शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

अरुणावतीच्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:56 IST

तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. कालवे फुटल्याने शेतकऱ्यांना मिळणारे पाणी वाहून जात आहे. शेती सिंचनासाठी अरुणावती प्रकल्प वरदान ठरला होता.

ठळक मुद्देशेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत : कालवे फुटले, दुरुस्तीकडे दुर्लक्ष

हरिओम बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. कालवे फुटल्याने शेतकऱ्यांना मिळणारे पाणी वाहून जात आहे.शेती सिंचनासाठी अरुणावती प्रकल्प वरदान ठरला होता. मात्र सध्या या प्रकल्पाला उतरती कळा लागल्याचे दिसत आहे. प्रकल्पाचे कालवे जागोजागी फुटले आहे. त्यातून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आपल्या डोळ्यादेखत पाणी वाया जात असल्याने बघून शेतकरी प्रचंड अस्वस्थ झाले आहे. मात्र त्यांची व्यथा ऐकण्यासाठी कुणीही पुढे येण्यास तयार नाही.पाणी वाया जात असल्याने सिंचन कमी होत आहे. यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे. संबंधित अधिकारी कालवे दुरुस्तीसाठी पुरेसा निधी देण्यास शासन तयार नसल्याचे सांगून मोकळे होत आहे. संपूर्ण कालव्यांची दुरुस्ती करण्याची गरज असताना शासन अपुरा निधी देत आहे. त्यामुळे कालवे दुरुस्ती परिपूर्ण होत नाही. परिणामी लाखो लीटर पाणी वाया जात आहे.एकीकडे शासन पाणी अडवा-पाणी जिरवाचा घोषा लावून पाणी साठविण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. दुसरीकडे लाखो लीटर पाणी साचून वाया जात असताना उपाययोजना केल्या जात नाही. पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही. लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. निधी खेचून आणण्यास ते असमर्थ ठरत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहे. पीके वाळत असल्याने ते त्रस्त आहे.पाणी अडवा-जिरवाशासनातर्फे राज्यात ठिकठिकाणी पाणी अडवा-पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, तलावातील गाळ काढणे, बंधारे बांधणे, नाला सरळीकरण आदी कामे केली जात आहे. अनेक ठिकाणी लोकसहभाग घेतला जात आहे. याच धर्तीवर आता अरुणावतीचे पाणी बचत करण्याची गरज आहे. वाहून जाणारे पाणी अडवून त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. यासाठी आता शासनासह सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून चंचित राहणार आहे.

टॅग्स :Arunavati Damअरुणावती धरण