शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

अरुणावतीच्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:56 IST

तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. कालवे फुटल्याने शेतकऱ्यांना मिळणारे पाणी वाहून जात आहे. शेती सिंचनासाठी अरुणावती प्रकल्प वरदान ठरला होता.

ठळक मुद्देशेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत : कालवे फुटले, दुरुस्तीकडे दुर्लक्ष

हरिओम बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. कालवे फुटल्याने शेतकऱ्यांना मिळणारे पाणी वाहून जात आहे.शेती सिंचनासाठी अरुणावती प्रकल्प वरदान ठरला होता. मात्र सध्या या प्रकल्पाला उतरती कळा लागल्याचे दिसत आहे. प्रकल्पाचे कालवे जागोजागी फुटले आहे. त्यातून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आपल्या डोळ्यादेखत पाणी वाया जात असल्याने बघून शेतकरी प्रचंड अस्वस्थ झाले आहे. मात्र त्यांची व्यथा ऐकण्यासाठी कुणीही पुढे येण्यास तयार नाही.पाणी वाया जात असल्याने सिंचन कमी होत आहे. यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे. संबंधित अधिकारी कालवे दुरुस्तीसाठी पुरेसा निधी देण्यास शासन तयार नसल्याचे सांगून मोकळे होत आहे. संपूर्ण कालव्यांची दुरुस्ती करण्याची गरज असताना शासन अपुरा निधी देत आहे. त्यामुळे कालवे दुरुस्ती परिपूर्ण होत नाही. परिणामी लाखो लीटर पाणी वाया जात आहे.एकीकडे शासन पाणी अडवा-पाणी जिरवाचा घोषा लावून पाणी साठविण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. दुसरीकडे लाखो लीटर पाणी साचून वाया जात असताना उपाययोजना केल्या जात नाही. पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही. लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. निधी खेचून आणण्यास ते असमर्थ ठरत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहे. पीके वाळत असल्याने ते त्रस्त आहे.पाणी अडवा-जिरवाशासनातर्फे राज्यात ठिकठिकाणी पाणी अडवा-पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, तलावातील गाळ काढणे, बंधारे बांधणे, नाला सरळीकरण आदी कामे केली जात आहे. अनेक ठिकाणी लोकसहभाग घेतला जात आहे. याच धर्तीवर आता अरुणावतीचे पाणी बचत करण्याची गरज आहे. वाहून जाणारे पाणी अडवून त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. यासाठी आता शासनासह सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून चंचित राहणार आहे.

टॅग्स :Arunavati Damअरुणावती धरण