शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

पुरस्कार रकमेपासून वाचनालये वंचित

By admin | Updated: August 17, 2015 02:37 IST

तंटामुक्त गावातील मुलांना वाचनाची सवय लागावी, त्यांना नवनवीन माहितीची पुस्तके उपलब्ध व्हावी, यासाठी पुरस्कार रकमेतील पाच हजार रूपयांचे उपयुक्त ...

मारेगाव : तंटामुक्त गावातील मुलांना वाचनाची सवय लागावी, त्यांना नवनवीन माहितीची पुस्तके उपलब्ध व्हावी, यासाठी पुरस्कार रकमेतील पाच हजार रूपयांचे उपयुक्त संदर्भ ग्रंथ, पुस्तके गावातील, शाळेतील वाचनालयांना खरेदी करून द्यावे, अशा शासनाच्या स्पष्ट सूचना (परिपत्रकीय) आहे. तथापि या परिपत्रकाचे कुणीच गांभीर्य लक्षात घेतले नसल्याचे दिसते. त्यामुळे पुरस्कार प्राप्त अनेक ग्रामपंचायतींनी या निर्देशांचे पालन केलेच नाही, हे वास्तव आहे.महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत सन २००७ पासून राज्य शासनाने लोकसंख्येच्या आधारावर तंटामुक्त गावांना लाखो रूपयांच्या पुरस्काराचे वाटप केले आहे. दरवर्षी हे पुरस्कार वाटप सुरूच आहे. या पुरस्कार रकमेचा विनियोग गाव विकासासाठी कसा करावा, यासाठी मार्गदर्शक सूचनासुद्धा शासनाने दिल्या आहेत. ज्या गावांना लाखोंचा पुरस्कार मिळाला, त्यांनी या रकमेचा विनियोग कसा केला, हे मात्र कोडच आहे. त्यामुळे पुरस्कार रकमेचे फलित होते की नाही, हा संशोधनाचाच विषय ठरू शकतो. परिश्रमपूर्वक गाव तंटामुक्त करून पुरस्कार मिळविणाऱ्या तंटामुक्त गाव समितीमार्फतच या रकमेचा विनियोग होणे गरजेचे आहे. तथापि तंटामुक्त गाव पुरस्काराची रक्कम ग्रामपंचायतीला मिळत असल्याने गावपुढारी व ग्रामपंचायत पदाधिकारी तंटामुक्त समितीला विश्वासात न घेताच त्याची विल्हेवाट लावतात, असा अनुभव आहे. परिणामी पुरस्कार प्राप्त तंटामुक्त समित्यांचे महत्वच नाहीसे झाले आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुरस्कार निधीच्या दोन टक्के रक्कम पुरस्कार समारंभासाठी, १५ टक्के रक्कम तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी, पाच टक्के रक्कम प्रशासकीय व कार्यालयीन बाबीसाठी खर्च करावयाची आहे. तसेच पुरस्कार रकमेच्या १५ टक्के रक्कम ग्रामपंचायतीत रहिवासी असलेल्या विद्यार्थी, युवक, तंटामुक्तीसाठी परिश्रम घेणारे ग्रामस्थ, व्यसनमुक्त नागरिक, गावातील दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी दारिद्र्यरेषेखालील उत्तीर्ण विद्यार्थी, अंमलबजावणी वर्षातील मुलींना जन्म देणाऱ्या मातांना जन्मानंद व माहेर भेट, गावातील महिला बचत गटातील सर्वोत्कृष्ट कार्य करणारी महिला, तसेच गावात तंटे होणार नाही व दाखल तंटे सामोपचाराने मिटविण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना द्यायचे आहे.पुरस्कार निधीतील एकूण ६३ टक्के रक्कम ग्रामसभेच्या मंजुरीने आणि शासन निकषाप्रमाणे एकूण १३ बाबींवर खर्च करावयाचे असतात. या सूचनांमध्ये १२ व्या क्रमांकावर गावातील वाचनालयावर खर्च करण्याचे स्पष्ट निर्देश आहे. मात्र मारेगाव तालुक्यातील ३० पुरस्कार प्राप्त गावांपैकी केवळ कोलगाव ग्रामपंचायतीने वाचनालयासाठी पाच हजार रूपये खर्ची केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. उर्वरित ग्रामपंचायतींनी शासन निर्देशांचे पालनच केले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अखेर तंटामुक्त गाव मोहिमच गावकऱ्यांतील वादामुळे तंट्यात सापडली आहे. (तालुका प्रतिनिधी)