शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अरुणावतीच्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:56 IST

तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. कालवे फुटल्याने शेतकऱ्यांना मिळणारे पाणी वाहून जात आहे. शेती सिंचनासाठी अरुणावती प्रकल्प वरदान ठरला होता.

ठळक मुद्देशेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत : कालवे फुटले, दुरुस्तीकडे दुर्लक्ष

हरिओम बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. कालवे फुटल्याने शेतकऱ्यांना मिळणारे पाणी वाहून जात आहे.शेती सिंचनासाठी अरुणावती प्रकल्प वरदान ठरला होता. मात्र सध्या या प्रकल्पाला उतरती कळा लागल्याचे दिसत आहे. प्रकल्पाचे कालवे जागोजागी फुटले आहे. त्यातून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आपल्या डोळ्यादेखत पाणी वाया जात असल्याने बघून शेतकरी प्रचंड अस्वस्थ झाले आहे. मात्र त्यांची व्यथा ऐकण्यासाठी कुणीही पुढे येण्यास तयार नाही.पाणी वाया जात असल्याने सिंचन कमी होत आहे. यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे. संबंधित अधिकारी कालवे दुरुस्तीसाठी पुरेसा निधी देण्यास शासन तयार नसल्याचे सांगून मोकळे होत आहे. संपूर्ण कालव्यांची दुरुस्ती करण्याची गरज असताना शासन अपुरा निधी देत आहे. त्यामुळे कालवे दुरुस्ती परिपूर्ण होत नाही. परिणामी लाखो लीटर पाणी वाया जात आहे.एकीकडे शासन पाणी अडवा-पाणी जिरवाचा घोषा लावून पाणी साठविण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. दुसरीकडे लाखो लीटर पाणी साचून वाया जात असताना उपाययोजना केल्या जात नाही. पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही. लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. निधी खेचून आणण्यास ते असमर्थ ठरत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहे. पीके वाळत असल्याने ते त्रस्त आहे.पाणी अडवा-जिरवाशासनातर्फे राज्यात ठिकठिकाणी पाणी अडवा-पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, तलावातील गाळ काढणे, बंधारे बांधणे, नाला सरळीकरण आदी कामे केली जात आहे. अनेक ठिकाणी लोकसहभाग घेतला जात आहे. याच धर्तीवर आता अरुणावतीचे पाणी बचत करण्याची गरज आहे. वाहून जाणारे पाणी अडवून त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. यासाठी आता शासनासह सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून चंचित राहणार आहे.

टॅग्स :Arunavati Damअरुणावती धरण