाण ३३ टक्केपेक्षा कमी राहिल्यास शेतकरी अपात्र ठरविण्याच्या सूचना आहेत. यामुळे सर्वेक्षणातून मदतीस पात्र ठरलेले शेतकरी हेक्टरी सरासरीच्या उत्पादन मर्यादेने बाद झाले आहे. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात मदतीमधून बाद होणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा लाखांच्या घरात आहे.ब्रिटिशकालीन आणेवारी घातकचआणेवारीकरिता ब्रिटिशकालीन पद्धतीचा अवलंब केला जातो. ही पध्दती बदलविण्यासाठी मंत्री, आमदारांनी आंदोलन केले होते. प्रत्यक्षात सत्तांतरानंतरही ब्रिटिशकालीन पद्धतीचाच अवलंब केला जात आहे. याच पद्धतीच्या अवलंबाने २० जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस