शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

पुसदमध्ये रेमडेसिविरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:32 IST

जिल्ह्यात आरडाओरडा झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविर वितरणासाठी नवीन पद्धत राबविली. मात्र, ही नवीन पद्धतही कागदावरच आहे. कोणत्या रुग्णालयात किती इंजेक्शन ...

जिल्ह्यात आरडाओरडा झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविर वितरणासाठी नवीन पद्धत राबविली. मात्र, ही नवीन पद्धतही कागदावरच आहे. कोणत्या रुग्णालयात किती इंजेक्शन दिली आणि रुग्णालयातील रुग्णांना किती रेमडेसिविर मिळाले, याचा कोणताही हिशेब अन्न व औषध प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे ही इंजेक्शन जातात कुठे, असा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक उपस्थित करीत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रोज सरासरी हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करतात, पण तेथेही रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही. त्यासाठी नातेवाईक शहरभर फिरत असतात. मात्र, इंजेक्शन थेट कोविड हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या मेडिकलला दिले जातात, असे प्रशासन सांगते. हे सर्व तोंडी आदेशावरून चालले आहे. डॉक्टरांनाही हे माहीत असताना नातेवाइकांना डिस्क्रिप्शन कसे देतात, हा मोठा प्रश्न आहे.

शहरामध्ये रेमडेसिवीर आणि कोरोना लसीचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहे. रेमडेसिविर वेळेत मिळत नसल्यामुळे रुग्णांची स्थिती गंभीर होत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर व लस उपलब्ध होत नसल्यामुळे मेडिकल दुकानाकडे मागणी वाढली. मात्र, स्टॉक संपल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे.

वास्तविक, पुसदसारख्या शहरात रेमडेसिविरचा साठा मुबलक असायला पाहिजे होता. मात्र, पुसदमधली काही लोक बाहेरगावी जाऊन इंजेक्शनची खरेदी करीत आहेत. मुळात येथे पुरवठाच कमी होत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहरात रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा योग्य होत आहे का, इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे का, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी एफडीएची आहे. मात्र, रुग्णाचे नातेवाईक त्रस्त असताना, शासन, प्रशासनाकडून काहीच हालचाली होताना दिसत नाहीत.

बॉक्स

पुसदची आरोग्य यंत्रणा कोलमडली

वेळेत रेमडेसिविर न मिळाल्यामुळे कोरोना रुग्णाची परिस्थिती बिघडत असून, यावर प्रशासन गप्प आहे. आरोग्य यंत्रणा पूर्ण कोलमडली आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवस सर्व लसीकरण केंद्रे बंद होते. नागरिकांना लस मिळणार की नाही, याबाबतची काहीच माहिती देण्यात आली नव्हती. सकाळी लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर नागरिकांना आज लस उपलब्ध नाही, याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.