शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘वखार’च्या गोदामाला रस्त्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:17 IST

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने खासगी गोदाम अधिग्रहित करून धान्य साठविण्याची तयारी सुरू केली. मात्र या गोदामात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने येथे धान्य घेऊन जाणारे ट्रक मधातच फसतात.

ठळक मुद्देट्रक फसले : उमरखेड येथे खासगी गोदाम अधिग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने खासगी गोदाम अधिग्रहित करून धान्य साठविण्याची तयारी सुरू केली. मात्र या गोदामात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने येथे धान्य घेऊन जाणारे ट्रक मधातच फसतात. आता पावसाळ्यात तर या ठिकाणी जाणे कठीण झाले आहे. परिणामी ट्रकमधील शेकडो पोते धान्य ओले होण्याची भीती आहे.यावर्षी नाफेडमार्फत जिल्ह्यात तूर व हरभरा खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. गोदाम हाऊसफुल्ल झाल्याने अनेक ठिकाणी खासगी गोदाम वखार महामंडळाने अधिग्रहित केले. उमरखेड येथील सरोज भराडे यांच्या मालकीचे गोदाम २२ मे रोजी अधिग्रहित करण्यात आले. या गोदामाची स्थळ पाहणी उमरखेड तहसीलदारांमार्फत करण्यात आली. त्यावेळी गोदाम मालकाने मुख्य रस्त्यापासून गोदामापर्यंत जाण्यास रस्ता नाही. त्यामुळे अधिग्रहण करू नये, असे पत्र दिले. परंतु वखार महामंडळाने याकडे दुर्लक्ष करीत गोदाम ताब्यात घेतले.यवतमाळ जिल्ह्यात खरेदी केलेली तूर आणि हरभरा येथील गोदामात आणला जात आहे. मुकुटबन, घाटंजी, राळेगाव, यवतमाळ, पुसद, दिग्रस, आर्णी आदी ठिकाणावरून ट्रक धान्य घेऊन येतात. परंतु या गोदामापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही.गोदामापर्यंत मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून धान्य घेऊन आलेले ट्रक चिखलात फसले. पाऊस सुरू असल्याने ट्रकमधील धान्य खराब होण्याची शक्यता आहे. याबाबत शंकरशीला अ‍ॅग्रो वेअर हाऊसच्या संचालक सरोज भंडारी म्हणाले, वखार महामंडळाला या गोदामासाठी अर्धवट रस्ता असल्याचे कळविले. तरीही जबरदस्तीने गोदाम अधिग्रहित करण्यात आले. पावसाळ्यात होणाऱ्या धान्याच्या नुकसानीस आपण जबाबदार राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.गोदामामध्ये नाफेडने खरेदी केलेला धान्य माल टाकण्यात येणार आहे. त्याला मुख्य रस्त्यापासून गोदामापर्यंत रस्ता नसल्याचे आणि गोदाम शेतात असल्याचे उमरखेड तहसीलदार, एसडीओ, वखार महामंडळ व नाफेडला कळविले आहे.- ए.एन. डावरेस्टोअर किपर वखार महामंडळ, उमरखेड