शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पुसदमध्ये रेमडेसिविरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:32 IST

जिल्ह्यात आरडाओरडा झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविर वितरणासाठी नवीन पद्धत राबविली. मात्र, ही नवीन पद्धतही कागदावरच आहे. कोणत्या रुग्णालयात किती इंजेक्शन ...

जिल्ह्यात आरडाओरडा झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविर वितरणासाठी नवीन पद्धत राबविली. मात्र, ही नवीन पद्धतही कागदावरच आहे. कोणत्या रुग्णालयात किती इंजेक्शन दिली आणि रुग्णालयातील रुग्णांना किती रेमडेसिविर मिळाले, याचा कोणताही हिशेब अन्न व औषध प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे ही इंजेक्शन जातात कुठे, असा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक उपस्थित करीत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रोज सरासरी हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करतात, पण तेथेही रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही. त्यासाठी नातेवाईक शहरभर फिरत असतात. मात्र, इंजेक्शन थेट कोविड हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या मेडिकलला दिले जातात, असे प्रशासन सांगते. हे सर्व तोंडी आदेशावरून चालले आहे. डॉक्टरांनाही हे माहीत असताना नातेवाइकांना डिस्क्रिप्शन कसे देतात, हा मोठा प्रश्न आहे.

शहरामध्ये रेमडेसिवीर आणि कोरोना लसीचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहे. रेमडेसिविर वेळेत मिळत नसल्यामुळे रुग्णांची स्थिती गंभीर होत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर व लस उपलब्ध होत नसल्यामुळे मेडिकल दुकानाकडे मागणी वाढली. मात्र, स्टॉक संपल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे.

वास्तविक, पुसदसारख्या शहरात रेमडेसिविरचा साठा मुबलक असायला पाहिजे होता. मात्र, पुसदमधली काही लोक बाहेरगावी जाऊन इंजेक्शनची खरेदी करीत आहेत. मुळात येथे पुरवठाच कमी होत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहरात रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा योग्य होत आहे का, इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे का, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी एफडीएची आहे. मात्र, रुग्णाचे नातेवाईक त्रस्त असताना, शासन, प्रशासनाकडून काहीच हालचाली होताना दिसत नाहीत.

बॉक्स

पुसदची आरोग्य यंत्रणा कोलमडली

वेळेत रेमडेसिविर न मिळाल्यामुळे कोरोना रुग्णाची परिस्थिती बिघडत असून, यावर प्रशासन गप्प आहे. आरोग्य यंत्रणा पूर्ण कोलमडली आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवस सर्व लसीकरण केंद्रे बंद होते. नागरिकांना लस मिळणार की नाही, याबाबतची काहीच माहिती देण्यात आली नव्हती. सकाळी लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर नागरिकांना आज लस उपलब्ध नाही, याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.